शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
3
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
4
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
5
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
6
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
7
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
8
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
9
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
10
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
11
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
12
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
13
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
14
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
15
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
16
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
17
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
19
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
20
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनात उभी फूट १ मार्चच्या संपातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:22 IST

नाशिक : पुणतांबे येथील शेतकºयांनी १ जूनपासून पुकारलेल्या शेतकरी संपाच्या माध्यमातून राज्यभरात उभे राहिलेल्या आंदोलनात विविध टप्प्यांवर चढउतारानंतर अखेर फूट पडली आहे.

ठळक मुद्दे सुकाणू सदस्यांचा समिती विसर्जित केल्याचा दावा सुकाणू समितीत विसर्जित करीत असल्याची घोषणा

नाशिक : पुणतांबे येथील शेतकºयांनी १ जूनपासून पुकारलेल्या शेतकरी संपाच्या माध्यमातून राज्यभरात उभे राहिलेल्या आंदोलनात विविध टप्प्यांवर चढउतारानंतर अखेर फूट पडली आहे. पुणतांब्याच्या समितीने ३ जूनच्या मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसोबत संपातून माघार घेतल्यानंतरही नाशिकच्या शेतकºयांनी हा संप पुढे नेटाने चालवत सुकाणू समितीची स्थापना केली होती. परंतु, आता नाशिक-मधीलच एका गटाने १ जानेवारीला सुकाणू समितीच्या राज्यस्तरीय बैठकीचे नियोजन केले असताना दुसºया गटाने सुकाणू समितीत विसर्जित करीत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आंदोलनाचे केंद्र बनलेल्या नाशिकमधूनच शेतकरी आंदोलनात उभी फूट पडली आहे.पंडित कॉलनीत झालेल्या बैठकीत सुकाणू समिती सदस्य हंसराज वडघुले, अमृता पवार, चंद्रकांत बनकर कैलास खांडबहाले यांनी विविध शेतकरी संघटनांसह सामाजिक संघटनांची बैठक घेऊन सुकाणू समिती विसर्जित करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. तसेच औरंगाबाद येथील बैठकीत झालेल्या १ मार्चपासून संप पुकारण्याच्या निर्णयालाही या बैठकीत विरोध करण्यात आला आहे. पुणतांबे येथील शिष्टमंडळाने शासनाशी केलेली तडजोड मान्य न झाल्याने नशिक येथील संयोजन समितीने निर्णायक बैठक घेऊन शेतकºयांचे आंदोलन पुढे नेण्याचा आणि या आंदोलनाचा राज्यव्यापी करण्याचा निर्धार करीत ५ जून २०१७ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून सुकाणू समितीची स्थापना केली होती. या समितीच्या प्रयत्नातून शासनाला अंशत: क ा होईना कर्जमुक्ती देण्यास भाग पाडल्याचा दावा या समितीच्या सदस्यांनी केला आहे. परंतु, नजीकच्या काळात सुकाणू समितीचे कामकाज दिशाहीन झाल्याची कबुली देत समितीच्या सदस्यांनी मूळ संयोजन समिती, कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता काही ठराविक संधीसाधू व्यक्ती निर्णय जाहीर करीत असल्याने आंदोलनाची मूळ संयोजन समिती म्हणून राज्याची सुकाणू समिती विसर्जित करण्यात आल्याचे घोषित केले. यावेळी नाना बच्छाव, माधुरी भदाणे, चेतन शेलार, प्रकाश चव्हाण, गंगाधर निखाडे आदी उपस्थित होते. संप हाणून पाडण्याचा इशाराल्ल औरंगाबाद येथे सुकाणू समितीच्या नावाने काही मोजक्या लोकांनी १ मार्च २०१८ पासून पुन्हा शेतकरी संपाची हाक दिली आहे. या काळात शेतकºयांची द्राक्ष, कांदे, ऊस, टमाटा, भाजीपाला अशा विविध प्रकारचा शेतमाल बाजारात विक्रीसाठी येणार असल्याने संपामुळे शेतकºयांचे नुकसान होणार असल्याने संयोजन समितीने या निर्णयाचा विरोध केला असून, संप हाणून पाडण्याचा इशाराही दिला आहे.नाशिकच्या सुकाणू समिती पदाधिकारी यांनी जी भूमिका घेतली आहे, जे मुद्दे मांडले आहेत ते प्रश्न १ जानेवारीच्या बैठकीत मांडणार आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या सुरूच असून, संपूर्ण कर्जमुक्ती झालेली नाही. सुकाणूच्या माध्यमातून एकत्रित काम करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय सामुदायिक घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी संघटनेचे सर्व नेते एकत्र राहणे आवश्यक असून, याचा विचार सुकाणू समितीतील सर्वांनी करावा व शेतकºयांचा लढा पुढे सुरू ठेवावा. दूर जाणाºया सहकाºयांनाही विश्वासात घेण्याची गरज आहे.- राजू देसले, सुकाणू सदस्य, किसान सभा, नाशिकसुकाणू समिती विसर्जित करण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांच्यासह हंसराज वडघुले, चंद्रकांत बनकर, कैलास खांडबहाले, नाना बच्छाव, माधुरी भदाणे, चेतन शेलार, प्रकाश चव्हाण आदी.बैठकीतील निर्णय नाशिकच्या संयोजन समितीने सुकाणू समितीच विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. समितीच्या नावाने कोणीही पत्रव्यवहार, आंदोलन केल्यास त्याचा मूळ आंदोलनाशी संबंध राहणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीची व्याप्ती वाढवून पुनर्रचना करण्यासोबतच अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसोबत काम करण्याचा निर्णयही घेण्यात आला.