शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

व्यायाम, मन:शांतीद्वारे निरोगी जीवन : रश्मी सोमाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:10 IST

नाशिक : प्रदूषण, ताणतणाव, कमी दर्जाचे अन्न या गोष्टींमुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. या गोष्टी शरीरातील पेशींना मारक ठरत असून, या गोष्टींपासून शरीराचा बचाव करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ रश्मी सोमाणी यांनी केले. महेशनवमीनिमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने ‘निरोगी जीवनाचा मूलमंत्र’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. टिळकवाडीतील ...

नाशिक : प्रदूषण, ताणतणाव, कमी दर्जाचे अन्न या गोष्टींमुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. या गोष्टी शरीरातील पेशींना मारक ठरत असून, या गोष्टींपासून शरीराचा बचाव करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ रश्मी सोमाणी यांनी केले. महेशनवमीनिमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने ‘निरोगी जीवनाचा मूलमंत्र’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. टिळकवाडीतील माहेश्वरी विद्यार्थी भवन येथे बुधवारी (दि.२०) हा कार्यक्रम पार पडला.सोमाणी पुढे म्हणाल्या, सकाळी उठल्या उठल्या चहा न पिता पाणी व एखादे त्या त्या मोसमातील फळ खावे. त्यानंतर अर्ध्या तासाने नाष्टा व चहा घ्यावा. नाष्टा ताजा हवा. २१ दिवस असा सराव केल्यास शरीराला त्याची सवय लागेल. मानवी शरीरात चांगले व वाईट दोन्ही प्रकारचे जिवाणू असतात. रात्रभर तोंडात चांगले जिवाणू जमा झालेले असतात. त्यामुळे पाणी पिऊन, फळे खाऊन ते जिवाणू शरीरात जाऊ द्यावे. उठल्या उठल्या ब्रश करू नये. पोटाचा वाढता घेर या सर्वांना सतावणाऱ्या समस्येवर उपाय सांगताना वेळ मिळेल तेव्हा कपालभाती करण्याचा सल्ला देण्यात आला. श्वास घेणे व सोडणे असा व्यायाम करीत पोटाचा आकार स्थिर राखू शकता. पायी चालण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शिल्पा हरकुट यांनी सूत्रसंचालन केले.आरोग्याच्या अनेक समस्यांचे मूळ कमी पाणी पिणे हे असून, प्रत्येकाने दिवसभरात भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. दररोेज कुठल्याही प्रकारचा किमान ४५ मिनिटे व्यायाम करावा, ताठ बसावे, ताठ उभे रहावे. पोश्चर फार महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Nashikनाशिक