शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

मजूर गावी गेल्यासही वाढणार अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:10 IST

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे सध्या नाशिकमध्येच असलेल्या मजुरांनी मूळगावी जाण्याची धडपड सुरू केली आहे. शासकीय पातळीवर तशी परवानगी देण्याची तयारी सुरू आहे, मात्र तसे झाल्यास सर्वच प्रकारची कामे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे सध्या नाशिकमध्येच असलेल्या मजुरांनी मूळगावी जाण्याची धडपड सुरू केली आहे. शासकीय पातळीवर तशी परवानगी देण्याची तयारी सुरू आहे, मात्र तसे झाल्यास सर्वच प्रकारची कामे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने गेल्या २३ मार्चपासून सर्वत्र लॉकडाउन घोषित केले आहे. ते वाढतच असून आता तिसऱ्या टप्प्याचे लॉकडाउन सध्या सुरू आहे. तथापि, लॉकडाउनमुळे नाशिकमध्ये अनेक मजुरांना इच्छा असून, त्यांच्या मूळ गावी जाता आलेले नाही. कोरोनामुळे घराची चिंता लागून राहिलेल्या नागरिकांनी स्थलांतरित करण्याची मागणी सुरू आहे. लॉकडाउन काळात नाशिकमार्गे निघालेल्या राज्यातील आणि उत्तर भारतातील स्थानिक मजूर आणि स्थलांतरितांना नाशिक जिल्ह्यात निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. एकूण २७ केंद्रात १ हजार ९०१ मजूर आणि कामगारांना निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. त्यातील भोपाळ येते ३३२ आणि लखनऊ येथील ८४७ कामगारांना विशेष रेल्वेद्वारे पाठविण्यात आले आहे.आता अशाच प्रकारे शेकडो मजूर त्यांच्या मूळ गावी जाण्यास इच्छुक असून, त्यांनी शनिवारी (दि.२) जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. घराची ओढ लागलेल्या या मजुरांना आता मूळ ठिकाणी पाठविण्यासाठी शासनही राजी होत आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. तथापि, अशाप्रकारचे हजारो मजूर गावी गेल्यास मात्र, अनेक प्रकारचे उद्योग धंद्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.जाणकारांच्या म्हणण्यानुसार बांधकाम क्षेत्रात सुमारे ७० टक्के परप्रांतीय कामगार असून, ते परत गेल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. जी कामे पूर्णत्वास आली आहेत, तीदेखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी लॉकडाउन आणि संचारबंदी आता मजुरांची टंचाई जाणविण्याची शक्यता आहे.लॉकडाउनसारख्या अडचणींमुळे महारेराने मार्चपर्यंत पूर्ण होणे आवश्यक असलेल्या बांधकामांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. परंतु आताही अत्यावश्यक बांधकामांना विशेषत: अडकलेल्या मजुरांना दिलासा देण्यासाठी परवानगी दिली असली तरी बांधकाम साहित्याची दुकानेच खुली नाही. त्यामुळे बांधकामे पूर्ण होण्याविषयी शंका आहे.- अविनाश शिरोडे, विकासक, नाशिकपरप्रांतीय मजूर स्थलांतरित झाल्यास अनेक अडचणी उद््भवणार आहेत. विशेषत: आता लॉकडाउन शिथिल करून कामांना गती द्यायची असताना आता परप्रांतीय मजूर गेल्यास ते पावसाळ्यात येणार नाहीत त्यामुळे कामे सुरू होऊनदेखील ती रखडणार आहेत.- विलास बिरारी, माजी अध्यक्ष, बिल्डर असोसिएशन आॅफ इंडिया

टॅग्स :Nashikनाशिक