शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अतिवृष्टी मदतीची मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा

By admin | Updated: September 8, 2016 01:01 IST

पीककर्ज : २२ हजार हेक्टरवरील पिके बाधीत; ७९ हजार शेतकऱ्यांना बसला फटका

नाशिक : गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे सुमारे २२ हजार हेक्टरवरील बाधीत झालेली पिके अशा परिस्थितीत जिल्हा बॅँकेने पीककर्ज देण्यास दिलेला नकार, पुरात वाहून गेलेला घर-संसार उभा करण्यासाठी शासनाकडून असलेली मदत अशा एक नव्हे तर अनेक अपेक्षा जिल्हावासीय मुख्यमंत्र्यांच्या नाशिक भेटीत बाळगून असून, ते काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विभागीय आढावा बैठकीच्या निमित्ताने गुरुवारी नाशकात दाखल होत असून, या भेटीत राजकीय पक्ष, संस्था, संघटना, शेतकऱ्यांनी त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. त्यात प्रामुख्याने गेल्या महिन्यात १ ते ८ आॅगस्ट दरम्यान नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत २२ हजार हेक्टरवरील शेती पिके वाहून गेल्याने त्याचा फटका ७९ हजार शेतकऱ्यांना बसला. त्याचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यकांनी पूर्ण करून अहवाल प्रशासनाला सादर केला असून, कृषी खात्याकडून अद्याप अनुदान मागणीचा प्रस्ताव आलेला नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. शासनाच्या नियमानुसार अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत मिळणे क्रमप्राप्त असताना महिना उलटूनही त्याबाबत शासनाने काही पावले उचलली नाहीत. असे असताना दुसरीकडे जिल्हा बॅँकेने पीककर्ज मंजूर करूनही ऐन हंगामाच्या तोंडावर पैसे नसल्याचे कारण पुढे करीत हात वर केले आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाखाहून शेतकरी पीककर्जामुळे वंचित असून, त्यांचे पिके धोक्यात आली आहेत. त्याच बरोबर गेल्या महिन्यात जिल्ह्यातील नद्या, नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली असून, अनेकांची पडझड होऊन संसारपयोगी वस्तूंची नासधूस झाली आहे. शासनाने फक्त घरांची पडझड झालेल्या अधिकृत घरांनाच आर्थिक मदत दिली, परंतु पूररेषेत वा अनधिकृत घरे बांधून राहणाऱ्यांना त्यापासून वंचित ठेवण्यात आले. तसेच संसारपयोगी साहित्यासाठी शासकीय सानुग्रह अनुदानही सरकारने देऊ केलेले नाही, अशा पूरग्रस्तांचेही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.