शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पुढील महिन्यात होणार मंत्रिमंडळ विस्तार : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:47 IST

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील महिन्यात केला जाणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली.मंत्रिमंडळात नाशिककरांना संधी देण्याबाबत विचार करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले.

नाशिक : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील महिन्यात केला जाणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली.मंत्रिमंडळात नाशिककरांना संधी देण्याबाबत विचार करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले.  पक्षाच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत सोमवारी (दि.२३) दानवे यांनी ही माहिती दिली. रावसाहेब दानवे म्हणाले, नाशिक शहरातील करवाढीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. याबाबत लवकरच बैठक होणार आहे. परंतु, नाशिककर त्रस्त असलेल्या करवाढीच्या मुद्द्यावर कोणतेही ठोस आश्वासन न देता या प्रश्नावर मौन बाळगण्याची भूमिका दानवे यांनी घेतली. दरम्यान, मे महिन्यात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता असून, यावेळी नाशिकचाही विचार केला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपा महाराष्ट्रातही गुजरातच्या धर्तीवर पक्षाची बांधणी करणार असून, ८० हजार बूथ प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक बूथवर २५ युवकांची नेमणूक करण्यात येणार असून, त्यांच्यावर मतदार यादीचे समोरील व मागच्या बाजूला असलेल्या ६० मतदारांची जबाबदारी सोपविण्यात येणार असून, या युवकांना पेजप्रमुख म्हणून संबोधण्यात येणार असल्याची माहितीही दानवे यांनी दिली. यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, प्रवक्ते सुहास फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल अहेर, संघटनमंत्री किशोर काळकर, ओबीसी अध्यक्ष विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष दादा जाधव आदी उपस्थित होते.प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठापक्षाने सरपंच पदापासून केंद्रीय मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्षासारखी महत्त्वाची पदे सोपविली आहेत. त्यामुळे आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे बोलून दाखवतानाच पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा असल्याचे सांगत रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा राज्य सरकारवर अंकुश असल्याचे अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट के ले.युतीबाबत चर्चा नाहीशिवसेनेसोबत युतीविषयी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. भाजपा संघटनात्मक विचारधारेचा पक्ष असून युतीसारखा महत्त्वाचा निर्णय कोणताही एक नेता घेऊ शकत नाही. त्यामुळे युतीची चर्चा करण्यासाठी जाणार असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारल्याचे वृत्त केवळ माध्यमांनी तयार केले असून, सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची वेळच मागितली नसल्याचा खुलासा रावसाहेब दानवे यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपा