शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
2
रुबलच नाही तर चिनी चलन वापरून भारत करतंय तेल खरेदीचं पेमेंट; रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा
3
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
4
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
5
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...
6
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
7
वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल
8
Diwali 2025: गोसेवा ही दत्त कृपेची गुरुकिल्ली? वसुबारसेच्या मुहूर्तावर जाणून घ्या 'हे' गुपित!
9
FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन?
10
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
11
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
12
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
13
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
14
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
15
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल
16
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
17
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
18
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
19
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
20
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ

शेतकरी कारुण्याचा मांडला बाजार : गिरीधर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:41 IST

अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्याने खरिपाच्या सोयाबीन, द्राक्ष, कांदा, बाजरी, ज्वारी, कापूस यांसोबतच पालेभाज्या, फळभाज्या आदी पिकांचे अगणित नुकसान होऊन शेतकरी कोलमडला आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्याने खरिपाच्या सोयाबीन, द्राक्ष, कांदा, बाजरी, ज्वारी, कापूस यांसोबतच पालेभाज्या, फळभाज्या आदी पिकांचे अगणित नुकसान होऊन शेतकरी कोलमडला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न अपेक्षित असताना सध्या राजकारण्यांनी शेतकऱ्यांच्या कारुण्याचा बाजार मांडला आहे, तर प्रशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त गावांचे सरसकट पद्धतीने अंदाजे पंचनामे करून भ्रामक आकडेवारी दिली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात झालेले नुकसान हे शासकीय आकडेवारीच्या कितीतरी पटीने अधिक असल्याचे या आकड्यांची पडताळणी केल्यास समोर येईल, असे मत शेतकºयांना उद्ध्वस्त करणाºया या संकटाबाबत कृषी अर्थशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. गिरीधर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.अतिवृष्टीमुळे वाया गेलेल्या खरिपाचा शेती क्षेत्रावर काय परिणाम होईल?मान्सूनच्या आगमनानंतरही काही भागांत दुष्काळाच्या झळा कायम होत्या. चांगला पाऊस झाला तिथे हाती आलेले पीक परतीच्या पावसाने पूर्ण वाया गेल्याने शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचला आहे. शेतकºयांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकारकडून मिळणारी तुटपुंजी मदतही राज्यात सरकारच नसल्याने अद्याप मिळू शकलेली नाही. शासकीय यंत्रणातर केवळ सातव्या वेतन आयोगासाठीच काम करतात की काय? असा प्रश्न निर्माण होतो. अतिवृष्टी बाधीत गावांमध्ये सरसकट नुकसान दाखविल्याने प्रत्यक्ष वास्तविकता समोर येत नाही.अवकाळी संकटांवर मात करण्यासाठी शेतकºयांनी काय करणे गरजेचे आहे?शेतकºयांना मदत करण्याच्या प्रयत्नांमध्ये शेतकरी वगळता इतर सारे घटक सक्षम व पुष्ठ होत जातात. शेतकरी तसाच राहतो आणि इतर घटक मात्र त्याच्या कारुण्याचा बाजार मांडत त्यांचा स्वार्थ साधत राहतात. त्यामुळे अशा संकटांवर मात करण्यासाठी शेतकºयांनी राजकीय भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यांनी आपला शत्रू आणि मित्र ओळखण्याची गरज आहे. राजकारणासह, बाजार समिती, अडते, व्यापारी यासर्वांच्या बाबतीत हाच निकष लावण्याची गरज आहे.बाजार समिती, व्यापारी, अडते, बँकांकडून होणाºया अडवणुकीमुळे  शेतकरी पुरता  त्रस्त असतांना  नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी कोलमडला आहे. मदतीला  कोणीही नाही.  त्यामुळे शेतक-यांनी आपला शत्रू आणि मित्र कोण तेओळखून प्रत्येकाला योग्यवेळी चोख उत्तर द्यावे.सावरण्यासाठी रब्बीवर आशाअवकाळी पावसामुळे हंगामपूर्व द्राक्षबागांचे नुकसान झाले असून, नियमित हंगामातील बागांचे रोगांपासून संवर्धन करण्याचे आव्हान आहे. अवकाळीमुळे झालेले नुकसान कोणत्याही स्थितीत भरून येऊ शकत नाही. खरिपाचा कांदा वाया गेल्याने कांदा उत्पादकांंची संपूर्ण भिस्त उन्हाळ कांद्यावर असणार आहे. गहू, हरबरा, ज्वारीसारख्या रब्बी पिकांमधून सावरण्याची अपेक्षा आहे. परतीच्या पावसामुळे जमिनीची ओल वाढली असून, वातावरण सामान्य राहिल्यास रब्बीचे पीक चांगले येईल.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती