शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीच्या कामास आयोगाची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:39 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशपातळीवर प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्यासाठी मतदार पुर्नरिक्षण मोहिम १ नोव्हेंबरपासून सुरू केली आहे.

ठळक मुद्देपंधरा दिवस वाढवले : बीएलओेंची होणार धावपळगेल्या महिनाभरात फक्त ९२०० कुटुंबांच्या घरोघरी जावून बीएलओंनी पुर्नरिक्षण केले

नाशिक : देशपातळीवर सुरू असलेल्या मतदार याद्या अद्यावतीकरण कार्यक्रमांतर्गंत मतदारांच्या घरोघरी जावून नोंदणी करण्याच्या कामास होत असलेला विलंब पाहता, केंद्रीय निवडणूक आयोगाने या कामास आणखी पंधरा दिवस मुदतवाढ देण्याबरोबरच त्यामुळे या कामास गती द्यावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. आयोगाच्या या निर्णयामुळे बीएलओंना काहीसा दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने देशपातळीवर प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्यासाठी मतदार पुर्नरिक्षण मोहिम १ नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. यात प्रत्येक मतदान केंद्र निहाय केंद्रस्तरीय अधिका-यांची (बीएलओ) नेमणूक करून मतदारांच्या घरोघरी जावूून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने नवीन मतदाराची नोंदणी, दुबार व मयत मतदारांच्या नावात कपात, मतदान केंद्रातील बदल, मतदारांचे छायाचित्रे गोळा करणे अशी कामे प्रत्येक घरोघरी जाऊन करणे अपेक्षित धरले आहे. शिवाय मतदारांची संपुणर्ल माहिती आॅनलाईन भरून, त्याच्या निवासाचे अक्षांश-रेखांश देखील नमूद करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या कामासाठी सर्वच शासकीय कर्मचा-यांची नेमणूक करण्याचे शासनाचे आदेश असले तरी, जिल्हाधिका-यांनी शिक्षकांवरच ही कामे सोपविली आहेत. मुळात नोव्हेंबर महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू असताना त्यात शाळेचे कामकाज सांभाळून मतदार याद्यांचे काम करण्यास शिक्षकांनी विरोध दर्शविला होता, त्यातच काही शाळेच्या सर्वच्या सर्व शिक्षकांना मतदार नोंदणीच्या कामात जुंपल्यामुळे शाळा ओस पडण्याच्या भितीपोटी संस्थाचालकांनीच शिक्षकांना मतदार यादीच्या कामापासून दूर ठेवले. परिणामी देशपातळीवरच मतदार याद्यांचे पुर्नरिक्षण धिम्या गतीने होत असल्याची बाब केंद्रीय निवडणूक आयोगाने अलिकडेच घेतलेल्या राज्यांच्या आढाव्यावरून स्पष्ट झाली. सर्वच ठिकाणी बीएलओंकडून कामे होत नसल्याचे सांगण्यात आल्याने आयोगाने आता ३० नोव्हेंबर ऐवजी १५ डिसेंबरपर्यंत मतदार याद्यांचे काम पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.नाशिक जिल्ह्यात गेल्या महिनाभरात फक्त ९२०० कुटुंबांच्या घरोघरी जावून बीएलओंनी पुर्नरिक्षण केले असून, साडेसात लाख कुटुंबाच्या मानाने केले गेलेले सर्व्हेक्षण अगदीच अल्प असल्याने जिल्ह्यातील दहा तहसिलदारांना निवडणूक शाखेने नोटीस पाठवून जाब विचारण्याची तयारी केली आहे. परंतु आता आयोगाने याकामास मुदतवाढ दिल्यामुळे येत्या पंधरा दिवसात सदरचे काम पुर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय