शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

नाशिकमध्ये येऊनही फडणवीस यांची संमेलनाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 01:49 IST

अखिल भारतीय साहित्य संमेलनस्थळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले. त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी, असा सवाल विचारून जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल तर तेथे जाऊन तरी काय करायचे, असे म्हणत साहित्य संमेलनाला न जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ठळक मुद्देवाद: सावरकर यांचे नाव टाळल्याचे दिले कारण

नाशिक : अखिल भारतीय साहित्य संमेलनस्थळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले. त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी, असा सवाल विचारून जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल तर तेथे जाऊन तरी काय करायचे, असे म्हणत साहित्य संमेलनाला न जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. ४) नाशिक दौऱ्यावर येत असून, ते साहित्य संमेलनास उपस्थित राहतील किंवा नाही याविषयी उत्सुकता व्यक्त केली जात आहे. स्वत: स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी फडणवीस यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिल्याचे घोषित केले आहे. तरीदेखील ग्रंथ दिंडीत भाजपचे महापौर सतीश कुलकर्णी वगळता भाजपच्या लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे नाशिक दौऱ्यावर येणारे फडणवीस तरी भेट देतात काय, याकडे साहित्यप्रेमींचे लक्ष लागून असताना फडणवीस यांनी सोशल माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी?

नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमीसुद्धा असून, अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव आहेत. मात्र, या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, त्याचे आपण स्वागतच करीत असल्याचे सांगून फडणवीस यांनी म्हटले आहे की, पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनीयांची उंची आपण कमी करीत नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच; परंतु जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? असे सांगून नाशिक दौऱ्यावर आलेेले फडणवीस यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरविली आहे.

टॅग्स :NashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस