शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

ताणतणाव दूर करण्यासाठी कौटुंबिक संवाद गरजेचा : आनंद नाडकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:24 IST

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच कौटुंबिक जीवनावर झाला आहे़ या बदलामुळे माणसाचा कुटुंबासमवेत संवाद हरपला असून, तो अधिकाधिक ताणतणावग्रस्त होत चालला आहे़ हा ताणतणाव दूर करून सुखी जीवन जगायचे असेल तर कौटुंबिक सुसंवाद, आध्यात्मिक दृष्टिकोन व सत्य स्वीकारण्याची मानसिकता गरजेची असल्याचे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.

नाशिक : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच कौटुंबिक जीवनावर झाला आहे़ या बदलामुळे माणसाचा कुटुंबासमवेत संवाद हरपला असून, तो अधिकाधिक ताणतणावग्रस्त होत चालला आहे़ हा ताणतणाव दूर करून सुखी जीवन जगायचे असेल तर कौटुंबिक सुसंवाद, आध्यात्मिक दृष्टिकोन व सत्य स्वीकारण्याची मानसिकता गरजेची असल्याचे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे महाकवी कालिदास कलामंदिरात रविवारी (दि़२८) आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंद रहा, निरोगी जगा’ या कार्यक्रमात ते बोलत होते़ डॉ.सुधीर संकलेचा व वैशाली बालाजीवाले यांनी विचारलेल्या प्रश्नांवर डॉ़ नाडकर्णी व डॉ़ मनोज चोपडा यांनी मनाचे व्यापार, मानसिक ताण-तणाव, आजारपण यावर विश्लेषण करून आनंदी जीवनाचे रहस्य उलगडून दाखविले. माणूस हा भौतिक सुखाच्या मागे लागल्याने मानसिक ताण-तणाव वाढले आहेत़  व्यसनाधिनता, ताणतणाव चिंता या समस्यांवर नातेसंबंधातून मिळणारा आधार हे प्रभावी औषध असून, जवळच्या व्यक्तींशी मनमोकळा संवाद, छंदामध्ये स्वत:ला गुंतवणे तसेच डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक असल्याचे नाडकर्णी यांनी सागितले़ प्रारंभी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, विनिता सिंघल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले़ याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, डॉ.कैलास कमोद, डॉ. रश्मी चोपडा, प्रशांत हिरे, डॉ. राज नगरकर आदि उपस्थित होते़डॉक्टरांवरील हल्ले होतील कमी...रुग्ण, नातेवाईक व डॉक्टर या तिन्ही घटकांनी वास्तव परिस्थितीचा स्वीकार करणे गरजेचे आहे़ डॉक्टरांना रुग्ण व नातेवाइकांचा आधार खूप महत्त्वाचा असतो, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना डॉक्टरांनी वास्तव परिस्थितीची माहिती दिली व त्यांनी सहकार्य केले तर डॉक्टरांवरील हल्ले नक्कीच कमी होतील, असे डॉ़ नाडकर्णी यांनी सांगितले़

टॅग्स :docterडॉक्टरHealth Tipsहेल्थ टिप्स