शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

मतदार यादीच्या कामास आयोगाची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:39 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशपातळीवर प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्यासाठी मतदार पुर्नरिक्षण मोहिम १ नोव्हेंबरपासून सुरू केली आहे.

ठळक मुद्देपंधरा दिवस वाढवले : बीएलओेंची होणार धावपळगेल्या महिनाभरात फक्त ९२०० कुटुंबांच्या घरोघरी जावून बीएलओंनी पुर्नरिक्षण केले

नाशिक : देशपातळीवर सुरू असलेल्या मतदार याद्या अद्यावतीकरण कार्यक्रमांतर्गंत मतदारांच्या घरोघरी जावून नोंदणी करण्याच्या कामास होत असलेला विलंब पाहता, केंद्रीय निवडणूक आयोगाने या कामास आणखी पंधरा दिवस मुदतवाढ देण्याबरोबरच त्यामुळे या कामास गती द्यावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. आयोगाच्या या निर्णयामुळे बीएलओंना काहीसा दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने देशपातळीवर प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्यासाठी मतदार पुर्नरिक्षण मोहिम १ नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. यात प्रत्येक मतदान केंद्र निहाय केंद्रस्तरीय अधिका-यांची (बीएलओ) नेमणूक करून मतदारांच्या घरोघरी जावूून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने नवीन मतदाराची नोंदणी, दुबार व मयत मतदारांच्या नावात कपात, मतदान केंद्रातील बदल, मतदारांचे छायाचित्रे गोळा करणे अशी कामे प्रत्येक घरोघरी जाऊन करणे अपेक्षित धरले आहे. शिवाय मतदारांची संपुणर्ल माहिती आॅनलाईन भरून, त्याच्या निवासाचे अक्षांश-रेखांश देखील नमूद करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या कामासाठी सर्वच शासकीय कर्मचा-यांची नेमणूक करण्याचे शासनाचे आदेश असले तरी, जिल्हाधिका-यांनी शिक्षकांवरच ही कामे सोपविली आहेत. मुळात नोव्हेंबर महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू असताना त्यात शाळेचे कामकाज सांभाळून मतदार याद्यांचे काम करण्यास शिक्षकांनी विरोध दर्शविला होता, त्यातच काही शाळेच्या सर्वच्या सर्व शिक्षकांना मतदार नोंदणीच्या कामात जुंपल्यामुळे शाळा ओस पडण्याच्या भितीपोटी संस्थाचालकांनीच शिक्षकांना मतदार यादीच्या कामापासून दूर ठेवले. परिणामी देशपातळीवरच मतदार याद्यांचे पुर्नरिक्षण धिम्या गतीने होत असल्याची बाब केंद्रीय निवडणूक आयोगाने अलिकडेच घेतलेल्या राज्यांच्या आढाव्यावरून स्पष्ट झाली. सर्वच ठिकाणी बीएलओंकडून कामे होत नसल्याचे सांगण्यात आल्याने आयोगाने आता ३० नोव्हेंबर ऐवजी १५ डिसेंबरपर्यंत मतदार याद्यांचे काम पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.नाशिक जिल्ह्यात गेल्या महिनाभरात फक्त ९२०० कुटुंबांच्या घरोघरी जावून बीएलओंनी पुर्नरिक्षण केले असून, साडेसात लाख कुटुंबाच्या मानाने केले गेलेले सर्व्हेक्षण अगदीच अल्प असल्याने जिल्ह्यातील दहा तहसिलदारांना निवडणूक शाखेने नोटीस पाठवून जाब विचारण्याची तयारी केली आहे. परंतु आता आयोगाने याकामास मुदतवाढ दिल्यामुळे येत्या पंधरा दिवसात सदरचे काम पुर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय