शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांचे होणार मूल्यमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:58 IST

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर अथवा वयाच्या ५० व ५५ वर्षांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याच्या शासनाच्या आदेशावरून जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांचे मूल्यांकन व पुनर्लोकन करण्यात येणार असून, त्याबाबतची माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा निर्णय : ग्रामपंचायत विभागापासून सुरुवात

नाशिक : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर अथवा वयाच्या ५० व ५५ वर्षांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याच्या शासनाच्या आदेशावरून जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांचे मूल्यांकन व पुनर्लोकन करण्यात येणार असून, त्याबाबतची माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची सुरुवात ग्रामपंचायत विभागातील कार्यरत सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाºयांपासून केली जाणार आहे. काम करण्यास सक्षम नसलेल्या व ग्रामपंचायतीच्या कामातही अकार्यक्षम असलेल्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येणार असेल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.शासनाने अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार ५० व ५५ वर्षांच्या कर्मचाºयांचे पुनर्विलोकन करण्यात येते. यामध्ये सदरचा कर्मचारी काम करण्यासाठी सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात येते. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र, कर्मचाºयाच्या कामाचे मूल्यमापन करण्यात येऊन निर्णय घेण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यातील ५० व ५५ वर्षांच्या सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत दप्तर, दलित वस्तीचे काम, जनसुविधेची काम, ग्रामपंचायत अफरातफर, विविध विकासकामाची सद्यस्थिती, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासनाने दिलेले शौचालय बांधकाम उद्दिष्ट, शौचालय फोटो अपलोडिंग, घरकुल योजना यांसह विविध बाबतीत ग्रामसेवकाच्या कामाचे मूल्यमापन करण्यात येणार असून, काम करण्यास अकार्यक्षम असल्याचे सिद्ध झाल्यास शासन निर्णयाप्रमाणे सेवेतून निलंबित करण्यापर्यंतची कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी मंगळवारी ग्रामपंचायत विभागास भेट देऊन प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित यंत्रणेला याबाबत माहिती तयार करण्याचे आदेश दिले.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सन २०१२च्या सर्वेक्षणात सुटलेल्या लाभार्थ्यांसाठी शासनाने शौचालय बांधकाम करण्यास व अनुदान देण्यास अनुमती दिली आहे. मात्र बागलाण, नांदगाव यांच्यासह अनेक तालुक्यांत कमी प्रमाणात शौचालय बांधकाम होत असल्याने सर्वांत कमी काम असलेल्या ग्रामसेवकांची तालुकानिहाय सुनावणी घेण्यात येत असून, त्यांना काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात येत आहे. मुदतीत काम पूर्ण न करणाºया ग्रामसेवकावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. नरेश गिते यांनी दिली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी