शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

शेतकरी भागवताहेत तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:30 IST

नांदूरवैद्य : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात दरवर्षी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या उशाशी असलेल्या नांदूरवैद्य येथील महिलादेखील या पाणीटंचाईपासून सुटल्या नाहीत.

नांदूरवैद्य : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात दरवर्षी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या उशाशी असलेल्या नांदूरवैद्य येथील महिलादेखील या पाणीटंचाईपासून सुटल्या नाहीत. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे पाच ते सहा महिन्यांपासून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम रखडल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे नांदूरवैद्य येथील शेतकरी दत्तू शांताराम दिवटे व सागर शांताराम दिवटे या दोन बंधूंनी गावातील महिलांची होणारी कसरत पाहून सामाजिक जाणिवेतून आपल्या शेतीची कामे बाजूला ठेवत दररोज गावाची मोफत तहान भागवित आहेत. यामुळे त्यांचा एक वर्षाचा ग्रामपंचायतीचा कर पूर्णपणे माफ करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.नांदूरवैद्य येथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत असल्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी दूरवर जावे लागत होते. नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीच्या नवीन विहिरीचे खोदकाम करण्यास सुरु वात केली असून, आजपर्यंत विहिरीचे काम पूर्ण न झाल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.यामुळे शेतकरी दिवटे बंधंूनी उदात्त भावनेने त्यांच्या शेतातील पाइपलाइनद्वारे ग्रामस्थांना पाण्याची सोय करून दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी गावातील नागरिकांना पाणी देतेवेळी त्यांच्या शेतातील उभ्या पिकाला पाणी न देता व लाईटबिलाची चिंता केली नाही. यामुळे ग्रामपंचायतीने त्यांच्याकडून येणे असलेला एक वर्षाचा ग्रामपंचायत कर माफ करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.-------------------------नांदूरवैद्य गावात पाणीपुरवठा करणाºया मुख्य विहिरीचे काम रखडल्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली वणवण न पहावल्यामुळे आम्ही दोन्हीही बंधूंनी निर्णय घेत एक सामाजिक बांधिलकी या नात्याने गावासाठी शेतीची कामे बाजूला सारून ठेवत शेतीच्या पंपाद्वारे ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी सोय केली.- दत्तू व सागर दिवटे, शेतकरी, नांदूरवैद्य 

टॅग्स :Nashikनाशिक