शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पुढील शाही पर्वण्यांसाठी फेरनियोजन

By admin | Updated: August 30, 2015 23:20 IST

बैठक : प्रशासनाच्या नियोजनाबाबत अधिकाऱ्यांसह चिंतन

नाशिक : सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीमध्ये शहरात जागोजागी केलेली रस्तेबंदी, बॅरिकेडिंग यामुळे भाविकांबरोबरच नाशिककरांचेही प्रचंड हाल झाले़ या पोलिसी अतिरेकाबाबत माध्यमांनी चौफेर टीका केल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि़३०) जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांची चिंतन बैठक घेतली़ या बैठकीमध्ये पुढील दोन्ही पर्वण्यांमध्ये भाविकांना कमीत कमी त्रास होईल, असा बंदोबस्त ठेवण्याचे अर्थात फेरनियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़पालकमंत्री म्हणाले की, पहिल्या पर्वणीसाठी भाविकांची गर्दी ही तशी कमीच असते़ मात्र, प्रशासनाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार सुमारे २० लाख भाविकांनी गोदाघाटांवर स्नान केले आहे़ सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गर्दी वाढल्यामुळे सैल केलेली बॅरिकेडिंग पोलिसांना पुन्हा सुरू करावी लागली़ पोलिसांच्या नियोजनामुळेच पहिल्या पर्वणीकाळात रामघाट वा शहरात कोणतीही दुर्घटना घडली नाही़शहरात पर्वणीसाठी आलेल्या भाविक व नाशिककरांची मोठी परवड झाली़ भाविकांची मोठी पायपीट झाली़ त्यामुळे पुढील दोन्ही पर्वण्यांमध्ये भाविकांची ही पायपीट कमी व्हावी, नाशिककरांनाही अतिरक्त बंधन वाटू नये अशा प्रकारे नियोजन करून पायी अंतर कमी कसे करता येईल याबाबत जिल्हा प्रशासन व पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत़ मुळात सर्वच भाविकांची इच्छा रामकुंडामध्ये स्नान करण्याची आहे़ मात्र बॅरिकेडिंग व पोलीस बंदोबस्त ठेवला नाही व सर्व भाविकांना एकाच वेळी रामकुंडावर सोडले तर दुर्घटना नक्कीच होऊ शकते़१३ सप्टेंबर व १९ सप्टेंबरच्या पर्वणीसाठी येणारे भाविक व नाशिककर त्रासमुक्त कसे होतील, याबाबत फेरनियोजन करण्याच्या सूचना या बैठकीत दिल्याचेही पालकमंत्री महाजन यांनी सांगितले़ या बैठकीस आमदार बाळासाहेब सानप, विभागीय आयुक्त एकनाथ डौले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयजितसिंह, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)