शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बोहल्यावर चढण्यापूर्वीच ‘त्याने’ मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:25 IST

मुलाच्या अंगाला हळद लागणार असल्याने कुटुंबात एकच उत्साह अन् आनंदाचे वातावरण, तर वधू कुटुंबाकडे विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. नियतीला मात्र हे मान्य नव्हते. ‘शुक्रवारी हळद आहे, त्यामुळे घराबाहेर पडू नको, असे आईने आपल्या मुलाला बजावलेही; तरीदेखील निखिल गुरुवारी सायंकाळी ‘लगेच येतो...’ असे सांगून घराबाहेर पडला तो कायमचा न येण्यासाठी...

नाशिक : मुलाच्या अंगाला हळद लागणार असल्याने कुटुंबात एकच उत्साह अन् आनंदाचे वातावरण, तर वधू कुटुंबाकडे विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. नियतीला मात्र हे मान्य नव्हते. ‘शुक्रवारी हळद आहे, त्यामुळे घराबाहेर पडू नको, असे आईने आपल्या मुलाला बजावलेही; तरीदेखील निखिल गुरुवारी सायंकाळी ‘लगेच येतो...’ असे सांगून घराबाहेर पडला तो कायमचा न येण्यासाठी...सातपूर औद्योगिक वसाहतीजवळील बळवंतनगरमधील एका सोसायटीच्या सदनिकेत निखीलने रात्रीच्या सुमारास गळफास घेत मृत्यूला कवटाळल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. पंचवटीतील हिरावाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्य देशमुख यांचा एकुलता एक मुलगा निखील प्रकाश देशमुख (३०) हा व्यवसाय करत होता.कारखान्यापासून जवळच कुटुंबीयांनी त्यास सदनिका घेऊन दिली होती. त्याचा विवाह शहरातील एका प्रतिष्ठित अशा कुटुंबातील कन्येशी होणार होता. निखील गुरुवारी सायंकाळी ७ वाजता घराबाहेर पडला. रात्री १० वाजेपर्यंत त्याचा भ्रमणध्वनी सुरू होता; मात्र त्यानंतर भ्रमणध्वनी बंद झाल्याचे कुटुंबीयांनी संपर्क साधला असता भ्रमणध्वनी बंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी शोधाशोध सुरू केली असता त्यांना निखीलचा मृत्यू झाल्याचे समजले अन् आनंदोत्सव शोकसागरात बुडाला.शुक्रवारी हळद आटोपून शनिवारी मंगलाष्टके होणार होती. कटुंबीयांनी विवाहाची जय्यत तयारी केली. कुटुंबातील आबालवृद्ध आनंदोत्सव साजर करत होते. नववधू-वरावर अक्षता टाकत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभाशीर्वाद देण्याचा मुहूर्त येण्याअगोदरच निखीलने आपले आयुष्य संपविल्याने दोन्ही कुटुंबांवर आभाळ फाटले. निखीलच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, असा परिवार आहे. गंगापूर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.शोकाकू ल वातावरणात अंत्यसंस्कारऐन हळदीच्या दिवशी शुक्रवारी (दि.१९) निखीलच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वधू-वरपित्याचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.निखीलच्या मातोश्री व बहिणींच्या अश्रूंचा बांध फुटला होता. निखीलच्या अशा मंगलमयी क्षणाच्या तोंडावर अचानक झालेल्या मृत्यूने देशमुख कुटुंबाला मोठा धक्का बसला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबीय हादरले असून, त्या दु:खातून ते अद्यापही सावरलेले नाहीत.‘मी आयुष्यात काही करू शकलो नाही...’निखीलने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. तत्पूर्वी त्याने ‘मी आयुष्यात काही करू शकलो नाही म्हणून जीवन संपवित आहे’ असा मजकूर असलेली चिठ्ठी लिहून ठेवल्याचे पोलिसांना आढळले.

टॅग्स :Nashikनाशिक