शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:30 IST

केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार झोपेचे सोंग घेऊन शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा करत आहेत. उद्योजकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज एनपीएत टाकून त्यांना सवलती देत आहेत. मात्र शेतकºयांचे कर्ज माफ करण्यास पैसे नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे सरकार विसरले आहे.

निफाड : केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार झोपेचे सोंग घेऊन शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा करत आहेत. उद्योजकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज एनपीएत टाकून त्यांना सवलती देत आहेत. मात्र शेतकºयांचे कर्ज माफ करण्यास पैसे नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे सरकार विसरले आहे.शेतकºयांच्या प्रश्नाबाबत सरकार झोपेचे सोंग घेत आहे. सरकारची झोप उडविण्यासाठी देशातील शेतकरी संघटना सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे २७ सप्टेंबरला हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी निफाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या २७ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थित निफाड तालुक्यातील कोठुरे येथे सायंकाळी ६वा हल्लाबोल मेळाव्याचे आयोजन केले आहे.  या मेळाव्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकºयांच्या बैठका आयोजित केल्याचे यावेळी हंसराज वडघुले यांनी सांगितले. ते म्हणाले, सरकार तोड-फोडीचे राजकारण करत आहे. तूर खरेदीत शेतकºयांना कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. कांदा खरेदीतही व्यापाºयावर दबाव आणत आहेत. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव पाचशे ते सहाशेनी घसरले आहेत.  निफाड व रानवड कारखान्याचे कर्ज माफ करून ते पुन्हा सुरू झाले पाहिजे, शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकºयांची सक्तीची कर्ज वसुली थांबविली पाहिजे या व इतरही अनेक मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी व त्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यासाठी हल्लाबोल मेळाव्याचे आयोजन केले असल्याने मेळावा यशस्वी करण्याचे आवाहनही वडघुले यांनी केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ बोराडे, युवा निफाड तालुकाध्यक्ष नितीन कोरडे, सोमनाथ मोरे, सुधाकर मोगल उपस्थित होते.भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील व राज्यातील सरकार हे उद्योगपतींचे आहे. अंबानी व अदानीसारख्या उद्योगपतींना कोट्यवधी रु पये माफ करून त्यांचे वसूल पात्र कर्ज एनपीएमध्ये टाकून त्यांना सवलत देत आहेत. शेतकºयांना उद्ध्वस्त करून समृद्धी महामार्गाचा घाट घातला जात आहे. शेतकºयांचे संघटन मोडीत काढण्यासाठी त्याच्यावर लोकशाही मार्गाने आंदोलन करताना खोटे गुन्हे दाखल करत आहेत.