शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

राष्ट्रपतींकडून दुष्काळावर चिंता व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:45 IST

राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करून योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथील विश्वशांती अहिंसा संमेलनात बोलताना केली. दरम्यान, राज्यातील १७९ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून, त्यासंदर्भातील अध्यादेश लवकरच काढण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ऋषभदेवपुरम (मांगीतुंगी) : राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करून योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथील विश्वशांती अहिंसा संमेलनात बोलताना केली. दरम्यान, राज्यातील १७९ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून, त्यासंदर्भातील अध्यादेश लवकरच काढण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  भगवान ऋषभदेव यांच्या विश्वविक्र मी १०८ फूट उंच मूर्तीच्या निर्माण समितीतर्फे आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन सोमवारी (दि. २२) राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. आपण कझाकीस्तानमध्ये दौऱ्यावर गेलो असता तेथेही दुष्काळी परिस्थिती होती असे तेथील राष्ट्रपतींनी आपल्याला सांगितले होते. आपल्या आगमनावेळी तेथे पाऊस झाला होता, असे सांगून राष्ट्रपती कोविंद यांनी राज्यातील दुष्काळाबाबत आपण चिंतित असल्याचे यावेळी सांगितले.  अध्यक्षस्थानावरून बोलताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी परिसरातील दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. या मुद्द्याला अनुसरून बोलताना मुख्यमंत्री फडणवीस  वीज बील माफी सारख्या ९ प्रकारच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले. निसर्गातील वाढत्या असमतोलाकडे लक्ष वेधताना त्यांनी निसर्गाशी छेडछाड करणे बंद न केल्यास मानव जातीचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त करून निसर्गासोबत सहजीवन व सहिष्णूतेने व्यवहार ठेवावा लागण्याची गरजही व्यक्त केली.याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रपतींच्या पत्नी सौ. सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागरराव, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, गणीनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी, आर्यिकारत्न चंदनामती माताजी, पीठाधिश स्वामी रविंद्र कीर्ती, वाशीम येथील आमदार राजेन पाटनी आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षRamnath Kovindरामनाथ कोविंद