शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

केळझर धरणातील पाणी मिळत नसल्याने शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:15 IST

औंदाणे : बागलाण तालुक्यातील केळझर धरणावरील डाव्या कालवा व चारी नंबर आठ- ८ ला आठ दिवसापासून पाणी सोडले असून पाणी पोहोचत नसल्याने संबंधित विभागाने दखल न घेतल्यास येत्या १८ सप्टेबर रोजी कार्यालयास टाळे ठोकणार लावणारअसल्याचेनिवेदनकेळझर कृती समिती व शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता ए. बी. रौदळ यांना देण्यातआले.

ठळक मुद्दे कृती समितीच्यावतीने पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता यांना निवेदन

लोकमत न्युज नेटवर्कऔंदाणे : बागलाण तालुक्यातील केळझर धरणावरील डाव्या कालवा व चारी नंबर आठ- ८ ला आठ दिवसापासून पाणी सोडले असून पाणी पोहोचत नसल्याने संबंधित विभागाने दखल न घेतल्यास येत्या १८ सप्टेबर रोजी कार्यालयास टाळे ठोकणार लावणारअसल्याचेनिवेदनकेळझर कृती समिती व शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता ए. बी. रौदळ यांना देण्यातआले.येथील चारी चे गेल्या पंधरा वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असलेले चारी नंबर ८ चे काम आज रोजी पूर्ण झालेले आहे. मात्र ज्या केळझर डाव्या कालव्यातून पाणी चारी नंबर आठ ला येणार आहे. तो डावा कालवा काही ठिकाणावर नादुरु स्त असल्यामुळे पाणी येण्यास प्रचंड अडचणी येत आहेत. याबाबत संबंधित विभागाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. या कालव्यासाठी २०१९ यावर्षी चार कोटी ९५ लाखाचा निधी मंजूर होऊन संबंधित ठेकेदाराचे टेंडर ही झाले आहे. ठेकेदार मात्र कानाडोळा करीत आहे. त्यामुळे आज पाणी न पोहोचण्याची परिस्थिती उद्भवली आहे. संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केले असते तर आज रोजी कुठलीही अडचण आली नसती. ठेकेदाराने तात्काळ पाटाची दुरु स्ती करून पाणी कौतिक पाडे पर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी घ्यावी असे सर्व शेतकऱ्यांचे मत आहे. आणि संबंधित विभागाने हे काम पूर्ण करून घेतल्यास१८तारखेला कार्यालयास कुलूप लावण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. केळझर धरणातून वाहून जाणारे पूर पाणी शेतकºयांच्या मळ्यापर्यंत पोहोचले पाहिजे असे मत शेतकºयांनी अधिकाºयांसमोर मांडले. निवेदनावर सुधाकर रौंदळ, राजेंद्र जाधव, नंदकिशोर शेवाळे, गोपीनाथ मोहन, भिका रौंदळ, प्रभाकर रौंदळ, तात्या रौंदळ, लखन पवार, समाधान जाधव, पुंडलिक रौंदळ, मनोज मोरकर, अरु ण मोहन, राजेंद्र जाधव, देवबा मोहन आदींच्या सह्या आहेत.आम्ही शेतकºयांनी चारी नंबर आठ ला कधी पाणी येईल याची अपेक्षा सोडली होती, मात्र कान्हेरी नदीवरील काम पूर्ण झाले आणि आमच्या आशा पल्लवित झाल्या. आज कुठे आमच्या शिवारापर्यंत पाणी येईल अशी अपेक्षा आहे. मात्र संबंधित विभागाने कामाकडे लक्ष दिले तर सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल.-सुधाकर रौंदळ, शेतकरी, तरसाळी.केळझर डाव्या कालव्यावर ठिकठिकाणी रिपेरिंग चे काम केले आहे. मात्र उद्यापासून संपूर्ण कालवा साफसफाई करून कौतिक पाडे गावापर्यंत पाणी पोहोचवण्याची आम्ही हमी घेतो. उद्यापासून जास्तीत जास्त यंत्रणा उभी करून लवकरात लवकर पाणी पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.-ए.बी. रौंदळ,सहाय्यक अभियंता, सटाणा.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकFarmerशेतकरी