शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षित ‘साहित्यिक’ अपेक्षाभंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:06 IST

महामंडळाचे अध्यक्ष ‘स्थळ पाहणी’साठी नाशकात आले असताना त्यांनी ज्या शब्दात उस्मानाबादची पाठराखण केली होती, त्या शब्दांमधूनच ही पाहणी केवळ दिखावा असल्याचा प्रत्यय येत होता. त्यामुळे साहित्य संमेलन हे उस्मानाबादला देण्यात येत असल्याची अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांची घोषणा हा नाशिकच्या साहित्यिक वर्तुळासाठी अपेक्षित अपेक्षाभंग ठरला आहे.

नाशिक : महामंडळाचे अध्यक्ष ‘स्थळ पाहणी’साठी नाशकात आले असताना त्यांनी ज्या शब्दात उस्मानाबादची पाठराखण केली होती, त्या शब्दांमधूनच ही पाहणी केवळ दिखावा असल्याचा प्रत्यय येत होता. त्यामुळे साहित्य संमेलन हे उस्मानाबादला देण्यात येत असल्याची अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांची घोषणा हा नाशिकच्यासाहित्यिक वर्तुळासाठी अपेक्षित अपेक्षाभंग ठरला आहे.गत आठवड्याच्या प्रारंभी ढाले पाटील आणि तथाकथित ‘संमेलन स्थळ पाहणी समिती’ यांनी पाच स्थळांवर जाऊन ‘नाशिक दर्शन’ केले. मराठी साहित्य संमेलन नाशकात भरवायचे की उस्मानाबादला याबाबतचा निर्णय घेण्यासाठी या स्थळ पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करतानादेखील पाटील यांनी नाशिकचे भौगोलिक स्थान, हवामान, जागा, पाणी उपलब्धता या सर्व बाबींपेक्षा आयोजकांकडून कशा प्रकारच्या ‘तयारी’चे आश्वासन मिळते, त्याचा आढावा घेऊनच ‘समिती’ निर्णय घेत असल्याचे सांगितले होते. सध्याच्या दुष्काळजन्य स्थितीत उस्मानाबाद सारख्या सदैव पाणीप्रश्न असणाºया जिल्ह्यात साहित्य संमेलन भरवणे कितपत योग्य ठरेल ? या प्रश्नावर ढाले पाटील यांनी तेथील आयोजकांनी पाण्याबाबत आश्वस्त केले असल्याचे सांगताच संमेलनाचे ‘पाणी’ कोणत्या उताराकडे धावत आहे आणि कुठे मुरणार आहे ? तेच सूचित झाले होते. त्यात महामंडळाचे कार्यालय मराठवाड्यात स्थलांतरित झाले असल्याने हे अपेक्षितच होते.स्वागताध्यक्ष निवडीत पडले उणेनाशिकला आलेल्या स्थळ पाहणी समितीमधील एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर नाशिककर ‘भक्कम स्वागताध्यक्ष’ निवडण्यातच कमी पडल्याने नाशिकला स्थळ निवडीत यंदा पसंती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘सावानाच्या पुढाकाराने सर्व नाशिककरांचे संमेलन’ ही कल्पना ऐकायला रम्य वाटत असली तरी ‘संमेलन भरवणे’ नामक बाजारात ती पिछाडीवर पडणारी असते, अशी सूचनादेखील केली.नाशिकच्या पाहणी दौºयात अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, नाशिकमध्ये दोनवेळा संमेलन झाले असून, मागील संमेलन १३ वर्षांपूर्वीच झाले आहे, तर उस्मानाबादला अद्याप एकदादेखील संमेलन झालेले नाही. त्यामुळे पोट भरलेल्याला पुन्हा द्यायचे की उपाशी असलेल्याला त्याबाबत त्यांनी घेतलेला निर्णय अयोग्य म्हणता येत नाही.- किशोर पाठक, उपाध्यक्ष, सावाना

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक