शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

ताणतणाव दूर करण्यासाठी कौटुंबिक संवाद गरजेचा : आनंद नाडकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:24 IST

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच कौटुंबिक जीवनावर झाला आहे़ या बदलामुळे माणसाचा कुटुंबासमवेत संवाद हरपला असून, तो अधिकाधिक ताणतणावग्रस्त होत चालला आहे़ हा ताणतणाव दूर करून सुखी जीवन जगायचे असेल तर कौटुंबिक सुसंवाद, आध्यात्मिक दृष्टिकोन व सत्य स्वीकारण्याची मानसिकता गरजेची असल्याचे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.

नाशिक : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच कौटुंबिक जीवनावर झाला आहे़ या बदलामुळे माणसाचा कुटुंबासमवेत संवाद हरपला असून, तो अधिकाधिक ताणतणावग्रस्त होत चालला आहे़ हा ताणतणाव दूर करून सुखी जीवन जगायचे असेल तर कौटुंबिक सुसंवाद, आध्यात्मिक दृष्टिकोन व सत्य स्वीकारण्याची मानसिकता गरजेची असल्याचे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे महाकवी कालिदास कलामंदिरात रविवारी (दि़२८) आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंद रहा, निरोगी जगा’ या कार्यक्रमात ते बोलत होते़ डॉ.सुधीर संकलेचा व वैशाली बालाजीवाले यांनी विचारलेल्या प्रश्नांवर डॉ़ नाडकर्णी व डॉ़ मनोज चोपडा यांनी मनाचे व्यापार, मानसिक ताण-तणाव, आजारपण यावर विश्लेषण करून आनंदी जीवनाचे रहस्य उलगडून दाखविले. माणूस हा भौतिक सुखाच्या मागे लागल्याने मानसिक ताण-तणाव वाढले आहेत़  व्यसनाधिनता, ताणतणाव चिंता या समस्यांवर नातेसंबंधातून मिळणारा आधार हे प्रभावी औषध असून, जवळच्या व्यक्तींशी मनमोकळा संवाद, छंदामध्ये स्वत:ला गुंतवणे तसेच डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक असल्याचे नाडकर्णी यांनी सागितले़ प्रारंभी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, विनिता सिंघल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले़ याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, डॉ.कैलास कमोद, डॉ. रश्मी चोपडा, प्रशांत हिरे, डॉ. राज नगरकर आदि उपस्थित होते़डॉक्टरांवरील हल्ले होतील कमी...रुग्ण, नातेवाईक व डॉक्टर या तिन्ही घटकांनी वास्तव परिस्थितीचा स्वीकार करणे गरजेचे आहे़ डॉक्टरांना रुग्ण व नातेवाइकांचा आधार खूप महत्त्वाचा असतो, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना डॉक्टरांनी वास्तव परिस्थितीची माहिती दिली व त्यांनी सहकार्य केले तर डॉक्टरांवरील हल्ले नक्कीच कमी होतील, असे डॉ़ नाडकर्णी यांनी सांगितले़

टॅग्स :docterडॉक्टरHealth Tipsहेल्थ टिप्स