शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

शेतकरी समुपदेशन निव्वळ फार्स

By admin | Updated: July 3, 2016 00:23 IST

शेतकरी समुपदेशन निव्वळ फार्स

नाशिक : जिल्ह्यात वाढत्या शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना त्यापासून परावृत्त करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा फोल ठरला असून, शुक्रवारी बॅँकेचे कर्ज डोक्यावर घेऊन आत्महत्त्या करण्याच्या मन:स्थितीत असलेल्या तिघा शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपल्यावरील कर्जफेडीबाबत समुपदेशन करण्याची मागणी केली, परंतु बॅँकेच्या कर्जासंबंधीचा विषय अखत्यारित येत नसल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजनांचा आधार घेतला आहे. त्यात प्रामुख्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांचे गावोगावी मेळावे घेण्याबरोबरच त्यांचे समुपदेशन करून आत्महत्त्या करण्यापासून रोखणे याला प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले. एवढेच नव्हे तर कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्त्या न करता थेट आपल्याला भेटावे, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी केले होते.पावसाळा सुरू होऊनही यंदा वरुणराजाने अजूनही आपली कृपादृष्टी न केल्याने शेतकऱ्यांची अडचण कायम असून, दुसरीकडे बॅँकांचा कर्जफेडीसाठी तगादा सुरू झाल्यामुळे शुक्रवारी अशा तगाद्याला कंटाळलेल्या तिघा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून समुपदेशन केंद्राचा शोध घेतला. समुपदेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी या शेतकऱ्यांनी बॅँकेच्या कर्जाची कागदपत्रेही सोबत आणली होती, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात अशा प्रकारचे कोणतेही समुपदेशन केंद्र अस्तित्वात नसल्याचे पाहून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे दालन गाठले असता, जिल्हाधिकारीही कार्यालयात हजर नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना टंचाई शाखेत पाठविण्यात आले, परंतु तेथेही या शेतकऱ्यांची समजूत निघू शकलेली नाही. अखेर समुपदेशन न होताच कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी माघारी फिरणे पसंत केले. याचाच अर्थ जिल्हा प्रशासनाचा शेतकरी समुपदेशनाचा निव्वळ फार्स ठरला आहे.