शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

शेतकरी भागवताहेत तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:30 IST

नांदूरवैद्य : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात दरवर्षी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या उशाशी असलेल्या नांदूरवैद्य येथील महिलादेखील या पाणीटंचाईपासून सुटल्या नाहीत.

नांदूरवैद्य : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात दरवर्षी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या उशाशी असलेल्या नांदूरवैद्य येथील महिलादेखील या पाणीटंचाईपासून सुटल्या नाहीत. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे पाच ते सहा महिन्यांपासून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम रखडल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे नांदूरवैद्य येथील शेतकरी दत्तू शांताराम दिवटे व सागर शांताराम दिवटे या दोन बंधूंनी गावातील महिलांची होणारी कसरत पाहून सामाजिक जाणिवेतून आपल्या शेतीची कामे बाजूला ठेवत दररोज गावाची मोफत तहान भागवित आहेत. यामुळे त्यांचा एक वर्षाचा ग्रामपंचायतीचा कर पूर्णपणे माफ करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.नांदूरवैद्य येथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत असल्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी दूरवर जावे लागत होते. नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीच्या नवीन विहिरीचे खोदकाम करण्यास सुरु वात केली असून, आजपर्यंत विहिरीचे काम पूर्ण न झाल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.यामुळे शेतकरी दिवटे बंधंूनी उदात्त भावनेने त्यांच्या शेतातील पाइपलाइनद्वारे ग्रामस्थांना पाण्याची सोय करून दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी गावातील नागरिकांना पाणी देतेवेळी त्यांच्या शेतातील उभ्या पिकाला पाणी न देता व लाईटबिलाची चिंता केली नाही. यामुळे ग्रामपंचायतीने त्यांच्याकडून येणे असलेला एक वर्षाचा ग्रामपंचायत कर माफ करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.-------------------------नांदूरवैद्य गावात पाणीपुरवठा करणाºया मुख्य विहिरीचे काम रखडल्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली वणवण न पहावल्यामुळे आम्ही दोन्हीही बंधूंनी निर्णय घेत एक सामाजिक बांधिलकी या नात्याने गावासाठी शेतीची कामे बाजूला सारून ठेवत शेतीच्या पंपाद्वारे ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी सोय केली.- दत्तू व सागर दिवटे, शेतकरी, नांदूरवैद्य 

टॅग्स :Nashikनाशिक