शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

ब्रह्मगिरीला परिसंवेदनशील घोषित करण्यासाठी तज्ज्ञांची रसद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 01:49 IST

ब्रह्मगिरीच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने परिसंवेदनशील (इको सेन्सेटिव्ह) क्षेत्र घोषित करण्यासाठी कार्यवाही केली आहे. यासंदर्भातील सर्वेक्षण गुरुवारपासूनच (दि. २९) सुरू करण्यात आले आहे. जलतज्ज्ञ राजेंंद्रसिंंह यांनी या निर्णयाचे स्वागत करताना दोन तज्ज्ञ जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.

ठळक मुद्देराजेंद्रसिंह यांच्याकडून मदत : सर्वेक्षणाचे काम सुरू

नाशिक : ब्रह्मगिरीच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने परिसंवेदनशील (इको सेन्सेटिव्ह) क्षेत्र घोषित करण्यासाठी कार्यवाही केली आहे. यासंदर्भातील सर्वेक्षण गुरुवारपासूनच (दि. २९) सुरू करण्यात आले आहे. जलतज्ज्ञ राजेंंद्रसिंंह यांनी या निर्णयाचे स्वागत करताना दोन तज्ज्ञ जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.

नदी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. नीलेश हेडा तर वने क्षेत्रातील तज्ज्ञ मोहनभाई हिराभाई ही या दोन तज्ज्ञांची नावे असून ते जिल्हाधिकाऱ्यांना सक्रिय मदत करतील, असे राजेंद्रसिंह यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेत ब्रह्मगिरीची जैव विविधता आणि धार्मिक महत्त्व यांची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे ती अधिक महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.

नाशिकच नव्हे तर सात राज्यांत गोदावरी नदीचा संबंध येतो. त्यामुळे गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीच्या ठिकाणी बेकायदा उत्खनन सुरू करण्यात आल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्याविरुद्ध नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर या लढ्यात राजेंद्रसिंहदेखील सहभागी झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी सात राज्यांतील पर्यावरणप्रेमीही या लढ्यात सहभागी करून घेतले होते. नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर राजेंद्रसिंह यांनी बुधवारी (दि. २८) जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ब्रह्मगिरी पर्वत परिसंवेदनशील घोषित करण्यात येईल, असे सांगितले आणि त्यानुसार सायंकाळीच अधिसूचनादेखील जारी केली आणि गुरुवारी (दि. २९) त्याचे कामदेखील सुरू केले आहे, तसे जिल्हाधिकाऱ्यांनी राजेंद्रसिंह यांना कळवले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर