शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

लष्कराचा माजी जवान बनला नाशिक जिल्ह्यातील एकमेव मशरूम उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:12 IST

यशकथा : केवळ सात महिन्यांत केंद्र उभारणी आणि इतर खर्च वजा जाता त्यांनी चार लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

- आकाश  गायखे (चांदोरी, जि. नाशिक)

लष्कराची नोकरी सोडून बेभरवशाच्या शेती व्यवसायात उतरणे म्हणजे शुद्धवेडेपणाच. मात्र, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील सतीश खरात या लष्करी जवानाने घरच्यांचा विरोध डावलून हा धाडसी निर्णय घेतला. आज तो जिल्ह्यातील एकमेव मशरूम (आळंबी) उत्पादन केंद्राचा मालक आहे. केवळ सात महिन्यांत केंद्र उभारणी आणि इतर खर्च वजा जाता त्यांनी चार लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

सतीश खरात भारतीय लष्कराच्या सेवेत असताना त्यांची बदली शिमला (हिमाचल प्रदेश) येथे होती. तेथे त्यांना मशरूम उत्पादनाची प्रेरणा मिळाली. नोकरी सोडून शेती करण्याचा विचार त्यांनी घरात बोलून दाखविला. मात्र, त्याला घरच्यांसह अनेकांनी विरोध केला. मात्र, निर्धार कायम असल्याने त्यांनी वैद्यकीय कारणास्तव लष्कराची नोकरी सोडून दिली आणि मशरूम उत्पादन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, जळगाव, शिमला या ठिकाणी मशरूम उत्पादन केंद्रांना भेटी देऊन त्यांनी त्याची सखोल माहिती घेतली. त्यासाठी लागणाऱ्या वातावरणाचा अभ्यास केला.

नाशिक जिल्ह्यातील तापमान मशरूमसाठी पाहिजे तेवढे अनुकूल नसल्याचे अभ्यासानंतर त्यांच्या लक्षात आले. मात्र, हार न मानता त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून विविध देशांत मशरूम उत्पादन तंत्रज्ञानाविषयीची माहिती घेतली. त्यानंतर  इस्रायल  तंत्रज्ञानाला भारतीय तंत्रज्ञानाची जोड देत मशरूमसाठी लागणारे अनुकूल वातावरण चांदोरीसारख्या गावात तयार केले. प्रथम स्वत:च्या राहत्या घरात अळंबी उत्पादनाचा त्यांनी  प्रयोग केला. या प्रयोगात त्यांना २०० ते २५० ग्रॅम मशरूमचे उत्पादन मिळाले. उत्पादन कमी झाले तरी प्रयोग सफल झाल्याचा आनंद मोठा होता. यातूनच त्यांनी मोठ्या  प्रमाणात अळंबी उत्पादन करण्याचा निर्णय घेतला.

आळंबी उत्पादन केंद्र उभे करण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता होती. चांदोरी गावातील गोदावरी सोसायटी आवारात असलेला एक मोठा हॉल त्यांनी भाडेतत्त्वावर घेतला. आणि आळंबी उत्पादन केंद्र सुरू केले. ७६०० हजार चौरस फुटांच्या हॉलमध्ये ओलिस्टर ब्लू, साजर काजू, फ्लोरिडा, पिंक या चार प्रकारच्या मशरूमचे उत्पादन घेतले जाते. केंद्र उभारणीसाठी त्यांना सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला.  मे ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत त्यांनी १३०० किलोहून अधिक ताज्या (ओल्या) व १७० किलोहून अधिक सुक्या अळंबीचे उत्पादन घेतले आहे.

मोठ मोठे मॉल्स, स्थानिक बाजारपेठ आणि अगदी घरपाहोच ते मशरूमची विक्री करतात. मशरूमला त्यांना  सरासरी २१० ते ४९० रुपये किलो याप्रमाणे भाव मिळत आहे. आतापर्यंतच्या उत्पादनातून केंद्र उभारणीचा आणि इतर खर्च वजा जाता त्यांना चार लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुढील काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मशरूम विक्र ी करण्याचा त्यांचा मानस आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी