शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 19:23 IST

खेडलेझुंगे : येथे उसाची लागवडी खालील शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने मागील वर्षापासुन ग्रामस्थांना बिबट्याचा वारंवार वावर आढळुन आल्याने येथील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : शेतीला पाणी देण्याकरीता जातात गटा गटाने

खेडलेझुंगे : येथे उसाची लागवडी खालील शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने मागील वर्षापासुन ग्रामस्थांना बिबट्याचा वारंवार वावर आढळुन आल्याने येथील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.पाळीव कुत्रे, जनावरांवर हल्ले झालेले आहे. त्यातच येथील बोरमाथा वस्तीत वास्तव्यास असलेले योगेश साबळे यांच्या गट नंबर ४६३ मध्ये कांदा पिक काढल्यानंतर शेतात मेंढ्याचा कळप बसविलेला आहे.बुधवारी (दि.१०) मध्यरात्री ३ च्या सुमारास बिबट्याने शेळी आणि घोड्यावर हल्ला करून त्यांना मृत्युमुखी पाडले. दुपारी उशिरापर्यंत वन विभागाचे संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विजय टेकणर यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला.बिबट्याने मानवी वसाहतीजवळ असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर केलेल्या हल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेले आहे. शेतकरी वर्ग सकाळी उशीरा घराच्या बाहेर पडणे पसंत करत आहेत.शेतामध्ये काम करणे येथील शेतकऱ्यांना जिकीरीचे झालेले आहे. दिवसा उन्हाचा तडाखा असल्याने शेतामध्ये सायंकाळी किंवा पहाटे जीव मुठीत धरु न पाणी देण्याचे कामकाज ४-५ शेतकरी एकत्र येवुन करत आहेत. परंतु विज कंपनीकडुन शेती पंपांसाठी रात्रीच विजपुरवठा केला जात असल्याने येथील शेतकऱ्यांपुढे पीक जगविण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.विज वितरण विभागाने दिवसा शेतीपंपासाठी वीज द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे.परिसरामध्ये नेमके किती बिबट्यांचा वावर आहे हे नक्की सांगता येत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वन विभागाने परिसरामध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन परिसरामध्ये पिंजरे लावुन येथील शेतकरी वर्गाला भयमुक्त करावे.- विजय गिते,माजी उपसरपंच, खेडलेझुंगे.येथील परिसरात शेती कामासाठी शेतकरी व कामगार शेती कामास येण्यासाठी टाळाटाळ करत आहे. जादा दराने बाहेरु न कामगार उपलब्ध करावे लागत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या हल्यामुळे रहीवाशी व शेत कामगार भयभीत झालेले आहे. यापुर्वी वन्यप्राण्यांकडुन मानवी वसाहतीजवळ असे प्राणघातक हल्ले झालेले नव्हते. आज रोजी येथील जनजीवन विस्कळीत होत आहे. तरी वन विभागाने कर्मचारी वाढवुन शेतकºयांना सहकार्य करावे.- योगेश साबळे, शेतकरी.