शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

कांद्यावरील निर्यातबंदी उठविणार - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 01:00 IST

सटाणा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निवडणूक झाल्याच्या दुसºयाच दिवशी आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालून कांद्यावरील निर्यातबंदी उठवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सभेत बोलताना दिली. याचवेळी विरोधकांवर टीका करताना त्यांनी आघाडीचा जाहीरनामा म्हणजे लबाडाघरचं आवतन असल्याचीही टीका केली.

ठळक मुद्देसटाणा येथे सभा : आघाडीचा जाहीरनामा म्हणजे लबाडाघरचं आवतन असल्याची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निवडणूक झाल्याच्या दुसºयाच दिवशी आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालून कांद्यावरील निर्यातबंदी उठवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सभेत बोलताना दिली. याचवेळी विरोधकांवर टीका करताना त्यांनी आघाडीचा जाहीरनामा म्हणजे लबाडाघरचं आवतन असल्याचीही टीका केली.येथील पाठक मैदानावर बुधवारी (दि.९) सायंकाळी बागलाण विधानसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, उमेदवार व माजी आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार उमाजी बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या २३ मिनिटांच्या भाषणात गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा आलेख वाचून दाखवण्याबरोबरच कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचा त्यांनी समाचार घेतला. फडणवीस यांनी सांगितले, आघाडीच्या जाहीरनाम्यात फक्त एकच गोष्ट राहून गेली ती म्हणजे प्रत्येक नागरिकाला एक ताजमहाल बांधून देऊ. पंधरा वर्षे खोटीआश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या, मात्र एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणारानार-पार प्रकल्प आगामी काळात भाजपला साथ दिल्यास येत्या पाच वर्षांत तोदेखील पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.दरम्यान, बागलाणमधील सिंचनाचे प्रश्न, प्रत्येक नदीवर केटीवेअर बंधारे, प्रत्येक घराला नळाचे पाणी, प्रत्येक शेतशिवारात पाणी, वीज, आरोग्य, रस्ते आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून तालुका सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी दिलीप बोरसे यांच्या सारख्या हाडाच्या शेतकºयाला विधानसभेत पाठविण्याचे आवाहनही शेवटी त्यांनी केले. डॉ. भामरे, दिलीप बोरसे, दादा जाधव, लालचंद सोनवणे, महेंद्र शर्मा, महेश देवरे, अण्णासाहेब सावंत, अरविंद सोनवणे, रासपचे महेंद्र अहिरे, साहेबराव सोनवणे यांनीही आपले विचार मांडले. यावेळी कॉँग्रेसचे नगरसेवक पोपट अहिरे यांनी भाजपत प्रवेश केला.शरद पवार म्हणजे शोलेतील जेलरपंधरा वर्षांच्या आघाडीच्या काळात जेवढी कामे झाली नाही त्याच्या दुपटीने गेल्या पाच वर्षांत कामे झाली. हे जनतेने अनुभवले म्हणूनच जनताजनार्दनाने कॉँग्रेस-राष्ट्रवादीची वाईट अवस्था केली. आज शरद पवार यांची अवस्था शोले सिनेमातील जेलरसारखी झाली आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019baglan-acबागलाण