शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

माणिकपुंज धरणात शेती पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:25 IST

नांदगाव: संभाव्य पाणी टंचाईच्या भीषणतेकडे तालुकास्तरावरील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून नांदगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा नजीकच्या काळातला एकमेव स्त्रोत असलेल्या माणिकपुंज धरणात आज५० पेक्षा अधिक शेती पंप बिनिदक्कत सुरु आहेत.

ठळक मुद्देमाणिकपुंज धरणाची क्षमता ४९५ द.ल.घ.फु. असून यंदा सप्टेंबर महिन्यात फक्त २२५ द.ल.घ.फु. पाणी त्यात होते. नाग्या साक्या धरणाची क्षमता ५०० द.ल.घ. फु. असून त्यात सध्या मृत साठा म्हणजे अवघे ५०द.ल.घ. फु. पाणी आहे.

नांदगाव:संभाव्य पाणी टंचाईच्या भीषणतेकडे तालुकास्तरावरील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून नांदगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा नजीकच्या काळातला एकमेव स्त्रोत असलेल्या माणिकपुंज धरणात आज५० पेक्षा अधिक शेती पंप बिनिदक्कत सुरु आहेत. यावर एकाही यंत्रणेचे नियंत्रण नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या महिन्यात या संदर्भात नांदगाव येथील टंचाई बैठकीत दिलेले आदेश धाब्यावर बसविण्यात आल्याने नांदगावकरांना (तालुक्याला) पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या महिन्यात धरणाच्या भिंती जवळील वीज पंपांवर कारवाई केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यात आला नाही. म्हणून पंप धारकांनी जोमाने धरणातले पाणी उपसण्यास सुरवात केली आहे. कारवाई करतांना फोटो सेशन करून चमकोगिरी करणारे महसूल प्रशासनातले तालुकास्तरीय अधिकारी त्यानंतर तिकडे फिरकले नाहीत आता आपले काही होत नाही म्हणून पंप धारकासह जलसंपदा व वीज वितरण कंपनीच्या संगनमताने पाणी उपशाने जोर धरला असून जलपातळी खाली जाऊ लागली आहे.वीज वितरण कंपनीचे सर्व्हिस कनेक्शन्स आहेत.. तसेच आहेत. धरणात ठिकठिकाणी २०० लिटरचे ड्रम तरंगताना दिसून येतात. त्यांना ड्ढह्म्ड्डष्द्मद्गह्ल करून पाण्यात सोडून दिले आहेत. दिवसा एचडीपीईचा काळा पाईप ड्रमसोबत तरंगतांना दिसतो. रात्री चार नटांच्या सहाय्याने तो जोडून, दिवसां लपवलेल्या स्टार्टरच्या तीन वायर्स जोडून रात्री २वाजेपासून सकाळी ७वाजेपर्यन्त पंप पाणी उपसण्याचे काम करत असतात. माणिकपुंजच्या मुख्य भिंती शेजारी असलेले पंप तहसीलदार भारती सागरे यांनी काढले होते. त्याला महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला.येथे होणाऱ्या पाणी उपशा संदर्भात तालुक्यातील काही नेत्यांनी प्रांत भीमराज दराडे यांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली आहे. वीज पुरवठा बंद केल्याचे अधिकारी जाहीर करतात. पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.पाणी उचलण्याच्या अनिधकृत प्रक्रि येमुळे धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या शेतकरी वर्गात असंतोष वाढत असून ‘त्यांना पाणी मग आम्हाला का नको ’ असा सुर निघू लागल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची नांदी सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. सुरु असलेला पाण्याचा उपसा तातडीने बंद करण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत. असलेले पाणी पिण्यासाठी राखले नाही तर उन्हाळ्यात रेल्वेने पाणी आणून लातूर सारखी परिस्थिती उदभवण्याची शक्यता यापूर्वीच जाणकारांनी वर्तविली आहे.माणिकपुंज धरणाची क्षमता ४९५ द.ल.घ.फु. असून यंदा सप्टेंबर महिन्यात फक्त २२५ द.ल.घ.फु. पाणी त्यात होते.नाग्या साक्या धरणाची क्षमता ५०० द.ल.घ. फु. असून त्यात सध्या मृत साठा म्हणजे अवघे ५०द.ल.घ. फु. पाणी आहे.कासारी गळमोडी ५ द.ल.घ.फु.