शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

रब्बीसाठी ८ कोटींचे जादा पीककर्ज वाटप

By admin | Updated: November 21, 2015 00:18 IST

रब्बीसाठी ८ कोटींचे जादा पीककर्ज वाटप

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने मागील वर्षाच्या तुलनेने यंदाच्या रब्बी हंगामासाठी मध्यम मुदतीचे सुमारे ३२ कोटी २३ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील वर्षाच्या तुलनेत नोेव्हेंबर अखेर ८ कोटींनी जादा कर्जवाटप शेतकऱ्यांना करण्यात आलेले असले तरी एकूण लक्षांकाच्या केवळ ४८ टक्केच हे कर्जवाटप असल्याचे समजते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने सन २०१४-१५ या खरीप हंगामासाठी १०७ कोटी ५० लाखांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. २ लाख १९ हजार ५८८ सभासदांना १ लाख ७० हजार ८९२ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांसाठी हे पीक कर्ज देण्यात येणार होते. प्रत्यक्षात १२१ कोटी ३ लाख (११३ टक्के) पीक कर्जाचे खरीप हंगामासाठी वाटप करण्यात आले. मागील खरीप हंगामात हेच वाटप ११८ कोटी २४ लाखांच्या घरात होते. म्हणजेच मागील वर्षापेक्षा यावर्षी जिल्हा बॅँकेच्या वतीने जादाचे खरिपात जादा कर्जवाटप करण्यात आले होते. यंदाच्या रब्बी हंगामासाठी २ हजार १७५ हेक्टर क्षेत्रावरील ३ हजार ८२३ सभासदांना ७५ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी नोव्हेंबर अखेर ३२ कोटी २३ लाख ९३ हजार रुपयांचे (४८ टक्के) पीक कर्ज सभासदांना वाटप करण्यात आले असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी नोव्हेंबर अखेरीस रब्बीसाठी २४ कोटी ८३ लाख २३ हजाराचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत नोव्हेंबर अखेरपर्यंत यंदा ८ कोटींनी जादा पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. खरीप व रब्बी हंगाम मिळून वर्षभरात ११५० कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा बॅँकेच्या वतीने ठेवण्यात आले होते. त्यापैकी नोव्हेंबर अखेरपर्यंत १२४२ कोटी ५४ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेने तब्बल ४० कोटींहून अधिकचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)