शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी कांदा लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 12:47 IST

लासलगाव : केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी येथील बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अर्धा तास लिलाव बंद पाडत प्रवेशद्वारावर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.

लासलगाव : केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी येथील बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अर्धा तास लिलाव बंद पाडत प्रवेशद्वारावर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांकडे अत्यल्प कांदा शिल्लक असून, बाजारात आवक मंदावल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप सुरू केला आहे.त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील सर्वच ठिकाणच्या कांदा उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली असून शेतकरी संतप्त झाले आहेत. केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी तातडीने रद्द करावी तसेच परदेशातून कुठलाही प्रकारचा कांदा आयात करू नये, कांदा व्यापाºयांवरील कांदा साठवणूकीचे निर्बंध उठवावे व किमान निर्यातमूल्य कायमस्वरूपी रद्द करून निर्यात सुरू करून शेतकºयांना आर्थिक न्याय द्यावा अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव येथे झालेल्या आंदोलनात केली.मागील काही दिवसांपासून राज्यातील व देशातील विविध राजकीय पक्षांनी व संघटनांनी कांदा भाव वाढीविरोधात आंदोलने करून कांदा बाजारभाव पाडण्याचे काम सुरू केले आहे. दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शुक्र वारी सकाळी नऊ वाजता सुमारे अर्धा तास कांदा लिलाव बंद पाडून कांदा भाव वाढीला विरोध करणाºया सर्वच राजकीय पक्ष व संघटना यांच्या विरोधात, कांद्याच्या निर्यात बंदी विरोधात तसेच सरकार घेत असलेल्या विविध शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी कांदा उत्पादक शेतकरी शैलेंद्र पाटील यांनी सांगितले की, सरकारने कांदा दर कमी करण्याचा हट्ट चालवला आहे.एकहाती सत्तेमुळे केंद्र सरकार अती करण्याचा प्रयत्न करत आहे.कांदा बाजारभाव पाडण्याचा हस्तक्षेप सरकारने वेळीच थांबवावा.सध्या शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष आहे.जर असे शेतकरी विरोधी निर्णय केंद्र सरकारने मागे घेतले नाही तर कांदा उत्पादक राज्यस्तरीय आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक