शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

रब्बीसाठी ८ कोटींचे जादा पीककर्ज वाटप

By admin | Updated: November 21, 2015 00:18 IST

रब्बीसाठी ८ कोटींचे जादा पीककर्ज वाटप

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने मागील वर्षाच्या तुलनेने यंदाच्या रब्बी हंगामासाठी मध्यम मुदतीचे सुमारे ३२ कोटी २३ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील वर्षाच्या तुलनेत नोेव्हेंबर अखेर ८ कोटींनी जादा कर्जवाटप शेतकऱ्यांना करण्यात आलेले असले तरी एकूण लक्षांकाच्या केवळ ४८ टक्केच हे कर्जवाटप असल्याचे समजते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने सन २०१४-१५ या खरीप हंगामासाठी १०७ कोटी ५० लाखांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. २ लाख १९ हजार ५८८ सभासदांना १ लाख ७० हजार ८९२ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांसाठी हे पीक कर्ज देण्यात येणार होते. प्रत्यक्षात १२१ कोटी ३ लाख (११३ टक्के) पीक कर्जाचे खरीप हंगामासाठी वाटप करण्यात आले. मागील खरीप हंगामात हेच वाटप ११८ कोटी २४ लाखांच्या घरात होते. म्हणजेच मागील वर्षापेक्षा यावर्षी जिल्हा बॅँकेच्या वतीने जादाचे खरिपात जादा कर्जवाटप करण्यात आले होते. यंदाच्या रब्बी हंगामासाठी २ हजार १७५ हेक्टर क्षेत्रावरील ३ हजार ८२३ सभासदांना ७५ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी नोव्हेंबर अखेर ३२ कोटी २३ लाख ९३ हजार रुपयांचे (४८ टक्के) पीक कर्ज सभासदांना वाटप करण्यात आले असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी नोव्हेंबर अखेरीस रब्बीसाठी २४ कोटी ८३ लाख २३ हजाराचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत नोव्हेंबर अखेरपर्यंत यंदा ८ कोटींनी जादा पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. खरीप व रब्बी हंगाम मिळून वर्षभरात ११५० कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा बॅँकेच्या वतीने ठेवण्यात आले होते. त्यापैकी नोव्हेंबर अखेरपर्यंत १२४२ कोटी ५४ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेने तब्बल ४० कोटींहून अधिकचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)