शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

व्यायाम, मन:शांतीद्वारे निरोगी जीवन : रश्मी सोमाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:10 IST

नाशिक : प्रदूषण, ताणतणाव, कमी दर्जाचे अन्न या गोष्टींमुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. या गोष्टी शरीरातील पेशींना मारक ठरत असून, या गोष्टींपासून शरीराचा बचाव करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ रश्मी सोमाणी यांनी केले. महेशनवमीनिमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने ‘निरोगी जीवनाचा मूलमंत्र’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. टिळकवाडीतील ...

नाशिक : प्रदूषण, ताणतणाव, कमी दर्जाचे अन्न या गोष्टींमुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. या गोष्टी शरीरातील पेशींना मारक ठरत असून, या गोष्टींपासून शरीराचा बचाव करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ रश्मी सोमाणी यांनी केले. महेशनवमीनिमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने ‘निरोगी जीवनाचा मूलमंत्र’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. टिळकवाडीतील माहेश्वरी विद्यार्थी भवन येथे बुधवारी (दि.२०) हा कार्यक्रम पार पडला.सोमाणी पुढे म्हणाल्या, सकाळी उठल्या उठल्या चहा न पिता पाणी व एखादे त्या त्या मोसमातील फळ खावे. त्यानंतर अर्ध्या तासाने नाष्टा व चहा घ्यावा. नाष्टा ताजा हवा. २१ दिवस असा सराव केल्यास शरीराला त्याची सवय लागेल. मानवी शरीरात चांगले व वाईट दोन्ही प्रकारचे जिवाणू असतात. रात्रभर तोंडात चांगले जिवाणू जमा झालेले असतात. त्यामुळे पाणी पिऊन, फळे खाऊन ते जिवाणू शरीरात जाऊ द्यावे. उठल्या उठल्या ब्रश करू नये. पोटाचा वाढता घेर या सर्वांना सतावणाऱ्या समस्येवर उपाय सांगताना वेळ मिळेल तेव्हा कपालभाती करण्याचा सल्ला देण्यात आला. श्वास घेणे व सोडणे असा व्यायाम करीत पोटाचा आकार स्थिर राखू शकता. पायी चालण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शिल्पा हरकुट यांनी सूत्रसंचालन केले.आरोग्याच्या अनेक समस्यांचे मूळ कमी पाणी पिणे हे असून, प्रत्येकाने दिवसभरात भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. दररोेज कुठल्याही प्रकारचा किमान ४५ मिनिटे व्यायाम करावा, ताठ बसावे, ताठ उभे रहावे. पोश्चर फार महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Nashikनाशिक