शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 19:23 IST

खेडलेझुंगे : येथे उसाची लागवडी खालील शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने मागील वर्षापासुन ग्रामस्थांना बिबट्याचा वारंवार वावर आढळुन आल्याने येथील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : शेतीला पाणी देण्याकरीता जातात गटा गटाने

खेडलेझुंगे : येथे उसाची लागवडी खालील शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने मागील वर्षापासुन ग्रामस्थांना बिबट्याचा वारंवार वावर आढळुन आल्याने येथील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.पाळीव कुत्रे, जनावरांवर हल्ले झालेले आहे. त्यातच येथील बोरमाथा वस्तीत वास्तव्यास असलेले योगेश साबळे यांच्या गट नंबर ४६३ मध्ये कांदा पिक काढल्यानंतर शेतात मेंढ्याचा कळप बसविलेला आहे.बुधवारी (दि.१०) मध्यरात्री ३ च्या सुमारास बिबट्याने शेळी आणि घोड्यावर हल्ला करून त्यांना मृत्युमुखी पाडले. दुपारी उशिरापर्यंत वन विभागाचे संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विजय टेकणर यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला.बिबट्याने मानवी वसाहतीजवळ असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर केलेल्या हल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेले आहे. शेतकरी वर्ग सकाळी उशीरा घराच्या बाहेर पडणे पसंत करत आहेत.शेतामध्ये काम करणे येथील शेतकऱ्यांना जिकीरीचे झालेले आहे. दिवसा उन्हाचा तडाखा असल्याने शेतामध्ये सायंकाळी किंवा पहाटे जीव मुठीत धरु न पाणी देण्याचे कामकाज ४-५ शेतकरी एकत्र येवुन करत आहेत. परंतु विज कंपनीकडुन शेती पंपांसाठी रात्रीच विजपुरवठा केला जात असल्याने येथील शेतकऱ्यांपुढे पीक जगविण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.विज वितरण विभागाने दिवसा शेतीपंपासाठी वीज द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे.परिसरामध्ये नेमके किती बिबट्यांचा वावर आहे हे नक्की सांगता येत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वन विभागाने परिसरामध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन परिसरामध्ये पिंजरे लावुन येथील शेतकरी वर्गाला भयमुक्त करावे.- विजय गिते,माजी उपसरपंच, खेडलेझुंगे.येथील परिसरात शेती कामासाठी शेतकरी व कामगार शेती कामास येण्यासाठी टाळाटाळ करत आहे. जादा दराने बाहेरु न कामगार उपलब्ध करावे लागत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या हल्यामुळे रहीवाशी व शेत कामगार भयभीत झालेले आहे. यापुर्वी वन्यप्राण्यांकडुन मानवी वसाहतीजवळ असे प्राणघातक हल्ले झालेले नव्हते. आज रोजी येथील जनजीवन विस्कळीत होत आहे. तरी वन विभागाने कर्मचारी वाढवुन शेतकºयांना सहकार्य करावे.- योगेश साबळे, शेतकरी.