शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वगळलेली कामे अंदाजपत्रकात समाविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 02:12 IST

महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी सादर केलेल्या १७८५.१४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात ११५ कोटी रुपयांची भर घालत १९००.१५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीने शनिवारी (दि.३१) झालेल्या विशेष अंदाजपत्रकीय सभेत महापौरांना सादर केले. दरम्यान, आयुक्तांनी स्थायीने सुचविलेली वाढ अमान्य करत स्थायीच्या अंदाजपत्रकाची हवा काढून घेतली असताना महापौरांनी मात्र, मंजूर असलेली परंतु आयुक्तांनी वगळलेली सुमारे १३२ कोटी रुपयांची कामे पुन्हा अंदाजपत्रकात समाविष्ट करत दणका दिला.

नाशिक : महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी सादर केलेल्या १७८५.१४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात ११५ कोटी रुपयांची भर घालत १९००.१५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीने शनिवारी (दि.३१) झालेल्या विशेष अंदाजपत्रकीय सभेत महापौरांना सादर केले. दरम्यान, आयुक्तांनी स्थायीने सुचविलेली वाढ अमान्य करत स्थायीच्या अंदाजपत्रकाची हवा काढून घेतली असताना महापौरांनी मात्र, मंजूर असलेली परंतु आयुक्तांनी वगळलेली सुमारे १३२ कोटी रुपयांची कामे पुन्हा अंदाजपत्रकात समाविष्ट करत दणका दिला.  स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी अहेर यांनी महापौर रंजना भानसी यांच्याकडे स्थायी समितीने तयार केलेले १९००.१५ कोटींचे आणि १८९९.७४ कोटी रुपये अपेक्षित खर्च असलेले ४१ लाखांचे अंदाजपत्रक सुपूर्द केले. यावेळी, हिमगौरी अहेर यांनी सांगितले, शहराच्या विकास कामांकरिता मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच नागरिकांवर अतिरिक्त बोजा पडू नये, याची काळजी अंदाजपत्रकात घेण्यात आली आहे. महापालिकेचे नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांसाठी प्रोत्साहनात्मक योजना म्हणून त्यांचा दोन लाख रुपयांचा विमा काढण्यात येणार असून, त्यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. शहरात अ‍ॅटोमॅटिक पद्धतीने चालणारे ई-टॉयलेट पीपीपीद्वारे उभारणी करण्यात येणार आहेत. सहाही विभागात प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी दहा युनिट उभारले जाणार आहेत. माणिकनगर येथे आंतरराष्टय दर्जाचे बॅडमिंटन आणि टेबलटेनिस, स्केटिंग कोर्ट उभारले जाणार आहे. त्यासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, शहरातील २९ प्रभागांकरिता प्रत्येकी तीन कोटी, तर उर्वरित दोन प्रभागांकरिता २.२५ कोटी याप्रमाणे प्रभाग विकास निधी दिला जाणार असून, त्यासाठी ९१.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. याशिवाय, शहराच्या जलद विकासासाठी परिवहन सेवा, अडथळामुक्त रस्ते व पदपथ, एलइडी दिवे बसवून ऊर्जा बचत करणे, गोदावरी, नंदिनी तसेच वाघाडी नद्यांचे सुशोभिकरण करणे आदी कामे प्रामुख्याने, वर्षभरात पूर्ण करण्याचा संकल्पही सभापती हिमगौरी अहेर यांनी केला. सुमारे नऊ तास चाललेल्या या विशेष अंदाजपत्रकीय सभेत ४७ सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. त्यात प्रामुख्याने, गेल्या वर्षी प्रभाग समित्यांसह महासभेवर मंजूर झालेल्या परंतु, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रद्दबातल ठरविलेल्या कामांचा अंतर्भाव अंदाजपत्रकात करण्याची मागणी सदस्यांनी केली. याशिवाय, मागील वर्षी नगरसेवक निधीतील कामेही थांबविण्यात आल्याने रोष व्यक्त करत त्यांना चालना देण्याची सूचना केली. पाणीपुरवठ्यापासून ते ड्रेनेजलाइनपर्यंतच्या समस्यांचाही सदस्यांनी ऊहापोह केला. सदस्यांनी सूचनांचा वर्षाव केल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तब्बल पावणेदोन तास भाषण करत सभागृहात सदस्यांनी मांडलेले मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. स्थायी समितीने सुचविलेली वाढ कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नसल्याने आयुक्तांचेच अंदाजपत्रक मंजूर करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु, महापौर रंजना भानसी यांनी गेल्या वर्षी नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेवकांनी सुचविलेली परंतु नंतर आयुक्तांनी वगळलेली सुमारे १३२ कोटी रुपयांची कामे पुन्हा अंदाजपत्रकात समाविष्ट करत सन २०१८-१९च्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.  गेल्या काही दिवसांत विविध निर्णयांमुळे आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यात वाढत चाललेली दरी तसेच विसंवाद याबाबतही सभागृहात पडसाद उमटले. गुरुमित बग्गा यांनी सांगितले, तुकाराम मुंढे यांच्या कामकाजाबद्दल कुणालाही आक्षेप नाही. त्यांनी नाशिकला चार वर्षे राहून रेकॉर्ड करावे. परंतु, त्यासाठी लोकप्रतिनिधींशी मिळतेजुळते घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला, तर मनसेचे गटनेता सलीम शेख यांनी महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी सदस्यांशी सुसंवाद साधण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रतिभा पवार यांनीही आपल्या शैलित भाषण करत नगरसेवकांच्या व्यथा मांडल्या आणि आयुक्तांना ‘महाबली’ची उपमा देतानाच महापौर या आमच्या ‘सीतामैया’ असल्याचे सांगितले.बससेवेला  विरोधकांचा विरोधआयुक्तांनी शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेण्यासाठी अंदाजपत्रकात सुरुवातीला ३० कोटींची तरतूद केलेली आहे. स्थायी समिती सभापतींनीही शहर बससेवा वर्षभरात ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, शहर बससेवा ताब्यात घेण्यास विरोधकांनी विरोध दर्शविला. माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सांगितले, बससेवा ताब्यात घेण्याइतपत मनपाची स्थिती नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठेही फायद्याची नाही. बससेवा महापालिकेने चालवावी, असे कायद्यात कुठेही बांधील कर्तव्य सांगितलेले नाही. आधीच महापालिकेची निधीची ओढाताण होत असताना बससेवा झेपावणार आहे काय, असा सवालही बग्गा यांनी केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका