शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

शेतकरी कारुण्याचा मांडला बाजार : गिरीधर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:41 IST

अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्याने खरिपाच्या सोयाबीन, द्राक्ष, कांदा, बाजरी, ज्वारी, कापूस यांसोबतच पालेभाज्या, फळभाज्या आदी पिकांचे अगणित नुकसान होऊन शेतकरी कोलमडला आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्याने खरिपाच्या सोयाबीन, द्राक्ष, कांदा, बाजरी, ज्वारी, कापूस यांसोबतच पालेभाज्या, फळभाज्या आदी पिकांचे अगणित नुकसान होऊन शेतकरी कोलमडला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न अपेक्षित असताना सध्या राजकारण्यांनी शेतकऱ्यांच्या कारुण्याचा बाजार मांडला आहे, तर प्रशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त गावांचे सरसकट पद्धतीने अंदाजे पंचनामे करून भ्रामक आकडेवारी दिली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात झालेले नुकसान हे शासकीय आकडेवारीच्या कितीतरी पटीने अधिक असल्याचे या आकड्यांची पडताळणी केल्यास समोर येईल, असे मत शेतकºयांना उद्ध्वस्त करणाºया या संकटाबाबत कृषी अर्थशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. गिरीधर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.अतिवृष्टीमुळे वाया गेलेल्या खरिपाचा शेती क्षेत्रावर काय परिणाम होईल?मान्सूनच्या आगमनानंतरही काही भागांत दुष्काळाच्या झळा कायम होत्या. चांगला पाऊस झाला तिथे हाती आलेले पीक परतीच्या पावसाने पूर्ण वाया गेल्याने शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचला आहे. शेतकºयांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकारकडून मिळणारी तुटपुंजी मदतही राज्यात सरकारच नसल्याने अद्याप मिळू शकलेली नाही. शासकीय यंत्रणातर केवळ सातव्या वेतन आयोगासाठीच काम करतात की काय? असा प्रश्न निर्माण होतो. अतिवृष्टी बाधीत गावांमध्ये सरसकट नुकसान दाखविल्याने प्रत्यक्ष वास्तविकता समोर येत नाही.अवकाळी संकटांवर मात करण्यासाठी शेतकºयांनी काय करणे गरजेचे आहे?शेतकºयांना मदत करण्याच्या प्रयत्नांमध्ये शेतकरी वगळता इतर सारे घटक सक्षम व पुष्ठ होत जातात. शेतकरी तसाच राहतो आणि इतर घटक मात्र त्याच्या कारुण्याचा बाजार मांडत त्यांचा स्वार्थ साधत राहतात. त्यामुळे अशा संकटांवर मात करण्यासाठी शेतकºयांनी राजकीय भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यांनी आपला शत्रू आणि मित्र ओळखण्याची गरज आहे. राजकारणासह, बाजार समिती, अडते, व्यापारी यासर्वांच्या बाबतीत हाच निकष लावण्याची गरज आहे.बाजार समिती, व्यापारी, अडते, बँकांकडून होणाºया अडवणुकीमुळे  शेतकरी पुरता  त्रस्त असतांना  नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी कोलमडला आहे. मदतीला  कोणीही नाही.  त्यामुळे शेतक-यांनी आपला शत्रू आणि मित्र कोण तेओळखून प्रत्येकाला योग्यवेळी चोख उत्तर द्यावे.सावरण्यासाठी रब्बीवर आशाअवकाळी पावसामुळे हंगामपूर्व द्राक्षबागांचे नुकसान झाले असून, नियमित हंगामातील बागांचे रोगांपासून संवर्धन करण्याचे आव्हान आहे. अवकाळीमुळे झालेले नुकसान कोणत्याही स्थितीत भरून येऊ शकत नाही. खरिपाचा कांदा वाया गेल्याने कांदा उत्पादकांंची संपूर्ण भिस्त उन्हाळ कांद्यावर असणार आहे. गहू, हरबरा, ज्वारीसारख्या रब्बी पिकांमधून सावरण्याची अपेक्षा आहे. परतीच्या पावसामुळे जमिनीची ओल वाढली असून, वातावरण सामान्य राहिल्यास रब्बीचे पीक चांगले येईल.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती