शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:30 IST

केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार झोपेचे सोंग घेऊन शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा करत आहेत. उद्योजकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज एनपीएत टाकून त्यांना सवलती देत आहेत. मात्र शेतकºयांचे कर्ज माफ करण्यास पैसे नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे सरकार विसरले आहे.

निफाड : केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार झोपेचे सोंग घेऊन शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा करत आहेत. उद्योजकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज एनपीएत टाकून त्यांना सवलती देत आहेत. मात्र शेतकºयांचे कर्ज माफ करण्यास पैसे नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे सरकार विसरले आहे.शेतकºयांच्या प्रश्नाबाबत सरकार झोपेचे सोंग घेत आहे. सरकारची झोप उडविण्यासाठी देशातील शेतकरी संघटना सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे २७ सप्टेंबरला हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी निफाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या २७ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थित निफाड तालुक्यातील कोठुरे येथे सायंकाळी ६वा हल्लाबोल मेळाव्याचे आयोजन केले आहे.  या मेळाव्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकºयांच्या बैठका आयोजित केल्याचे यावेळी हंसराज वडघुले यांनी सांगितले. ते म्हणाले, सरकार तोड-फोडीचे राजकारण करत आहे. तूर खरेदीत शेतकºयांना कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. कांदा खरेदीतही व्यापाºयावर दबाव आणत आहेत. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव पाचशे ते सहाशेनी घसरले आहेत.  निफाड व रानवड कारखान्याचे कर्ज माफ करून ते पुन्हा सुरू झाले पाहिजे, शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकºयांची सक्तीची कर्ज वसुली थांबविली पाहिजे या व इतरही अनेक मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी व त्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यासाठी हल्लाबोल मेळाव्याचे आयोजन केले असल्याने मेळावा यशस्वी करण्याचे आवाहनही वडघुले यांनी केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ बोराडे, युवा निफाड तालुकाध्यक्ष नितीन कोरडे, सोमनाथ मोरे, सुधाकर मोगल उपस्थित होते.भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील व राज्यातील सरकार हे उद्योगपतींचे आहे. अंबानी व अदानीसारख्या उद्योगपतींना कोट्यवधी रु पये माफ करून त्यांचे वसूल पात्र कर्ज एनपीएमध्ये टाकून त्यांना सवलत देत आहेत. शेतकºयांना उद्ध्वस्त करून समृद्धी महामार्गाचा घाट घातला जात आहे. शेतकºयांचे संघटन मोडीत काढण्यासाठी त्याच्यावर लोकशाही मार्गाने आंदोलन करताना खोटे गुन्हे दाखल करत आहेत.