शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बोहल्यावर चढण्यापूर्वीच ‘त्याने’ मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:25 IST

मुलाच्या अंगाला हळद लागणार असल्याने कुटुंबात एकच उत्साह अन् आनंदाचे वातावरण, तर वधू कुटुंबाकडे विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. नियतीला मात्र हे मान्य नव्हते. ‘शुक्रवारी हळद आहे, त्यामुळे घराबाहेर पडू नको, असे आईने आपल्या मुलाला बजावलेही; तरीदेखील निखिल गुरुवारी सायंकाळी ‘लगेच येतो...’ असे सांगून घराबाहेर पडला तो कायमचा न येण्यासाठी...

नाशिक : मुलाच्या अंगाला हळद लागणार असल्याने कुटुंबात एकच उत्साह अन् आनंदाचे वातावरण, तर वधू कुटुंबाकडे विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. नियतीला मात्र हे मान्य नव्हते. ‘शुक्रवारी हळद आहे, त्यामुळे घराबाहेर पडू नको, असे आईने आपल्या मुलाला बजावलेही; तरीदेखील निखिल गुरुवारी सायंकाळी ‘लगेच येतो...’ असे सांगून घराबाहेर पडला तो कायमचा न येण्यासाठी...सातपूर औद्योगिक वसाहतीजवळील बळवंतनगरमधील एका सोसायटीच्या सदनिकेत निखीलने रात्रीच्या सुमारास गळफास घेत मृत्यूला कवटाळल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. पंचवटीतील हिरावाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्य देशमुख यांचा एकुलता एक मुलगा निखील प्रकाश देशमुख (३०) हा व्यवसाय करत होता.कारखान्यापासून जवळच कुटुंबीयांनी त्यास सदनिका घेऊन दिली होती. त्याचा विवाह शहरातील एका प्रतिष्ठित अशा कुटुंबातील कन्येशी होणार होता. निखील गुरुवारी सायंकाळी ७ वाजता घराबाहेर पडला. रात्री १० वाजेपर्यंत त्याचा भ्रमणध्वनी सुरू होता; मात्र त्यानंतर भ्रमणध्वनी बंद झाल्याचे कुटुंबीयांनी संपर्क साधला असता भ्रमणध्वनी बंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी शोधाशोध सुरू केली असता त्यांना निखीलचा मृत्यू झाल्याचे समजले अन् आनंदोत्सव शोकसागरात बुडाला.शुक्रवारी हळद आटोपून शनिवारी मंगलाष्टके होणार होती. कटुंबीयांनी विवाहाची जय्यत तयारी केली. कुटुंबातील आबालवृद्ध आनंदोत्सव साजर करत होते. नववधू-वरावर अक्षता टाकत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभाशीर्वाद देण्याचा मुहूर्त येण्याअगोदरच निखीलने आपले आयुष्य संपविल्याने दोन्ही कुटुंबांवर आभाळ फाटले. निखीलच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, असा परिवार आहे. गंगापूर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.शोकाकू ल वातावरणात अंत्यसंस्कारऐन हळदीच्या दिवशी शुक्रवारी (दि.१९) निखीलच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वधू-वरपित्याचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.निखीलच्या मातोश्री व बहिणींच्या अश्रूंचा बांध फुटला होता. निखीलच्या अशा मंगलमयी क्षणाच्या तोंडावर अचानक झालेल्या मृत्यूने देशमुख कुटुंबाला मोठा धक्का बसला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबीय हादरले असून, त्या दु:खातून ते अद्यापही सावरलेले नाहीत.‘मी आयुष्यात काही करू शकलो नाही...’निखीलने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. तत्पूर्वी त्याने ‘मी आयुष्यात काही करू शकलो नाही म्हणून जीवन संपवित आहे’ असा मजकूर असलेली चिठ्ठी लिहून ठेवल्याचे पोलिसांना आढळले.

टॅग्स :Nashikनाशिक