शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

शेतकरी भयग्रस्त, महावितरण सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:03 IST

महाराष्ट्र राज्य आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना ग्रामीण भागातील विजेचे जाळे तब्बल चार दशकांपूर्वी शेतातून ओढले असल्याने त्यांची क्षमता संपल्याने जीर्ण झालेल्या तारांमुळे गोदाकाठ भागात तारांच्या शॉर्टसर्किटमुळे उसाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असले तरी तारा बदलण्यासाठी वीज वितरण कंपनी कोणतेही पाऊल उचलत नसल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.

सायखेडा : महाराष्ट्र राज्य आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना ग्रामीण भागातील विजेचे जाळे तब्बल चार दशकांपूर्वी शेतातून ओढले असल्याने त्यांची क्षमता संपल्याने जीर्ण झालेल्या तारांमुळे गोदाकाठ भागात तारांच्या शॉर्टसर्किटमुळे उसाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असले तरी तारा बदलण्यासाठी वीज वितरण कंपनी कोणतेही पाऊल उचलत नसल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.१९७० च्या कालखंडात ग्रामीण भागात शेतीसाठी वीज आली. त्या अगोदर बैलांच्या मदतीने चामड्याच्या मोटेद्वारे विहिरीतून पाणी बाहेर काढून शेतीला पाणीपुरवठा केला जात होता, त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आणि शेतकºयांच्या बांधावर शेतीसाठी वीज पोहोचली. विजेवर चालणारे पंप बाजारात उपलब्ध झाले, काम सोपे झाले, कमी वेळात जास्त पाणी शेतीला देता येऊ लागले. त्यावेळी शेतातून ठरावीक उंचीवरून तारा ओढल्या गेल्या. आज इतके दिवस झाले तरी अद्याप शासनाने तारा बदलल्या नाही, तारा त्याच असल्याने क्षमता कमी झाली आहे. पर्यायाने तारांना झोल पडला आहे, त्यामुळे तारा खाली आल्याने तारांचा स्पर्श एकमेकांना होतो, त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन विजेचे लोळ पडतात. अनेक ठिकाणी डीपीमध्ये फ्यूज आणि तारा नसल्याने तिथे शेतकरी स्वत:च्या हाताने तारांचे फ्यूज टाकत असल्याने स्पार्किंग होते. शेतात उसासारखे पीक असल्याने पाचट तत्काळ पेट घेते, त्यामुळे शेजारील पिके आगीत भस्मसात होत आहे.