शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शेतकरी भयग्रस्त, महावितरण सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:03 IST

महाराष्ट्र राज्य आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना ग्रामीण भागातील विजेचे जाळे तब्बल चार दशकांपूर्वी शेतातून ओढले असल्याने त्यांची क्षमता संपल्याने जीर्ण झालेल्या तारांमुळे गोदाकाठ भागात तारांच्या शॉर्टसर्किटमुळे उसाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असले तरी तारा बदलण्यासाठी वीज वितरण कंपनी कोणतेही पाऊल उचलत नसल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.

सायखेडा : महाराष्ट्र राज्य आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना ग्रामीण भागातील विजेचे जाळे तब्बल चार दशकांपूर्वी शेतातून ओढले असल्याने त्यांची क्षमता संपल्याने जीर्ण झालेल्या तारांमुळे गोदाकाठ भागात तारांच्या शॉर्टसर्किटमुळे उसाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असले तरी तारा बदलण्यासाठी वीज वितरण कंपनी कोणतेही पाऊल उचलत नसल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.१९७० च्या कालखंडात ग्रामीण भागात शेतीसाठी वीज आली. त्या अगोदर बैलांच्या मदतीने चामड्याच्या मोटेद्वारे विहिरीतून पाणी बाहेर काढून शेतीला पाणीपुरवठा केला जात होता, त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आणि शेतकºयांच्या बांधावर शेतीसाठी वीज पोहोचली. विजेवर चालणारे पंप बाजारात उपलब्ध झाले, काम सोपे झाले, कमी वेळात जास्त पाणी शेतीला देता येऊ लागले. त्यावेळी शेतातून ठरावीक उंचीवरून तारा ओढल्या गेल्या. आज इतके दिवस झाले तरी अद्याप शासनाने तारा बदलल्या नाही, तारा त्याच असल्याने क्षमता कमी झाली आहे. पर्यायाने तारांना झोल पडला आहे, त्यामुळे तारा खाली आल्याने तारांचा स्पर्श एकमेकांना होतो, त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन विजेचे लोळ पडतात. अनेक ठिकाणी डीपीमध्ये फ्यूज आणि तारा नसल्याने तिथे शेतकरी स्वत:च्या हाताने तारांचे फ्यूज टाकत असल्याने स्पार्किंग होते. शेतात उसासारखे पीक असल्याने पाचट तत्काळ पेट घेते, त्यामुळे शेजारील पिके आगीत भस्मसात होत आहे.