शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 19:23 IST

खेडलेझुंगे : येथे उसाची लागवडी खालील शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने मागील वर्षापासुन ग्रामस्थांना बिबट्याचा वारंवार वावर आढळुन आल्याने येथील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : शेतीला पाणी देण्याकरीता जातात गटा गटाने

खेडलेझुंगे : येथे उसाची लागवडी खालील शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने मागील वर्षापासुन ग्रामस्थांना बिबट्याचा वारंवार वावर आढळुन आल्याने येथील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.पाळीव कुत्रे, जनावरांवर हल्ले झालेले आहे. त्यातच येथील बोरमाथा वस्तीत वास्तव्यास असलेले योगेश साबळे यांच्या गट नंबर ४६३ मध्ये कांदा पिक काढल्यानंतर शेतात मेंढ्याचा कळप बसविलेला आहे.बुधवारी (दि.१०) मध्यरात्री ३ च्या सुमारास बिबट्याने शेळी आणि घोड्यावर हल्ला करून त्यांना मृत्युमुखी पाडले. दुपारी उशिरापर्यंत वन विभागाचे संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विजय टेकणर यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला.बिबट्याने मानवी वसाहतीजवळ असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर केलेल्या हल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेले आहे. शेतकरी वर्ग सकाळी उशीरा घराच्या बाहेर पडणे पसंत करत आहेत.शेतामध्ये काम करणे येथील शेतकऱ्यांना जिकीरीचे झालेले आहे. दिवसा उन्हाचा तडाखा असल्याने शेतामध्ये सायंकाळी किंवा पहाटे जीव मुठीत धरु न पाणी देण्याचे कामकाज ४-५ शेतकरी एकत्र येवुन करत आहेत. परंतु विज कंपनीकडुन शेती पंपांसाठी रात्रीच विजपुरवठा केला जात असल्याने येथील शेतकऱ्यांपुढे पीक जगविण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.विज वितरण विभागाने दिवसा शेतीपंपासाठी वीज द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे.परिसरामध्ये नेमके किती बिबट्यांचा वावर आहे हे नक्की सांगता येत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वन विभागाने परिसरामध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन परिसरामध्ये पिंजरे लावुन येथील शेतकरी वर्गाला भयमुक्त करावे.- विजय गिते,माजी उपसरपंच, खेडलेझुंगे.येथील परिसरात शेती कामासाठी शेतकरी व कामगार शेती कामास येण्यासाठी टाळाटाळ करत आहे. जादा दराने बाहेरु न कामगार उपलब्ध करावे लागत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या हल्यामुळे रहीवाशी व शेत कामगार भयभीत झालेले आहे. यापुर्वी वन्यप्राण्यांकडुन मानवी वसाहतीजवळ असे प्राणघातक हल्ले झालेले नव्हते. आज रोजी येथील जनजीवन विस्कळीत होत आहे. तरी वन विभागाने कर्मचारी वाढवुन शेतकºयांना सहकार्य करावे.- योगेश साबळे, शेतकरी.