शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 22:56 IST

गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम केले नाही. अनेक वर्षे काम करणाºया कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देकळवण नगरपंचायत : कर्मचाऱ्यांना किमान वेतन, महागाई भत्ता देण्याची मागणी

कळवण : गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम केले नाही. अनेक वर्षे काम करणाºया कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.नगरपंचायतीच्या कर्मचाºयांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वेळोवेळी आंदोलने करूनही मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचारी संघटनांनी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामुळे नागरपंचायतीच्या सेवेवर परिणाम होणार आहे. ग्रामपंचायती बरखास्त करून त्याचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायतीमध्ये सफाई, संगणक आॅपरेटर, पाणीपुरवठा व आदी विभागातील कर्मचारी गेली अनेक वर्षापासून काम करत आहेत. मयत झालेल्या कर्मचाºयाच्या कुटुंबाला सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात यावा, वारसांना वारसा हक्काने अथवा अनुकंपाखाली नोकरी मिळावी, नागरपंचायतीमधील कर्मचाºयांना सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्रामपंचायतीची सेवा ग्राह्य धरण्यात यावी, सफाई कामगारांचे शासकीय सेवेत समावेशन करावे, तसेच रोजदारी कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्यात यावे, तत्कालीन ग्रामपंचायत जे कर्मचारी वसुली कारकून पदावर कार्यरत होते त्यांना नगरपंचायत सेवेत शिपाईपदाचा आदेश देण्यात आलेला आहे. या आंदोलनात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विक्र म निकम, ताराबाई गोयर, जिजाबाई बस्ते, अशोक अहिरे, संजय आहेर, भाऊराव पगार, रामराव सोनवणे, बापू आहेर, किरण निकम, कैलास पगार, रोशन निकम, रमेश पगार, बेबीबाई बस्ते, उज्ज्वला बस्ते, जीवन सोनवणे, भीमाबाई बस्ते, कमल केदार, सिंधूबाई गोयर, संगीता बस्ते, दगा पगार आदी कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणात सहभागी झाले आहेत. ग्रामपंचायत व नगरपंचायत सेवा धरून आज २५ वर्षे झाली आहे, जेव्हा ते सेवेत रु जू झाले तेव्हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असण्याची अट होती. त्यांना लिपिकपदावर घेण्यात यावे व यासह सर्व कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के भत्ता फरकासह मिळावा या मागण्यांसाठी आज कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय इमारतीतील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारStrikeसंप