शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

शेतकरी कारुण्याचा मांडला बाजार : गिरीधर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:41 IST

अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्याने खरिपाच्या सोयाबीन, द्राक्ष, कांदा, बाजरी, ज्वारी, कापूस यांसोबतच पालेभाज्या, फळभाज्या आदी पिकांचे अगणित नुकसान होऊन शेतकरी कोलमडला आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्याने खरिपाच्या सोयाबीन, द्राक्ष, कांदा, बाजरी, ज्वारी, कापूस यांसोबतच पालेभाज्या, फळभाज्या आदी पिकांचे अगणित नुकसान होऊन शेतकरी कोलमडला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न अपेक्षित असताना सध्या राजकारण्यांनी शेतकऱ्यांच्या कारुण्याचा बाजार मांडला आहे, तर प्रशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त गावांचे सरसकट पद्धतीने अंदाजे पंचनामे करून भ्रामक आकडेवारी दिली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात झालेले नुकसान हे शासकीय आकडेवारीच्या कितीतरी पटीने अधिक असल्याचे या आकड्यांची पडताळणी केल्यास समोर येईल, असे मत शेतकºयांना उद्ध्वस्त करणाºया या संकटाबाबत कृषी अर्थशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. गिरीधर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.अतिवृष्टीमुळे वाया गेलेल्या खरिपाचा शेती क्षेत्रावर काय परिणाम होईल?मान्सूनच्या आगमनानंतरही काही भागांत दुष्काळाच्या झळा कायम होत्या. चांगला पाऊस झाला तिथे हाती आलेले पीक परतीच्या पावसाने पूर्ण वाया गेल्याने शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचला आहे. शेतकºयांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकारकडून मिळणारी तुटपुंजी मदतही राज्यात सरकारच नसल्याने अद्याप मिळू शकलेली नाही. शासकीय यंत्रणातर केवळ सातव्या वेतन आयोगासाठीच काम करतात की काय? असा प्रश्न निर्माण होतो. अतिवृष्टी बाधीत गावांमध्ये सरसकट नुकसान दाखविल्याने प्रत्यक्ष वास्तविकता समोर येत नाही.अवकाळी संकटांवर मात करण्यासाठी शेतकºयांनी काय करणे गरजेचे आहे?शेतकºयांना मदत करण्याच्या प्रयत्नांमध्ये शेतकरी वगळता इतर सारे घटक सक्षम व पुष्ठ होत जातात. शेतकरी तसाच राहतो आणि इतर घटक मात्र त्याच्या कारुण्याचा बाजार मांडत त्यांचा स्वार्थ साधत राहतात. त्यामुळे अशा संकटांवर मात करण्यासाठी शेतकºयांनी राजकीय भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यांनी आपला शत्रू आणि मित्र ओळखण्याची गरज आहे. राजकारणासह, बाजार समिती, अडते, व्यापारी यासर्वांच्या बाबतीत हाच निकष लावण्याची गरज आहे.बाजार समिती, व्यापारी, अडते, बँकांकडून होणाºया अडवणुकीमुळे  शेतकरी पुरता  त्रस्त असतांना  नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी कोलमडला आहे. मदतीला  कोणीही नाही.  त्यामुळे शेतक-यांनी आपला शत्रू आणि मित्र कोण तेओळखून प्रत्येकाला योग्यवेळी चोख उत्तर द्यावे.सावरण्यासाठी रब्बीवर आशाअवकाळी पावसामुळे हंगामपूर्व द्राक्षबागांचे नुकसान झाले असून, नियमित हंगामातील बागांचे रोगांपासून संवर्धन करण्याचे आव्हान आहे. अवकाळीमुळे झालेले नुकसान कोणत्याही स्थितीत भरून येऊ शकत नाही. खरिपाचा कांदा वाया गेल्याने कांदा उत्पादकांंची संपूर्ण भिस्त उन्हाळ कांद्यावर असणार आहे. गहू, हरबरा, ज्वारीसारख्या रब्बी पिकांमधून सावरण्याची अपेक्षा आहे. परतीच्या पावसामुळे जमिनीची ओल वाढली असून, वातावरण सामान्य राहिल्यास रब्बीचे पीक चांगले येईल.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती