शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

भूसंपादनाच्या नोटिशीने शेतकरी झाले आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:47 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाइनच्या रुंदीकरण तसेच विद्युतीकरणासाठी मुकणे, पाडळी देशमुख, गोंदे दुमाला, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य, वंजारवाडी, लोहशिंगवे आदी गावांतील शेतकºयांना भूसंपादनाबाबत नोटीस आल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, घरातील एका सदस्यास रेल्वेत नोकरी द्यावी व योग्य तो मोबदला मिळावा अन्यथा हा प्रकल्प बंद पाडण्यात येईल, असे यावेळी संतप्त शेतकºयांनी सांगितले.

ठळक मुद्देइगतपुरी : रेल्वेत नोकरी द्या अन्यथा प्रकल्प बंद करण्याची एकमुखी मागणी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाइनच्या रुंदीकरण तसेच विद्युतीकरणासाठी मुकणे, पाडळी देशमुख, गोंदे दुमाला, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य, वंजारवाडी, लोहशिंगवे आदी गावांतील शेतकºयांना भूसंपादनाबाबत नोटीस आल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, घरातील एका सदस्यास रेल्वेत नोकरी द्यावी व योग्य तो मोबदला मिळावा अन्यथा हा प्रकल्प बंद पाडण्यात येईल, असे यावेळी संतप्त शेतकºयांनी सांगितले.इगतपुरी ते मनमाड असणाºया रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने या रेल्वेमार्गाच्या दुतर्र्फा असलेल्या शेतकºयांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे नुकत्याच रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये बैठका पार पडल्या असून, येथील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

प्रस्तावित लोहमार्गाप्रश्नी तालुक्यातील मुकणे, पाडळी, कुºहेगाव, वंजारवाडी, लोहशिंगवे आदी गावांत शेतकऱ्यांच्या बैठका पार पडल्या असून, त्यांनी बैठकीत आक्रमक भूमिका पार पडली.नांदूरवैद्य व बेलगाव कुºहे या दोन गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी या आधीच शासनाने केंद्रीय संरक्षण विभागाने लष्कराच्या गोळीबार प्रशिक्षणासाठी हजारो हेक्टर जमिनी या आधीच संपादित केल्या असून, आता रेल्वे प्रकल्पासाठी पुन्हा जमिनी संपादित होणार असल्यामुळे येथील शेतकरी पूर्णत: भूमिहीन होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. 

गावागावांत शेतकºयांच्या बैठकायेथील शेतकºयांशी भूमिपुत्र फाउण्डेशचे विनोद नाठे यांनीदेखील चर्चा करून कुठलाही परिस्थितीत जमिनी संपादित होऊन देणार नसल्याचे यावेळी सांगितले. याविषयीचे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले आहे.इगतपुरी ते मनमाड या नवीन लोहमार्गाच्या विस्तारीकरणाबाबत ग्रामपंचायतींना नोटिसा आल्या असून, या आधीच शासनाने आमच्या गावातील जमिनी महामार्ग, धरणे तसेच औद्योगिक वसाहतींसाठी संपादित केल्यामुळे आता रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्यानंतर शेतकºयांनी उदरनिर्वाह कसा करायचा ?- खंडेराव धांडे, सरपंच,पाडळी देशमुखआधीच शासनाने आमच्या जमिनी संपादित केल्या असून, आता उर्वरित जमिनी रेल्वे प्रकल्पासाठी जाणार या धक्क्याने शेतकरी हादरले आहेत. रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये सविस्तर माहितीसाठी बैठका घेऊन जमिनी संपादनाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.- संगीता धोंगडे,सरपंच, कुºहेगाव.

टॅग्स :Farmerशेतकरीcentral railwayमध्य रेल्वे