शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

शेतकरी आंदोलनाची सत्ताधारी आमदारांना धास्ती

By श्याम बागुल | Updated: November 30, 2018 18:24 IST

नाशिक : दुष्काळाची घोषणा होवून महिना उलटत चालला असूनही प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात एक दमडीही पडलेली नाही, पिण्याच्या पाण्यासाठी करावे ...

ठळक मुद्देनिवडणूक : दुष्काळी मदत, कांद्याला भावाची प्रतीक्षा

नाशिक : दुष्काळाची घोषणा होवून महिना उलटत चालला असूनही प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात एक दमडीही पडलेली नाही, पिण्याच्या पाण्यासाठी करावे लागणारे आंदोलन व त्यातच टमाट्या पाठोपाठ मातीमोल भावात कांदा विकावा लागल्याने गावोगावच्या शेतकºयांमध्ये व्यक्त होणा-या संतापाची सत्ताधारी पक्षासह विरोधी आमदारांनाही धास्ती वाटू लागली आहे. शेतकरी खुलेआमपणे लोकप्रतिनिधींच्या नावाने बोटे मोडत असल्याने आगामी निवडणुकीला कसे सामोरे जायचे? असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे.शेतक-यांचे जीवनमान निसर्गावर अवलंबून असून, यंदा पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे शेतकºयांचा खरीप व रब्बीचा हंगाम वाया गेला आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आॅक्टोबरपासून भेडसावू लागला असून, जनावरांचा चाराही संपुष्टात आला आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करून त्याच्या उपाययोजना लागू केल्या, परंतु दृष्य स्वरूपात त्या शेतकºयांना दिलासा देऊ शकत नाही, उलट दुष्काळी मदत रोख स्वरूपात मिळाली तरच त्याला शेतीची पुढची तयारी करता येणार आहे. मात्र ही मदत कधी व किती मिळेल याचा कोणतीही शाश्वती कोणीही देत नाही. अशा परिस्थितीत उन्हाळ कांदा बाजारात विक्रीसाठी काढला तर त्याला एक रुपयांपर्यंतच भाव मिळू लागला, टमाट्याची परिस्थितीही तीच असून, शेतकºयांनी टमाट्याच्या शेतात जनावरे सोडून दिले आहेत. भाजीपाल्याचा उठाव कमी झाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून दर स्थिर झाले आहेत. शासनाने कांद्याला हमीभाव द्यावा या मागणीसाठी कांदा रस्त्यावर ओतण्यास व त्या माध्यमातून सरकारच्या विरोधात गावोगावी आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनांना विरोधीपक्षही हवा देत असल्यामुळे सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत दररोज तीन ते चार ठिकाणी आंदोलने होत असून, आंदोलनकर्त्यांचा मुख्य रोष सरकारविरोधात आहे. अशा परिस्थितीत सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीला कसे सामोरे जावे या काळजीने सत्ताधारी आमदारांना ग्रासले आहे. समाधानाची बाब म्हणजे राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्याने त्याचा लाभ उठविण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यापलीकडे सत्ताधाºयांच्या हातात काहीच शिल्लक नसल्याने त्यांनी शेतकºयांचा रोष कमी व्हावा म्हणून दुष्काळ व शेतीमालाच्या दराच्या प्रश्नापासून दूर नेण्यासाठी मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिल्याचा प्रचार व प्रसार करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक