शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

नेत्रदान चळवळ अधिक गतिमान व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:09 IST

नाशिक : मानवी जीवनात प्रत्येक अवयवाला महत्त्व असून, त्यात डोळा हा अवयव अधिक महत्त्वाचा समजला जातो, कारण त्यामुळेच आपण हे सर्व जग पाहू शकतो. परंतु ज्यांना जन्मत:च डोळे नाहीत किंवा अपघातामुळे डोळे गेले आहेत, अशा व्यक्तींसाठी हे जग कसे असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. परंतु मरणोत्तर नेत्रदानातून आपण त्या लोकांना हे सुंदर जग पाहण्याची दृष्टी प्रदान करू शकतो, त्यासाठी कोणताही विशेष संकल्प करण्याची गरज नाही.

नाशिक : (मुकुंद बाविस्कर) मानवी जीवनात प्रत्येक अवयवाला महत्त्व असून, त्यात डोळा हा अवयव अधिक महत्त्वाचा समजला जातो, कारण त्यामुळेच आपण हे सर्व जग पाहू शकतो. परंतु ज्यांना जन्मत:च डोळे नाहीत किंवा अपघातामुळे डोळे गेले आहेत, अशा व्यक्तींसाठी हे जग कसे असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. परंतु मरणोत्तर नेत्रदानातून आपण त्या लोकांना हे सुंदर जग पाहण्याची दृष्टी प्रदान करू शकतो, त्यासाठी कोणताही विशेष संकल्प करण्याची गरज नाही. केवळ एक अर्ज भरून दिल्यानंतर कुणालाही मृत्युपश्चात नेत्रदान करण्यात करता येणे शक्य आहे. सध्याच्या काळात अंधत्वाच्या तक्रारीत वाढ होत असून, नेत्रदान चळवळ अधिक गतिमान व्हावी, याकरिता नेत्रतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून जनजागृती करण्यात येत आहे.नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी दि.१० जून हा दिवस जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात येते. आपण घेतलेल्या एका निर्णयामुळे एखाद्याचे आयुष्य सुंदर आणि सुखकर होऊ शकते. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहता येत नाही. परंतु, या अतिशय महत्त्वाच्या अवयवाची आपण काळजी घेत नाही. सध्या मोबाइल, इंटरनेट यामुळे अंधत्व येण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. साधारणत: एक वर्ष वयापासून ते चांगली दृष्टी असल्यास ५० वय पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.नेत्रदान हे मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह आणि चष्मा वापरणारी व्यक्तीही करू शकते. आपल्या मृत्यू पत्रात नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून आणि त्याविषयी जवळच्या नातेवाइकांना कल्पना देऊन मृत व्यक्तीचे डोळे पुढे कोणाच्यातरी उपयोगी पडू शकतात. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते, त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा अर्ज भरून देणे ही काळाची गरज ठरली आहे.---------------------संपूर्ण जगात ४५ दशलक्ष दृष्टिहीन लोक आहेत. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजेच १५ दशलक्ष दृष्टिहीन लोक हे भारतात आहेत. अनेक देशांमध्ये गरिबीमुळे पोषण आहार न मिळाल्याने, अपघात, विविध आजार अशा विविध कारणांमुळे अनेकांना अंधत्व येते. अकाली अंधत्व आलेल्या लोकांवर शस्त्रक्रिया करून नवीन दृष्टीपटल बसवून दृष्टी परत दिल्या जाऊ शकते.- डॉ. अमित धांडे, नेत्ररोगतज्ज्ञ

टॅग्स :Nashikनाशिक