शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी भागवताहेत तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:30 IST

नांदूरवैद्य : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात दरवर्षी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या उशाशी असलेल्या नांदूरवैद्य येथील महिलादेखील या पाणीटंचाईपासून सुटल्या नाहीत.

नांदूरवैद्य : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात दरवर्षी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या उशाशी असलेल्या नांदूरवैद्य येथील महिलादेखील या पाणीटंचाईपासून सुटल्या नाहीत. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे पाच ते सहा महिन्यांपासून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम रखडल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे नांदूरवैद्य येथील शेतकरी दत्तू शांताराम दिवटे व सागर शांताराम दिवटे या दोन बंधूंनी गावातील महिलांची होणारी कसरत पाहून सामाजिक जाणिवेतून आपल्या शेतीची कामे बाजूला ठेवत दररोज गावाची मोफत तहान भागवित आहेत. यामुळे त्यांचा एक वर्षाचा ग्रामपंचायतीचा कर पूर्णपणे माफ करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.नांदूरवैद्य येथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत असल्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी दूरवर जावे लागत होते. नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीच्या नवीन विहिरीचे खोदकाम करण्यास सुरु वात केली असून, आजपर्यंत विहिरीचे काम पूर्ण न झाल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.यामुळे शेतकरी दिवटे बंधंूनी उदात्त भावनेने त्यांच्या शेतातील पाइपलाइनद्वारे ग्रामस्थांना पाण्याची सोय करून दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी गावातील नागरिकांना पाणी देतेवेळी त्यांच्या शेतातील उभ्या पिकाला पाणी न देता व लाईटबिलाची चिंता केली नाही. यामुळे ग्रामपंचायतीने त्यांच्याकडून येणे असलेला एक वर्षाचा ग्रामपंचायत कर माफ करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.-------------------------नांदूरवैद्य गावात पाणीपुरवठा करणाºया मुख्य विहिरीचे काम रखडल्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली वणवण न पहावल्यामुळे आम्ही दोन्हीही बंधूंनी निर्णय घेत एक सामाजिक बांधिलकी या नात्याने गावासाठी शेतीची कामे बाजूला सारून ठेवत शेतीच्या पंपाद्वारे ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी सोय केली.- दत्तू व सागर दिवटे, शेतकरी, नांदूरवैद्य 

टॅग्स :Nashikनाशिक