शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदान चळवळ अधिक गतिमान व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:09 IST

नाशिक : मानवी जीवनात प्रत्येक अवयवाला महत्त्व असून, त्यात डोळा हा अवयव अधिक महत्त्वाचा समजला जातो, कारण त्यामुळेच आपण हे सर्व जग पाहू शकतो. परंतु ज्यांना जन्मत:च डोळे नाहीत किंवा अपघातामुळे डोळे गेले आहेत, अशा व्यक्तींसाठी हे जग कसे असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. परंतु मरणोत्तर नेत्रदानातून आपण त्या लोकांना हे सुंदर जग पाहण्याची दृष्टी प्रदान करू शकतो, त्यासाठी कोणताही विशेष संकल्प करण्याची गरज नाही.

नाशिक : (मुकुंद बाविस्कर) मानवी जीवनात प्रत्येक अवयवाला महत्त्व असून, त्यात डोळा हा अवयव अधिक महत्त्वाचा समजला जातो, कारण त्यामुळेच आपण हे सर्व जग पाहू शकतो. परंतु ज्यांना जन्मत:च डोळे नाहीत किंवा अपघातामुळे डोळे गेले आहेत, अशा व्यक्तींसाठी हे जग कसे असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. परंतु मरणोत्तर नेत्रदानातून आपण त्या लोकांना हे सुंदर जग पाहण्याची दृष्टी प्रदान करू शकतो, त्यासाठी कोणताही विशेष संकल्प करण्याची गरज नाही. केवळ एक अर्ज भरून दिल्यानंतर कुणालाही मृत्युपश्चात नेत्रदान करण्यात करता येणे शक्य आहे. सध्याच्या काळात अंधत्वाच्या तक्रारीत वाढ होत असून, नेत्रदान चळवळ अधिक गतिमान व्हावी, याकरिता नेत्रतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून जनजागृती करण्यात येत आहे.नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी दि.१० जून हा दिवस जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात येते. आपण घेतलेल्या एका निर्णयामुळे एखाद्याचे आयुष्य सुंदर आणि सुखकर होऊ शकते. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहता येत नाही. परंतु, या अतिशय महत्त्वाच्या अवयवाची आपण काळजी घेत नाही. सध्या मोबाइल, इंटरनेट यामुळे अंधत्व येण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. साधारणत: एक वर्ष वयापासून ते चांगली दृष्टी असल्यास ५० वय पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.नेत्रदान हे मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह आणि चष्मा वापरणारी व्यक्तीही करू शकते. आपल्या मृत्यू पत्रात नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून आणि त्याविषयी जवळच्या नातेवाइकांना कल्पना देऊन मृत व्यक्तीचे डोळे पुढे कोणाच्यातरी उपयोगी पडू शकतात. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते, त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा अर्ज भरून देणे ही काळाची गरज ठरली आहे.---------------------संपूर्ण जगात ४५ दशलक्ष दृष्टिहीन लोक आहेत. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजेच १५ दशलक्ष दृष्टिहीन लोक हे भारतात आहेत. अनेक देशांमध्ये गरिबीमुळे पोषण आहार न मिळाल्याने, अपघात, विविध आजार अशा विविध कारणांमुळे अनेकांना अंधत्व येते. अकाली अंधत्व आलेल्या लोकांवर शस्त्रक्रिया करून नवीन दृष्टीपटल बसवून दृष्टी परत दिल्या जाऊ शकते.- डॉ. अमित धांडे, नेत्ररोगतज्ज्ञ

टॅग्स :Nashikनाशिक