शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भूसंपादन केलेल्या जमिनींच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक; आयुक्तांच्या दालनात प्रश्नांचा भडिमार

By suyog.joshi | Updated: March 15, 2024 15:33 IST

महापालिकेच्यावतीने वेगवेगळ्या कामांसाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने माेबदला द्यावा तसेच पैसे बॉण्ड अगर टीडीआरने देऊ नये असा आक्रमक पवित्रा घेतला.

नाशिक (सुयोग जोशी) : महापालिकेच्यावतीने वेगवेगळ्या कामांसाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने माेबदला द्यावा तसेच पैसे बॉण्ड अगर टीडीआरने देऊ नये असा आक्रमक पवित्रा घेतला. विविध प्रश्नांचा भडीमार आयुक्त डॉ. अशोेक करंजकर व नगररचनाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर यांच्यावर केला. याबाबत दहा दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी परिसरातील शेतकऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली.

मनपाने वेगवेगळ्या कारणासाठी गेल्या २० वर्षापासून आरक्षित करून ताब्यात घेतल्या आहेत. यात साधूग्रामची जागेचाही समावेश आहे. तसेच आगामी सिंहस्थासाठी प्रसंगी जागाही न देण्याचा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला. न्यायालयाने आदेश देऊनही अद्याप मोबदला मिळालेला नाही. सध्या मनपातर्फे ठराविक बिल्डर्सला भूसंपादनचा मोबदला देण्यात येत आहे. हे करत असतांना अनेक ठिकाणी मिसिंग लिंक लक्षात घेऊन प्राधान्य क्रमाने मोबदला देण्यात यावा व सर्वात आधी शेतकऱ्यांना प्राधान्याने मोबदला देण्यात यावा. बिल्डर धार्जनी भूसंपादन योजना तत्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी आयुक्तांकडे केली आहे. यावेळी शेतकरी राजाराम क्षीरसागर, शिवाजी गवळी, योगेश लोहकरे, समाधान जेजूरकर, रामकृष्ण गांगुर्डे, ज्ञानेश्वर कोठूळे, बाळासाहेब विधाते, प्रकाश शिंदे, संजय शिंदे, प्रकाश सूर्यवंशी, किरण थोरात, संजय पवार, सागर पवार आदी उपस्थित होते.सिंहस्थ समितीत शेतकऱ्यांना स्थान द्या

आगमी सिंहस्थाच्या पाश्व'भूमीवर जिल्हा आणि मनपा प्रशासनाच्यावतीने वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात येतात. त्यात काय निर्णय होतो. याची आम्हाला माहिती होत नाही. अनेकवेळा काही गोष्टी चुकीच्याही होतात, चुकीचे निर्णय घेतले जातात. मग आम्ही सांगितल्यानंतर त्यावर सारवासारव केली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांशी निगडीत सर्वच समित्यांवर स्थान देण्यात यावे अशी मागणी केली.