शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

शेतकरी समुपदेशन निव्वळ फार्स

By admin | Updated: July 3, 2016 00:23 IST

शेतकरी समुपदेशन निव्वळ फार्स

नाशिक : जिल्ह्यात वाढत्या शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना त्यापासून परावृत्त करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा फोल ठरला असून, शुक्रवारी बॅँकेचे कर्ज डोक्यावर घेऊन आत्महत्त्या करण्याच्या मन:स्थितीत असलेल्या तिघा शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपल्यावरील कर्जफेडीबाबत समुपदेशन करण्याची मागणी केली, परंतु बॅँकेच्या कर्जासंबंधीचा विषय अखत्यारित येत नसल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजनांचा आधार घेतला आहे. त्यात प्रामुख्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांचे गावोगावी मेळावे घेण्याबरोबरच त्यांचे समुपदेशन करून आत्महत्त्या करण्यापासून रोखणे याला प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले. एवढेच नव्हे तर कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्त्या न करता थेट आपल्याला भेटावे, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी केले होते.पावसाळा सुरू होऊनही यंदा वरुणराजाने अजूनही आपली कृपादृष्टी न केल्याने शेतकऱ्यांची अडचण कायम असून, दुसरीकडे बॅँकांचा कर्जफेडीसाठी तगादा सुरू झाल्यामुळे शुक्रवारी अशा तगाद्याला कंटाळलेल्या तिघा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून समुपदेशन केंद्राचा शोध घेतला. समुपदेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी या शेतकऱ्यांनी बॅँकेच्या कर्जाची कागदपत्रेही सोबत आणली होती, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात अशा प्रकारचे कोणतेही समुपदेशन केंद्र अस्तित्वात नसल्याचे पाहून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे दालन गाठले असता, जिल्हाधिकारीही कार्यालयात हजर नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना टंचाई शाखेत पाठविण्यात आले, परंतु तेथेही या शेतकऱ्यांची समजूत निघू शकलेली नाही. अखेर समुपदेशन न होताच कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी माघारी फिरणे पसंत केले. याचाच अर्थ जिल्हा प्रशासनाचा शेतकरी समुपदेशनाचा निव्वळ फार्स ठरला आहे.