शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाच्या नोटिशीने शेतकरी झाले आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:47 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाइनच्या रुंदीकरण तसेच विद्युतीकरणासाठी मुकणे, पाडळी देशमुख, गोंदे दुमाला, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य, वंजारवाडी, लोहशिंगवे आदी गावांतील शेतकºयांना भूसंपादनाबाबत नोटीस आल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, घरातील एका सदस्यास रेल्वेत नोकरी द्यावी व योग्य तो मोबदला मिळावा अन्यथा हा प्रकल्प बंद पाडण्यात येईल, असे यावेळी संतप्त शेतकºयांनी सांगितले.

ठळक मुद्देइगतपुरी : रेल्वेत नोकरी द्या अन्यथा प्रकल्प बंद करण्याची एकमुखी मागणी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाइनच्या रुंदीकरण तसेच विद्युतीकरणासाठी मुकणे, पाडळी देशमुख, गोंदे दुमाला, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य, वंजारवाडी, लोहशिंगवे आदी गावांतील शेतकºयांना भूसंपादनाबाबत नोटीस आल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, घरातील एका सदस्यास रेल्वेत नोकरी द्यावी व योग्य तो मोबदला मिळावा अन्यथा हा प्रकल्प बंद पाडण्यात येईल, असे यावेळी संतप्त शेतकºयांनी सांगितले.इगतपुरी ते मनमाड असणाºया रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने या रेल्वेमार्गाच्या दुतर्र्फा असलेल्या शेतकºयांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे नुकत्याच रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये बैठका पार पडल्या असून, येथील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

प्रस्तावित लोहमार्गाप्रश्नी तालुक्यातील मुकणे, पाडळी, कुºहेगाव, वंजारवाडी, लोहशिंगवे आदी गावांत शेतकऱ्यांच्या बैठका पार पडल्या असून, त्यांनी बैठकीत आक्रमक भूमिका पार पडली.नांदूरवैद्य व बेलगाव कुºहे या दोन गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी या आधीच शासनाने केंद्रीय संरक्षण विभागाने लष्कराच्या गोळीबार प्रशिक्षणासाठी हजारो हेक्टर जमिनी या आधीच संपादित केल्या असून, आता रेल्वे प्रकल्पासाठी पुन्हा जमिनी संपादित होणार असल्यामुळे येथील शेतकरी पूर्णत: भूमिहीन होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. 

गावागावांत शेतकºयांच्या बैठकायेथील शेतकºयांशी भूमिपुत्र फाउण्डेशचे विनोद नाठे यांनीदेखील चर्चा करून कुठलाही परिस्थितीत जमिनी संपादित होऊन देणार नसल्याचे यावेळी सांगितले. याविषयीचे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले आहे.इगतपुरी ते मनमाड या नवीन लोहमार्गाच्या विस्तारीकरणाबाबत ग्रामपंचायतींना नोटिसा आल्या असून, या आधीच शासनाने आमच्या गावातील जमिनी महामार्ग, धरणे तसेच औद्योगिक वसाहतींसाठी संपादित केल्यामुळे आता रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्यानंतर शेतकºयांनी उदरनिर्वाह कसा करायचा ?- खंडेराव धांडे, सरपंच,पाडळी देशमुखआधीच शासनाने आमच्या जमिनी संपादित केल्या असून, आता उर्वरित जमिनी रेल्वे प्रकल्पासाठी जाणार या धक्क्याने शेतकरी हादरले आहेत. रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये सविस्तर माहितीसाठी बैठका घेऊन जमिनी संपादनाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.- संगीता धोंगडे,सरपंच, कुºहेगाव.

टॅग्स :Farmerशेतकरीcentral railwayमध्य रेल्वे