शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

नव्या बांधकाम नियमावलीच्या आडून विकासकांना खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:18 IST

नाशिक- नवीन बांधकाम नियमवाली सुटसूटीत असल्याचे सांगणाऱ्या राज्य शासनाने निर्माणाधिन बांधकामांना हीच नियमवली लागु करण्यासाठी मात्र खळखळ सुरू केली ...

नाशिक- नवीन बांधकाम नियमवाली सुटसूटीत असल्याचे सांगणाऱ्या राज्य शासनाने निर्माणाधिन बांधकामांना हीच नियमवली लागु करण्यासाठी मात्र खळखळ सुरू केली आणि सर्वच कामांना ब्रेक लावला. जर शासनाला त्याबाबत निर्णयच घ्यायचा होता तर तो मूळ नियमावलीत घेता आला असता त्यासाठी वेगळे धोरण ठरवण्यामागे कारण काय यावरून आता एकूणच शासनाच्या संबंधित विभागाविषयी उलट सूलट चर्चा सुरू झाली आहे.

तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर गेल्या २ डिसेंबर राेजी राज्य शासनाने राज्यातील सर्व महापालिकांसाठी सर्वसमावेशक बांधकाम नियमावली म्हणजेच युनीफाईड डीसीपीआर मंजुर केला. त्यात एका ठिकाणी त्यांनी सध्या जी बांधकामे मंजुर आहेत व त्यांचे काम सुरू आहेत, अशा बांधकामांना जर नव्या नियमावलीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन पाठवण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. (प्रकरण .१५, ए टू एच) मुळात शासनाने नियमवाली तयार करताना तब्बल तीन वर्षांचा कालावधी लावला आहे. जर इतकाच विलंब झाला तर त्यात त्यातच निर्माणाधिन बांधकामांसंदर्भातील मार्गदर्शन करायला हवे ते का केले नाही आणि त्यानंतरही २ डिसेंबर राेजी ही नियमावली मंजुर केल्यानंतर साधी समिती नियुक्त करण्यास १ फेब्रुवारीचा मुहूर्त शाेधला. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी १५ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत पुन्हा वाढवली जाणार नाही असेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता पर्यंत तर मार्गदर्शन येण्याची गरज हाेती, परंतु तसे का झाले नाही असा प्रश्न देखील केला जात आहे.

इन्फो...

गोंधळात गोंधळ...

राज्य शासनाने जर २ डिसेंबर रोजी नवीन बांधकाम नियमावली प्रसिध्द केली, त्यात निर्माणाधिन प्रकरणांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन देणार असल्याचे स्पष्ट केले होते तर नाशिक सारख्या महापालिकेने यासंदर्भतील प्रस्ताव दाखल का करून घेतले असा एक प्रश्न आहे. यासंदर्भात नगररचना खात्याच्या समावेशक नियमावलीच्या प्रचारासाठी नियुक्त केलेल्या निवृत्त अधिकाऱ्याने नाशिकमध्येच आयोजित चर्चासत्रात अशाप्रकारे प्रकरण दाखल करण्यास हरकत नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सेवानिवृत्तीनंतर संबंधीत अधिकाऱ्याने दिलेला सल्ला आणि प्रत्यक्ष शासनाने दिलेले आदेश यात महत्वाचे काय याचा विचार महापालिकेने केलेला नाही.