शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

ब्रह्मगिरीला परिसंवेदनशील घोषित करण्यासाठी तज्ज्ञांची रसद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 01:49 IST

ब्रह्मगिरीच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने परिसंवेदनशील (इको सेन्सेटिव्ह) क्षेत्र घोषित करण्यासाठी कार्यवाही केली आहे. यासंदर्भातील सर्वेक्षण गुरुवारपासूनच (दि. २९) सुरू करण्यात आले आहे. जलतज्ज्ञ राजेंंद्रसिंंह यांनी या निर्णयाचे स्वागत करताना दोन तज्ज्ञ जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.

ठळक मुद्देराजेंद्रसिंह यांच्याकडून मदत : सर्वेक्षणाचे काम सुरू

नाशिक : ब्रह्मगिरीच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने परिसंवेदनशील (इको सेन्सेटिव्ह) क्षेत्र घोषित करण्यासाठी कार्यवाही केली आहे. यासंदर्भातील सर्वेक्षण गुरुवारपासूनच (दि. २९) सुरू करण्यात आले आहे. जलतज्ज्ञ राजेंंद्रसिंंह यांनी या निर्णयाचे स्वागत करताना दोन तज्ज्ञ जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.

नदी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. नीलेश हेडा तर वने क्षेत्रातील तज्ज्ञ मोहनभाई हिराभाई ही या दोन तज्ज्ञांची नावे असून ते जिल्हाधिकाऱ्यांना सक्रिय मदत करतील, असे राजेंद्रसिंह यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेत ब्रह्मगिरीची जैव विविधता आणि धार्मिक महत्त्व यांची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे ती अधिक महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.

नाशिकच नव्हे तर सात राज्यांत गोदावरी नदीचा संबंध येतो. त्यामुळे गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीच्या ठिकाणी बेकायदा उत्खनन सुरू करण्यात आल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्याविरुद्ध नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर या लढ्यात राजेंद्रसिंहदेखील सहभागी झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी सात राज्यांतील पर्यावरणप्रेमीही या लढ्यात सहभागी करून घेतले होते. नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर राजेंद्रसिंह यांनी बुधवारी (दि. २८) जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ब्रह्मगिरी पर्वत परिसंवेदनशील घोषित करण्यात येईल, असे सांगितले आणि त्यानुसार सायंकाळीच अधिसूचनादेखील जारी केली आणि गुरुवारी (दि. २९) त्याचे कामदेखील सुरू केले आहे, तसे जिल्हाधिकाऱ्यांनी राजेंद्रसिंह यांना कळवले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर