शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

नेत्रदान चळवळ अधिक गतिमान व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:09 IST

नाशिक : मानवी जीवनात प्रत्येक अवयवाला महत्त्व असून, त्यात डोळा हा अवयव अधिक महत्त्वाचा समजला जातो, कारण त्यामुळेच आपण हे सर्व जग पाहू शकतो. परंतु ज्यांना जन्मत:च डोळे नाहीत किंवा अपघातामुळे डोळे गेले आहेत, अशा व्यक्तींसाठी हे जग कसे असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. परंतु मरणोत्तर नेत्रदानातून आपण त्या लोकांना हे सुंदर जग पाहण्याची दृष्टी प्रदान करू शकतो, त्यासाठी कोणताही विशेष संकल्प करण्याची गरज नाही.

नाशिक : (मुकुंद बाविस्कर) मानवी जीवनात प्रत्येक अवयवाला महत्त्व असून, त्यात डोळा हा अवयव अधिक महत्त्वाचा समजला जातो, कारण त्यामुळेच आपण हे सर्व जग पाहू शकतो. परंतु ज्यांना जन्मत:च डोळे नाहीत किंवा अपघातामुळे डोळे गेले आहेत, अशा व्यक्तींसाठी हे जग कसे असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. परंतु मरणोत्तर नेत्रदानातून आपण त्या लोकांना हे सुंदर जग पाहण्याची दृष्टी प्रदान करू शकतो, त्यासाठी कोणताही विशेष संकल्प करण्याची गरज नाही. केवळ एक अर्ज भरून दिल्यानंतर कुणालाही मृत्युपश्चात नेत्रदान करण्यात करता येणे शक्य आहे. सध्याच्या काळात अंधत्वाच्या तक्रारीत वाढ होत असून, नेत्रदान चळवळ अधिक गतिमान व्हावी, याकरिता नेत्रतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून जनजागृती करण्यात येत आहे.नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी दि.१० जून हा दिवस जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात येते. आपण घेतलेल्या एका निर्णयामुळे एखाद्याचे आयुष्य सुंदर आणि सुखकर होऊ शकते. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहता येत नाही. परंतु, या अतिशय महत्त्वाच्या अवयवाची आपण काळजी घेत नाही. सध्या मोबाइल, इंटरनेट यामुळे अंधत्व येण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. साधारणत: एक वर्ष वयापासून ते चांगली दृष्टी असल्यास ५० वय पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.नेत्रदान हे मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह आणि चष्मा वापरणारी व्यक्तीही करू शकते. आपल्या मृत्यू पत्रात नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून आणि त्याविषयी जवळच्या नातेवाइकांना कल्पना देऊन मृत व्यक्तीचे डोळे पुढे कोणाच्यातरी उपयोगी पडू शकतात. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते, त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा अर्ज भरून देणे ही काळाची गरज ठरली आहे.---------------------संपूर्ण जगात ४५ दशलक्ष दृष्टिहीन लोक आहेत. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजेच १५ दशलक्ष दृष्टिहीन लोक हे भारतात आहेत. अनेक देशांमध्ये गरिबीमुळे पोषण आहार न मिळाल्याने, अपघात, विविध आजार अशा विविध कारणांमुळे अनेकांना अंधत्व येते. अकाली अंधत्व आलेल्या लोकांवर शस्त्रक्रिया करून नवीन दृष्टीपटल बसवून दृष्टी परत दिल्या जाऊ शकते.- डॉ. अमित धांडे, नेत्ररोगतज्ज्ञ

टॅग्स :Nashikनाशिक