शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

नाशिक-औरंगाबात महामार्गावरील गतिरोधक ठरतायेत जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:01 IST

चांदोरी : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील चेहडी, चितेगाव फाटा, चांदोरी चौफुली, सायखेडा फाटा, लाखलगाव, ओढा, माडसांगवी या ठिकाणी असलेल्या गतीरोधकांवरील पांढरे पट्टे आणि रेडीयम खराब झाल्याने वाहनचालकांना गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग गतिरोधकांची दुरु स्ती करणार की आणखी मोठ्या अपघाताची वाट पाहणार, असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : रिफ्लेक्टर, पांढरे पट्टे गायब

चांदोरी : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील चेहडी, चितेगाव फाटा, चांदोरी चौफुली, सायखेडा फाटा, लाखलगाव, ओढा, माडसांगवी या ठिकाणी असलेल्या गतीरोधकांवरील पांढरे पट्टे आणि रेडीयम खराब झाल्याने वाहनचालकांना गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग गतिरोधकांची दुरु स्ती करणार की आणखी मोठ्या अपघाताची वाट पाहणार, असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.सहा वर्षांपूर्वी नाशिक-औरंगाबाद महामार्गाचे नूतनीकरण करण्यात आले होते. दुपदरी रस्ता चौपदरी करण्यात आला. दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारण्यात आले. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक टाकण्यात आले. त्यात शोभिवंत झाडे लावण्यात आली. चांदोरी ते चेहडीदरम्यानच्या दुभाजकामधील झाडांचीदेखील आता दुरवस्था झाली आहे. झाडांची छाटणी केल्यानंतर पाणी दिले जात नाही. गावाजवळ वाहनांचा वेग मंदावला जावा, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने गतिरोधक करण्यात आले होते; मात्र अनेक वर्षे या गतिरोधकांची डागडुजी झाली नसल्याने यावर रेखाटलेले पांढरे पट्टे आणि रेडियम निघून गेले आहे. त्यामुळे गतिरोधक असल्याचा कुठलाही अंदाज येत नसल्याने अनेकदा गाडी आदळते त्यामुळे अपघात होतात. यात अनेकजण जखमी, तर काहींचा मृत्यू झाला आहे. अनेकदा तक्र ार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग या गतिरोधकांची डागडुजी करून पांढरे पट्टे मारण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.लाखलगाव ते चांदोरीदरम्यान पाच ते सहा ठिकाणी गतिरोधक आहेत. या गतिरोधकांवरील पांढरे पट्टे आणि रेडियम निघून गेले आहे. वाहनचालकांना गतिरोधकांचा अंदाज येत नाही. गतिरोधकांजवळ रीफलेक्टर बसवून पांढरे पट्टे मारावेत.- सिद्धार्थ वनारसे, जिल्हा परिषदनाशिक -औरंगाबाद महामार्गावरील गतिरोधकांची असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. बांधकाम विभागाने गतिरोधकांजवळ पांढरे पट्टे मारावे. आवश्यक असेल तेथे गतिरोधक असल्याचे फलक लावावे.- नितीन खरात, वाहनधारक, चांदोरी दुभाजकामधील झाडांची पाण्याअभावी दुरवस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. दुभाजकामधील झाडांची छाटणी करू नये.- राहुल टर्ले, चांदोरी