शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

लष्कराचा माजी जवान बनला नाशिक जिल्ह्यातील एकमेव मशरूम उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:12 IST

यशकथा : केवळ सात महिन्यांत केंद्र उभारणी आणि इतर खर्च वजा जाता त्यांनी चार लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

- आकाश  गायखे (चांदोरी, जि. नाशिक)

लष्कराची नोकरी सोडून बेभरवशाच्या शेती व्यवसायात उतरणे म्हणजे शुद्धवेडेपणाच. मात्र, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील सतीश खरात या लष्करी जवानाने घरच्यांचा विरोध डावलून हा धाडसी निर्णय घेतला. आज तो जिल्ह्यातील एकमेव मशरूम (आळंबी) उत्पादन केंद्राचा मालक आहे. केवळ सात महिन्यांत केंद्र उभारणी आणि इतर खर्च वजा जाता त्यांनी चार लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

सतीश खरात भारतीय लष्कराच्या सेवेत असताना त्यांची बदली शिमला (हिमाचल प्रदेश) येथे होती. तेथे त्यांना मशरूम उत्पादनाची प्रेरणा मिळाली. नोकरी सोडून शेती करण्याचा विचार त्यांनी घरात बोलून दाखविला. मात्र, त्याला घरच्यांसह अनेकांनी विरोध केला. मात्र, निर्धार कायम असल्याने त्यांनी वैद्यकीय कारणास्तव लष्कराची नोकरी सोडून दिली आणि मशरूम उत्पादन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, जळगाव, शिमला या ठिकाणी मशरूम उत्पादन केंद्रांना भेटी देऊन त्यांनी त्याची सखोल माहिती घेतली. त्यासाठी लागणाऱ्या वातावरणाचा अभ्यास केला.

नाशिक जिल्ह्यातील तापमान मशरूमसाठी पाहिजे तेवढे अनुकूल नसल्याचे अभ्यासानंतर त्यांच्या लक्षात आले. मात्र, हार न मानता त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून विविध देशांत मशरूम उत्पादन तंत्रज्ञानाविषयीची माहिती घेतली. त्यानंतर  इस्रायल  तंत्रज्ञानाला भारतीय तंत्रज्ञानाची जोड देत मशरूमसाठी लागणारे अनुकूल वातावरण चांदोरीसारख्या गावात तयार केले. प्रथम स्वत:च्या राहत्या घरात अळंबी उत्पादनाचा त्यांनी  प्रयोग केला. या प्रयोगात त्यांना २०० ते २५० ग्रॅम मशरूमचे उत्पादन मिळाले. उत्पादन कमी झाले तरी प्रयोग सफल झाल्याचा आनंद मोठा होता. यातूनच त्यांनी मोठ्या  प्रमाणात अळंबी उत्पादन करण्याचा निर्णय घेतला.

आळंबी उत्पादन केंद्र उभे करण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता होती. चांदोरी गावातील गोदावरी सोसायटी आवारात असलेला एक मोठा हॉल त्यांनी भाडेतत्त्वावर घेतला. आणि आळंबी उत्पादन केंद्र सुरू केले. ७६०० हजार चौरस फुटांच्या हॉलमध्ये ओलिस्टर ब्लू, साजर काजू, फ्लोरिडा, पिंक या चार प्रकारच्या मशरूमचे उत्पादन घेतले जाते. केंद्र उभारणीसाठी त्यांना सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला.  मे ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत त्यांनी १३०० किलोहून अधिक ताज्या (ओल्या) व १७० किलोहून अधिक सुक्या अळंबीचे उत्पादन घेतले आहे.

मोठ मोठे मॉल्स, स्थानिक बाजारपेठ आणि अगदी घरपाहोच ते मशरूमची विक्री करतात. मशरूमला त्यांना  सरासरी २१० ते ४९० रुपये किलो याप्रमाणे भाव मिळत आहे. आतापर्यंतच्या उत्पादनातून केंद्र उभारणीचा आणि इतर खर्च वजा जाता त्यांना चार लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुढील काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मशरूम विक्र ी करण्याचा त्यांचा मानस आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी