शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:17 IST

नांदूरशिंगोटे : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने बळीराजा धास्तावला आहे. बदलत्या वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होत आहे. ऐन थंडीच्या दिवसांत बदलत्या हवामानामुळे दररोज वेगवेगळ्या ऋतुंचा अनुभव येत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देसिन्नर तालुका : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका

बदलत्या वातावरणाचा सरळ रब्बी हंगामातील हरभरा, गहू, कांदा, मका आदी पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात दररोज बदल होत असल्याने कधी पाऊस तर कधी धुके, तर दिवसभर कडक उन्हाचा चटका व रात्री कडाक्याची थंडी अशा वातावरणाचा अनुभव येत आहे. नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गतवर्षी पावसाचे प्रमाण चांगल्या प्रमाणात असल्याने परिसरात पाणीटंचाई नाही. चांगल्या प्रमाणात पाऊस होऊनही शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नव्हते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून परिसरात वातावरणातील बदल पिकांसाठी हानिकारक ठरत आहे. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे बळीराजा धास्तावला आहे. वातावरणात कमालीचा गारठा व रोगट परिस्थिती असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. शेतकऱ्यांनी महागडी कांदा रोपे विकत घेऊन बियाणे तयार केले होते. त्यानंतर, कांदा लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.अनियमित वीजपुरवठाएकीकडे अनियमित वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही, तर दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे महागडी फवारणीचे औषधे घ्यावी लागत असल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. या वर्षी कांदा पिकाला चांगला भाव मिळत असल्याने, सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली आहे. ढगाळ वातावरणाचा कांदा पिकांबरोबरच अन्य शेती मालावर परिणाम होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती