शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

माणिकपुंज धरणात शेती पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:25 IST

नांदगाव: संभाव्य पाणी टंचाईच्या भीषणतेकडे तालुकास्तरावरील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून नांदगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा नजीकच्या काळातला एकमेव स्त्रोत असलेल्या माणिकपुंज धरणात आज५० पेक्षा अधिक शेती पंप बिनिदक्कत सुरु आहेत.

ठळक मुद्देमाणिकपुंज धरणाची क्षमता ४९५ द.ल.घ.फु. असून यंदा सप्टेंबर महिन्यात फक्त २२५ द.ल.घ.फु. पाणी त्यात होते. नाग्या साक्या धरणाची क्षमता ५०० द.ल.घ. फु. असून त्यात सध्या मृत साठा म्हणजे अवघे ५०द.ल.घ. फु. पाणी आहे.

नांदगाव:संभाव्य पाणी टंचाईच्या भीषणतेकडे तालुकास्तरावरील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून नांदगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा नजीकच्या काळातला एकमेव स्त्रोत असलेल्या माणिकपुंज धरणात आज५० पेक्षा अधिक शेती पंप बिनिदक्कत सुरु आहेत. यावर एकाही यंत्रणेचे नियंत्रण नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या महिन्यात या संदर्भात नांदगाव येथील टंचाई बैठकीत दिलेले आदेश धाब्यावर बसविण्यात आल्याने नांदगावकरांना (तालुक्याला) पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या महिन्यात धरणाच्या भिंती जवळील वीज पंपांवर कारवाई केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यात आला नाही. म्हणून पंप धारकांनी जोमाने धरणातले पाणी उपसण्यास सुरवात केली आहे. कारवाई करतांना फोटो सेशन करून चमकोगिरी करणारे महसूल प्रशासनातले तालुकास्तरीय अधिकारी त्यानंतर तिकडे फिरकले नाहीत आता आपले काही होत नाही म्हणून पंप धारकासह जलसंपदा व वीज वितरण कंपनीच्या संगनमताने पाणी उपशाने जोर धरला असून जलपातळी खाली जाऊ लागली आहे.वीज वितरण कंपनीचे सर्व्हिस कनेक्शन्स आहेत.. तसेच आहेत. धरणात ठिकठिकाणी २०० लिटरचे ड्रम तरंगताना दिसून येतात. त्यांना ड्ढह्म्ड्डष्द्मद्गह्ल करून पाण्यात सोडून दिले आहेत. दिवसा एचडीपीईचा काळा पाईप ड्रमसोबत तरंगतांना दिसतो. रात्री चार नटांच्या सहाय्याने तो जोडून, दिवसां लपवलेल्या स्टार्टरच्या तीन वायर्स जोडून रात्री २वाजेपासून सकाळी ७वाजेपर्यन्त पंप पाणी उपसण्याचे काम करत असतात. माणिकपुंजच्या मुख्य भिंती शेजारी असलेले पंप तहसीलदार भारती सागरे यांनी काढले होते. त्याला महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला.येथे होणाऱ्या पाणी उपशा संदर्भात तालुक्यातील काही नेत्यांनी प्रांत भीमराज दराडे यांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली आहे. वीज पुरवठा बंद केल्याचे अधिकारी जाहीर करतात. पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.पाणी उचलण्याच्या अनिधकृत प्रक्रि येमुळे धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या शेतकरी वर्गात असंतोष वाढत असून ‘त्यांना पाणी मग आम्हाला का नको ’ असा सुर निघू लागल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची नांदी सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. सुरु असलेला पाण्याचा उपसा तातडीने बंद करण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत. असलेले पाणी पिण्यासाठी राखले नाही तर उन्हाळ्यात रेल्वेने पाणी आणून लातूर सारखी परिस्थिती उदभवण्याची शक्यता यापूर्वीच जाणकारांनी वर्तविली आहे.माणिकपुंज धरणाची क्षमता ४९५ द.ल.घ.फु. असून यंदा सप्टेंबर महिन्यात फक्त २२५ द.ल.घ.फु. पाणी त्यात होते.नाग्या साक्या धरणाची क्षमता ५०० द.ल.घ. फु. असून त्यात सध्या मृत साठा म्हणजे अवघे ५०द.ल.घ. फु. पाणी आहे.कासारी गळमोडी ५ द.ल.घ.फु.