शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदार पकडल्याच्या चर्चेने महापालिकेत पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:03 IST

महापालिकेच्या मुख्यालयात एका ठेकेदारास पकडल्याची एकच चर्चा पसरली आणि त्यानंतर गोंधळ उडाला. महापालिकेत कोणत्याही अभ्यागताला दरवाजे बंद करून दुपारी तीन वाजेनंतरच या असे सुरक्षारक्षकांनी सांगितल्यानंतर आणखीन गोंधळ झाला.

नाशिक : महापालिकेच्या मुख्यालयात एका ठेकेदारास पकडल्याची एकच चर्चा पसरली आणि त्यानंतर गोंधळ उडाला. महापालिकेत कोणत्याही अभ्यागताला दरवाजे बंद करून दुपारी तीन वाजेनंतरच या असे सुरक्षारक्षकांनी सांगितल्यानंतर आणखीन गोंधळ झाला. महापालिकेत एसीबीचा सापळा रचल्याची आणि ठेकेदाराला पकडल्याची चर्चा पसरली, परंतु नंतर ठेकेदाराला एसीबीने नव्हे तर आयुक्तांनी वेळेपूर्वी मुख्यालयात आल्याने पकडले, असा खुलासा झाला आणि वातावरण शांत झाले.बुधवारी (दि.२८) हा प्रकार घडला. राजीव गांधी भवनात अभ्यागतांना प्रवेश दुपारी तीन वाजेनंतरच असतो. सकाळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शांततेत काम करता यावे यासाठी ही व्यवस्था असली तरी त्याचे उल्लंघनदेखील केले जाते. विशेषत: ठेकेदार सकाळपासून केव्हाही महापालिकेत येतात. नागरिकांना मात्र नियमाच्या पालनाला सामोरे जावे लागते. बुधवारी (दि.२८) आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे महापालिकेत आगमन झाले आणि ते कार्यालयात जात असताना मोबाइल फोनचा आवाज आल्याने आयुक्तांना शंका आली त्यांनी संबंधिताला विचारले असता त्याने ठेकेदार असल्याचे सांगितल्याने आयुक्तांनी वेळेपूर्वी ठेकेदारांना मध्ये कसे काय सोडतात, असा प्रश्न करून सुरक्षारक्षकांना जाब विचारला. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी साऱ्यांचीच विचारपूस सुरू केली. तथापि, ठेकेदाराला पकडले, अशी चर्चा पसरल्याने गोंधळ उडाला.अधिकारीच बोलावतात ठेकेदारांनामहापालिकेच्या वतीने अभ्यागतांना प्रवेशासाठी तीन वाजेनंतरचीच वेळ आहे. त्यामुळे प्रवेशव्दारावर सुरक्षा कर्मचारी त्यांना अडवतात. मात्र, दुसरीकडे अधिकारीच ठेकेदारांना बोलावतात आणि सुरक्षा कर्मचाºयांना त्यांना मुख्यालयात सोडणे भाग पाडते, अशी वेगळीच कैफियत सुरक्षारक्षकांनी मांडली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग