शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

माणिकपुंज धरणात शेती पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:25 IST

नांदगाव: संभाव्य पाणी टंचाईच्या भीषणतेकडे तालुकास्तरावरील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून नांदगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा नजीकच्या काळातला एकमेव स्त्रोत असलेल्या माणिकपुंज धरणात आज५० पेक्षा अधिक शेती पंप बिनिदक्कत सुरु आहेत.

ठळक मुद्देमाणिकपुंज धरणाची क्षमता ४९५ द.ल.घ.फु. असून यंदा सप्टेंबर महिन्यात फक्त २२५ द.ल.घ.फु. पाणी त्यात होते. नाग्या साक्या धरणाची क्षमता ५०० द.ल.घ. फु. असून त्यात सध्या मृत साठा म्हणजे अवघे ५०द.ल.घ. फु. पाणी आहे.

नांदगाव:संभाव्य पाणी टंचाईच्या भीषणतेकडे तालुकास्तरावरील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून नांदगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा नजीकच्या काळातला एकमेव स्त्रोत असलेल्या माणिकपुंज धरणात आज५० पेक्षा अधिक शेती पंप बिनिदक्कत सुरु आहेत. यावर एकाही यंत्रणेचे नियंत्रण नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या महिन्यात या संदर्भात नांदगाव येथील टंचाई बैठकीत दिलेले आदेश धाब्यावर बसविण्यात आल्याने नांदगावकरांना (तालुक्याला) पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या महिन्यात धरणाच्या भिंती जवळील वीज पंपांवर कारवाई केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यात आला नाही. म्हणून पंप धारकांनी जोमाने धरणातले पाणी उपसण्यास सुरवात केली आहे. कारवाई करतांना फोटो सेशन करून चमकोगिरी करणारे महसूल प्रशासनातले तालुकास्तरीय अधिकारी त्यानंतर तिकडे फिरकले नाहीत आता आपले काही होत नाही म्हणून पंप धारकासह जलसंपदा व वीज वितरण कंपनीच्या संगनमताने पाणी उपशाने जोर धरला असून जलपातळी खाली जाऊ लागली आहे.वीज वितरण कंपनीचे सर्व्हिस कनेक्शन्स आहेत.. तसेच आहेत. धरणात ठिकठिकाणी २०० लिटरचे ड्रम तरंगताना दिसून येतात. त्यांना ड्ढह्म्ड्डष्द्मद्गह्ल करून पाण्यात सोडून दिले आहेत. दिवसा एचडीपीईचा काळा पाईप ड्रमसोबत तरंगतांना दिसतो. रात्री चार नटांच्या सहाय्याने तो जोडून, दिवसां लपवलेल्या स्टार्टरच्या तीन वायर्स जोडून रात्री २वाजेपासून सकाळी ७वाजेपर्यन्त पंप पाणी उपसण्याचे काम करत असतात. माणिकपुंजच्या मुख्य भिंती शेजारी असलेले पंप तहसीलदार भारती सागरे यांनी काढले होते. त्याला महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला.येथे होणाऱ्या पाणी उपशा संदर्भात तालुक्यातील काही नेत्यांनी प्रांत भीमराज दराडे यांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली आहे. वीज पुरवठा बंद केल्याचे अधिकारी जाहीर करतात. पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.पाणी उचलण्याच्या अनिधकृत प्रक्रि येमुळे धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या शेतकरी वर्गात असंतोष वाढत असून ‘त्यांना पाणी मग आम्हाला का नको ’ असा सुर निघू लागल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची नांदी सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. सुरु असलेला पाण्याचा उपसा तातडीने बंद करण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत. असलेले पाणी पिण्यासाठी राखले नाही तर उन्हाळ्यात रेल्वेने पाणी आणून लातूर सारखी परिस्थिती उदभवण्याची शक्यता यापूर्वीच जाणकारांनी वर्तविली आहे.माणिकपुंज धरणाची क्षमता ४९५ द.ल.घ.फु. असून यंदा सप्टेंबर महिन्यात फक्त २२५ द.ल.घ.फु. पाणी त्यात होते.नाग्या साक्या धरणाची क्षमता ५०० द.ल.घ. फु. असून त्यात सध्या मृत साठा म्हणजे अवघे ५०द.ल.घ. फु. पाणी आहे.कासारी गळमोडी ५ द.ल.घ.फु.