शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ब्रह्मगिरीला परिसंवेदनशील घोषित करण्यासाठी तज्ज्ञांची रसद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 01:49 IST

ब्रह्मगिरीच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने परिसंवेदनशील (इको सेन्सेटिव्ह) क्षेत्र घोषित करण्यासाठी कार्यवाही केली आहे. यासंदर्भातील सर्वेक्षण गुरुवारपासूनच (दि. २९) सुरू करण्यात आले आहे. जलतज्ज्ञ राजेंंद्रसिंंह यांनी या निर्णयाचे स्वागत करताना दोन तज्ज्ञ जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.

ठळक मुद्देराजेंद्रसिंह यांच्याकडून मदत : सर्वेक्षणाचे काम सुरू

नाशिक : ब्रह्मगिरीच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने परिसंवेदनशील (इको सेन्सेटिव्ह) क्षेत्र घोषित करण्यासाठी कार्यवाही केली आहे. यासंदर्भातील सर्वेक्षण गुरुवारपासूनच (दि. २९) सुरू करण्यात आले आहे. जलतज्ज्ञ राजेंंद्रसिंंह यांनी या निर्णयाचे स्वागत करताना दोन तज्ज्ञ जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.

नदी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. नीलेश हेडा तर वने क्षेत्रातील तज्ज्ञ मोहनभाई हिराभाई ही या दोन तज्ज्ञांची नावे असून ते जिल्हाधिकाऱ्यांना सक्रिय मदत करतील, असे राजेंद्रसिंह यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेत ब्रह्मगिरीची जैव विविधता आणि धार्मिक महत्त्व यांची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे ती अधिक महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.

नाशिकच नव्हे तर सात राज्यांत गोदावरी नदीचा संबंध येतो. त्यामुळे गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीच्या ठिकाणी बेकायदा उत्खनन सुरू करण्यात आल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्याविरुद्ध नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर या लढ्यात राजेंद्रसिंहदेखील सहभागी झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी सात राज्यांतील पर्यावरणप्रेमीही या लढ्यात सहभागी करून घेतले होते. नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर राजेंद्रसिंह यांनी बुधवारी (दि. २८) जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ब्रह्मगिरी पर्वत परिसंवेदनशील घोषित करण्यात येईल, असे सांगितले आणि त्यानुसार सायंकाळीच अधिसूचनादेखील जारी केली आणि गुरुवारी (दि. २९) त्याचे कामदेखील सुरू केले आहे, तसे जिल्हाधिकाऱ्यांनी राजेंद्रसिंह यांना कळवले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर