शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:30 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा होणार की नाही, अशी शंका पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित होत आहे. मात्र, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असून, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असल्यामुळे त्या केंद्रीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देअमित देशमुख : महाविद्यालयांना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा होणार की नाही, अशी शंका पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित होत आहे. मात्र, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असून, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असल्यामुळे त्या केंद्रीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित महाविद्यालयातील सोयी-सुविधा रुग्णांकरिता उपलब्ध करुन देण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. के. आर. कोहली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्यासह राज्यभरातील पाचशेहून अधिक डॉक्टर्स या बैठकीत सहभागी झाले होते.कोविडच्या दुसऱ्या लाटेवरही मात करुकोरोनाची पहिली लाट ओसरली असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आता दुसरी लाट आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी सामना करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, नर्सिंग, डेंटल, फिजिओथेरपी या महाविद्यालयांनी चांगले कार्य केले आहे. दुसरी लाट थोपविण्यासाठी यापुढेही संपूर्ण ताकदीनिशी कोरोनावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन अमित देशमुख यांनी केले आहे.महाविद्यालयांनी कोविड नियमांचे पालन करावेवैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित महाविद्यालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून, याबाबत संस्थांनी गांभीर्यपूर्वक दक्षता घेतली पाहिजे. त्याचबरोबर संस्थेत कोणालाही कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण तातडीने करुन घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. दरम्यान, रुग्णसंख्या वाढत असली तरी लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे, अशी शासनाची भुमिका असून, लसीची कमतरता भासणार नाही, यासाठी दक्षता घेतली जात आहे. लसींचा जास्तीत जास्त पुरवठा व्हावा, याकरिता केंद्र सरकारकडे सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा