शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एक लाख टन कांद्याची निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:18 IST

मागणी वाढल्याने मध्य रेल्वेकडून मालगाड्यांद्वारे बांगलादेशाला आतापर्यंत १.२६२ लाख टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. कोरोनासह गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात अडकलेल्या जिल्ह्यातील बळीराजासह निर्यातदारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देशुभ वर्तमान : जिल्ह्यातून मालवाहू रेल्वे बांगलादेशात रवाना; उत्पादकांना दिलासा

लासलगाव : मागणी वाढल्याने मध्य रेल्वेकडून मालगाड्यांद्वारे बांगलादेशाला आतापर्यंत १.२६२ लाख टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. कोरोनासह गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात अडकलेल्या जिल्ह्यातील बळीराजासह निर्यातदारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.मध्य रेल्वेने मे, जून आणि जुलै महिन्यात आतापर्यंत ५५ मालगाड्यांद्वारे वाहतूक करून एक लाख टनाहून अधिक कांद्याची निर्यात केली आहे. रेल्वेसाठी ही मोठी कामगिरी मानली जात आहे. शेजारी देश असलेल्या बांगलादेशच्या आवश्यक गरजाही या निमित्त पूर्ण केल्या आहेत. केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या विनंतीनुसार रेल्वेने बांगलादेशात कांद्याची निर्यात सुरू करण्यात आली आहे. मालवाहतुकीला चालना देण्यासाठी मध्य रेल्वेने मालवाहतूक करणाऱ्या ग्राहकांसमवेत आभासी (व्हर्च्युअल) बैठक आयोजित करत निर्यातीबाबत मार्गदर्शन केले आहे. मध्य रेल्वेवरील सर्व विभागीय स्तरावरसुद्धा अशाच बैठका घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात देशातच कांदा पाठविणे अवघड झालेले असताना व सर्व साधने ठप्प असताना थेट बांगलादेशात गेल्या कित्येक वर्षांत रेल्वेने महत्त्वाची भूमिका घेत कांदा रवाना केला आहे. त्याला प्रतिसाद मिळत असताना कांदा निर्यातीची पूर्तता करण्यासाठी स्थानकांवर व्यापारी मागणी नोंदवत आहेत. आतापर्यंत १.२६२ लाख टन कांदा भरलेल्या ५५ मालगाड्या भुसावळ विभागातील नाशिक, खेरवाडी, निफाड, लासलगाव आणि मनमाड स्थानकांमधून तसेच सोलापूर विभागाच्या कोपरगाव, येवला स्थानकांमधून बांगलादेशातील दर्शना, रोहनपूर, बिरोले आणि बेनापोल येथे पाठविण्यात आल्या आहेत.मध्य रेल्वेने मालवाहतूक करणाºया संबधितांशी नियमतिपणे घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकांद्वारे बांगलादेशात कांद्याची निर्यात करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून मालवाहतूकदारांना साहाय्य केले जात आहे. लोडिंगदरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारांनी दिलेल्या निर्देशानुसार सोशल डिस्टिन्संगसह निर्जंतुकीकरण व विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

लासलगाव ते बांगलादेश येथील दर्शना येथे दि. ६ मे २०२० रोजी पाठविण्यात आलेल्या पहिल्या रॅकपासून निर्यातीला सुरु वात झाली.मे महिन्यातच २७ मालगाड्यांद्वारे कांदा निर्यात करण्यात आली. जूनमध्ये २३, जुलैमध्ये आतापर्यंत ५ मालगाड्या बांगलादेशात रवाना करण्यात आल्या आहेत. ५५ पैकी १३ मालगाड्या मनमाडहून, निफाडहून ११, येवला येथून १०, खेरवाडी येथून ८, नाशिकहून ७, लासलगाव येथून ५ आणि कोपरगाव येथून एक रेल्वे अशा मालगाड्या रवाना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :onionकांदाMarketबाजार