शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

शेतकरी समुपदेशन निव्वळ फार्स

By admin | Updated: July 3, 2016 00:23 IST

शेतकरी समुपदेशन निव्वळ फार्स

नाशिक : जिल्ह्यात वाढत्या शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना त्यापासून परावृत्त करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा फोल ठरला असून, शुक्रवारी बॅँकेचे कर्ज डोक्यावर घेऊन आत्महत्त्या करण्याच्या मन:स्थितीत असलेल्या तिघा शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपल्यावरील कर्जफेडीबाबत समुपदेशन करण्याची मागणी केली, परंतु बॅँकेच्या कर्जासंबंधीचा विषय अखत्यारित येत नसल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजनांचा आधार घेतला आहे. त्यात प्रामुख्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांचे गावोगावी मेळावे घेण्याबरोबरच त्यांचे समुपदेशन करून आत्महत्त्या करण्यापासून रोखणे याला प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले. एवढेच नव्हे तर कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्त्या न करता थेट आपल्याला भेटावे, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी केले होते.पावसाळा सुरू होऊनही यंदा वरुणराजाने अजूनही आपली कृपादृष्टी न केल्याने शेतकऱ्यांची अडचण कायम असून, दुसरीकडे बॅँकांचा कर्जफेडीसाठी तगादा सुरू झाल्यामुळे शुक्रवारी अशा तगाद्याला कंटाळलेल्या तिघा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून समुपदेशन केंद्राचा शोध घेतला. समुपदेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी या शेतकऱ्यांनी बॅँकेच्या कर्जाची कागदपत्रेही सोबत आणली होती, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात अशा प्रकारचे कोणतेही समुपदेशन केंद्र अस्तित्वात नसल्याचे पाहून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे दालन गाठले असता, जिल्हाधिकारीही कार्यालयात हजर नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना टंचाई शाखेत पाठविण्यात आले, परंतु तेथेही या शेतकऱ्यांची समजूत निघू शकलेली नाही. अखेर समुपदेशन न होताच कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी माघारी फिरणे पसंत केले. याचाच अर्थ जिल्हा प्रशासनाचा शेतकरी समुपदेशनाचा निव्वळ फार्स ठरला आहे.