शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

केळझर धरणातील पाणी मिळत नसल्याने शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:15 IST

औंदाणे : बागलाण तालुक्यातील केळझर धरणावरील डाव्या कालवा व चारी नंबर आठ- ८ ला आठ दिवसापासून पाणी सोडले असून पाणी पोहोचत नसल्याने संबंधित विभागाने दखल न घेतल्यास येत्या १८ सप्टेबर रोजी कार्यालयास टाळे ठोकणार लावणारअसल्याचेनिवेदनकेळझर कृती समिती व शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता ए. बी. रौदळ यांना देण्यातआले.

ठळक मुद्दे कृती समितीच्यावतीने पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता यांना निवेदन

लोकमत न्युज नेटवर्कऔंदाणे : बागलाण तालुक्यातील केळझर धरणावरील डाव्या कालवा व चारी नंबर आठ- ८ ला आठ दिवसापासून पाणी सोडले असून पाणी पोहोचत नसल्याने संबंधित विभागाने दखल न घेतल्यास येत्या १८ सप्टेबर रोजी कार्यालयास टाळे ठोकणार लावणारअसल्याचेनिवेदनकेळझर कृती समिती व शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता ए. बी. रौदळ यांना देण्यातआले.येथील चारी चे गेल्या पंधरा वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असलेले चारी नंबर ८ चे काम आज रोजी पूर्ण झालेले आहे. मात्र ज्या केळझर डाव्या कालव्यातून पाणी चारी नंबर आठ ला येणार आहे. तो डावा कालवा काही ठिकाणावर नादुरु स्त असल्यामुळे पाणी येण्यास प्रचंड अडचणी येत आहेत. याबाबत संबंधित विभागाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. या कालव्यासाठी २०१९ यावर्षी चार कोटी ९५ लाखाचा निधी मंजूर होऊन संबंधित ठेकेदाराचे टेंडर ही झाले आहे. ठेकेदार मात्र कानाडोळा करीत आहे. त्यामुळे आज पाणी न पोहोचण्याची परिस्थिती उद्भवली आहे. संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केले असते तर आज रोजी कुठलीही अडचण आली नसती. ठेकेदाराने तात्काळ पाटाची दुरु स्ती करून पाणी कौतिक पाडे पर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी घ्यावी असे सर्व शेतकऱ्यांचे मत आहे. आणि संबंधित विभागाने हे काम पूर्ण करून घेतल्यास१८तारखेला कार्यालयास कुलूप लावण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. केळझर धरणातून वाहून जाणारे पूर पाणी शेतकºयांच्या मळ्यापर्यंत पोहोचले पाहिजे असे मत शेतकºयांनी अधिकाºयांसमोर मांडले. निवेदनावर सुधाकर रौंदळ, राजेंद्र जाधव, नंदकिशोर शेवाळे, गोपीनाथ मोहन, भिका रौंदळ, प्रभाकर रौंदळ, तात्या रौंदळ, लखन पवार, समाधान जाधव, पुंडलिक रौंदळ, मनोज मोरकर, अरु ण मोहन, राजेंद्र जाधव, देवबा मोहन आदींच्या सह्या आहेत.आम्ही शेतकºयांनी चारी नंबर आठ ला कधी पाणी येईल याची अपेक्षा सोडली होती, मात्र कान्हेरी नदीवरील काम पूर्ण झाले आणि आमच्या आशा पल्लवित झाल्या. आज कुठे आमच्या शिवारापर्यंत पाणी येईल अशी अपेक्षा आहे. मात्र संबंधित विभागाने कामाकडे लक्ष दिले तर सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल.-सुधाकर रौंदळ, शेतकरी, तरसाळी.केळझर डाव्या कालव्यावर ठिकठिकाणी रिपेरिंग चे काम केले आहे. मात्र उद्यापासून संपूर्ण कालवा साफसफाई करून कौतिक पाडे गावापर्यंत पाणी पोहोचवण्याची आम्ही हमी घेतो. उद्यापासून जास्तीत जास्त यंत्रणा उभी करून लवकरात लवकर पाणी पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.-ए.बी. रौंदळ,सहाय्यक अभियंता, सटाणा.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकFarmerशेतकरी