शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांचे होणार मूल्यमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:58 IST

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर अथवा वयाच्या ५० व ५५ वर्षांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याच्या शासनाच्या आदेशावरून जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांचे मूल्यांकन व पुनर्लोकन करण्यात येणार असून, त्याबाबतची माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा निर्णय : ग्रामपंचायत विभागापासून सुरुवात

नाशिक : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर अथवा वयाच्या ५० व ५५ वर्षांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याच्या शासनाच्या आदेशावरून जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांचे मूल्यांकन व पुनर्लोकन करण्यात येणार असून, त्याबाबतची माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची सुरुवात ग्रामपंचायत विभागातील कार्यरत सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाºयांपासून केली जाणार आहे. काम करण्यास सक्षम नसलेल्या व ग्रामपंचायतीच्या कामातही अकार्यक्षम असलेल्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येणार असेल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.शासनाने अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार ५० व ५५ वर्षांच्या कर्मचाºयांचे पुनर्विलोकन करण्यात येते. यामध्ये सदरचा कर्मचारी काम करण्यासाठी सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात येते. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र, कर्मचाºयाच्या कामाचे मूल्यमापन करण्यात येऊन निर्णय घेण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यातील ५० व ५५ वर्षांच्या सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत दप्तर, दलित वस्तीचे काम, जनसुविधेची काम, ग्रामपंचायत अफरातफर, विविध विकासकामाची सद्यस्थिती, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासनाने दिलेले शौचालय बांधकाम उद्दिष्ट, शौचालय फोटो अपलोडिंग, घरकुल योजना यांसह विविध बाबतीत ग्रामसेवकाच्या कामाचे मूल्यमापन करण्यात येणार असून, काम करण्यास अकार्यक्षम असल्याचे सिद्ध झाल्यास शासन निर्णयाप्रमाणे सेवेतून निलंबित करण्यापर्यंतची कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी मंगळवारी ग्रामपंचायत विभागास भेट देऊन प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित यंत्रणेला याबाबत माहिती तयार करण्याचे आदेश दिले.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सन २०१२च्या सर्वेक्षणात सुटलेल्या लाभार्थ्यांसाठी शासनाने शौचालय बांधकाम करण्यास व अनुदान देण्यास अनुमती दिली आहे. मात्र बागलाण, नांदगाव यांच्यासह अनेक तालुक्यांत कमी प्रमाणात शौचालय बांधकाम होत असल्याने सर्वांत कमी काम असलेल्या ग्रामसेवकांची तालुकानिहाय सुनावणी घेण्यात येत असून, त्यांना काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात येत आहे. मुदतीत काम पूर्ण न करणाºया ग्रामसेवकावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. नरेश गिते यांनी दिली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी