शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

भूसंपादनाच्या नोटिशीने शेतकरी झाले आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:47 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाइनच्या रुंदीकरण तसेच विद्युतीकरणासाठी मुकणे, पाडळी देशमुख, गोंदे दुमाला, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य, वंजारवाडी, लोहशिंगवे आदी गावांतील शेतकºयांना भूसंपादनाबाबत नोटीस आल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, घरातील एका सदस्यास रेल्वेत नोकरी द्यावी व योग्य तो मोबदला मिळावा अन्यथा हा प्रकल्प बंद पाडण्यात येईल, असे यावेळी संतप्त शेतकºयांनी सांगितले.

ठळक मुद्देइगतपुरी : रेल्वेत नोकरी द्या अन्यथा प्रकल्प बंद करण्याची एकमुखी मागणी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाइनच्या रुंदीकरण तसेच विद्युतीकरणासाठी मुकणे, पाडळी देशमुख, गोंदे दुमाला, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य, वंजारवाडी, लोहशिंगवे आदी गावांतील शेतकºयांना भूसंपादनाबाबत नोटीस आल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, घरातील एका सदस्यास रेल्वेत नोकरी द्यावी व योग्य तो मोबदला मिळावा अन्यथा हा प्रकल्प बंद पाडण्यात येईल, असे यावेळी संतप्त शेतकºयांनी सांगितले.इगतपुरी ते मनमाड असणाºया रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने या रेल्वेमार्गाच्या दुतर्र्फा असलेल्या शेतकºयांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे नुकत्याच रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये बैठका पार पडल्या असून, येथील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

प्रस्तावित लोहमार्गाप्रश्नी तालुक्यातील मुकणे, पाडळी, कुºहेगाव, वंजारवाडी, लोहशिंगवे आदी गावांत शेतकऱ्यांच्या बैठका पार पडल्या असून, त्यांनी बैठकीत आक्रमक भूमिका पार पडली.नांदूरवैद्य व बेलगाव कुºहे या दोन गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी या आधीच शासनाने केंद्रीय संरक्षण विभागाने लष्कराच्या गोळीबार प्रशिक्षणासाठी हजारो हेक्टर जमिनी या आधीच संपादित केल्या असून, आता रेल्वे प्रकल्पासाठी पुन्हा जमिनी संपादित होणार असल्यामुळे येथील शेतकरी पूर्णत: भूमिहीन होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. 

गावागावांत शेतकºयांच्या बैठकायेथील शेतकºयांशी भूमिपुत्र फाउण्डेशचे विनोद नाठे यांनीदेखील चर्चा करून कुठलाही परिस्थितीत जमिनी संपादित होऊन देणार नसल्याचे यावेळी सांगितले. याविषयीचे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले आहे.इगतपुरी ते मनमाड या नवीन लोहमार्गाच्या विस्तारीकरणाबाबत ग्रामपंचायतींना नोटिसा आल्या असून, या आधीच शासनाने आमच्या गावातील जमिनी महामार्ग, धरणे तसेच औद्योगिक वसाहतींसाठी संपादित केल्यामुळे आता रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्यानंतर शेतकºयांनी उदरनिर्वाह कसा करायचा ?- खंडेराव धांडे, सरपंच,पाडळी देशमुखआधीच शासनाने आमच्या जमिनी संपादित केल्या असून, आता उर्वरित जमिनी रेल्वे प्रकल्पासाठी जाणार या धक्क्याने शेतकरी हादरले आहेत. रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये सविस्तर माहितीसाठी बैठका घेऊन जमिनी संपादनाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.- संगीता धोंगडे,सरपंच, कुºहेगाव.

टॅग्स :Farmerशेतकरीcentral railwayमध्य रेल्वे