शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पर्यावरण संतुलनासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 01:10 IST

 जिल्ह्यात विकासाची कामे करताना पर्यावरणाचे आणि सांस्कृतिक पाऊलखुणांचे जतन व्हावे यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत.

ठळक मुद्देआदेश निर्गमित : पर्यावरण तसेच क्षेत्रनिहाय सदस्यांचा समावेश

नाशिक :  जिल्ह्यात विकासाची कामे करताना पर्यावरणाचे आणि सांस्कृतिक पाऊलखुणांचे जतन व्हावे यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत.     अनधिकृत उत्खननाबाबत नागरिक व पर्यावरण प्रेमींकडून तक्रारी प्राप्त होत असतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यावरण संतुलन व स्थायी विकास साधण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे जाहीर केले होते.  दोन आठवड्यांपूर्वी या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आल्यानंतर टास्क फोर्सला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. या कृती दलामध्ये शासकीय स्तरावर समन्वयक म्हणून अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, कार्यदलाचे सदस्य म्हणून उपवनरक्षक (पूर्व व पश्चिम), जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सहायक संचालक, नगररचना विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कार्यकारी अभियंता, मेरी, जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकारी, पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी, विधी अधिकारी, जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,   आदींचा समावेश करण्यात आला आहे. या टास्क फोर्समध्ये विकासकांचादेखील समावेश करण्यात आला असून, नरडोकेचे भाविक जे. ठक्कर, शंतनू देशपांडे, क्रेडाईचे रवी महाजन, किरण चव्हाण, गौरव ठक्कर  यांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे खाणपट्टेधारक अभिजित बनकर, सिरील रॉड्रिग्ज, सुदाम धात्रक, बाळासाहेब गांगुर्डे यांचा कृती दलात सदस्य म्हणून समावेश असणार आहे.तर निमंत्रक म्हणून  अश्विनी भट, राम खुर्दुळ, राजेश पंडित, देवचंद महाले, तन्मय टकले, दीपक जाधव  यांचा समावेश कृती दलात असणार आहे.      शासकीय परिपत्रकांन्वये निर्गमित केलेल्या या आदेशानुसार कृती दलात समावेश नसलेल्या परंतु पर्यावरणविषयक कामकाज करणाऱ्या व्यक्तींना त्रैमासिक बैठकीत समन्वयक यांच्या पूर्वपरवानगीने उपस्थित राहण्याची मुभा देण्यात येणार आहे.  गौण खनिजांबाबत वेळोवेळी आढावा घेण्यासाठी कृती दलाची बैठकही आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पर्यावरणाशी निगडित सूचना, मत, किंवा माहिती द्यावयाची असल्यास tfenvironmentnsk @gmail.com संपर्क साधता येणार असल्याचेही जिल्हाधिकारी  मांढरे यांनी   सांगितले.  टास्क फोर्सच्या धोरणातील प्रमुख मुद्दे...n जिल्ह्यातील गौण खनिजांच्या उत्खननाबाबत धोरण निश्चिती करण्यात येणार असून, त्यामध्ये जिल्ह्यातील डोंगररांगा, गड किल्ले, संरक्षित जंगल, आदी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणच्या परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन होऊ नये म्हणून उपायोजना केली जाणार आहे. n कायदेशीर तरतुदीनुसार ज्या ठिकाणी गौण खनिज उत्खनन अनुज्ञेय आहे अशा ठिकाणी उत्खननास मुभा देणे त्याचबरोबर पर्यावरण व विकासकामे यातील समतोल राखण्याच्या दृष्टीने व उत्खननाच्या तक्रारीसंदर्भात सारासार विचार करून निर्णय घेण्यात येणार आहेत.n कृती दलास योग्य वाटतील अशा बाबींवर चर्चा विनिमय करून निर्णय घेण्याची मुभा कार्यदलास असणार असून, जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांची यादी करून अशा स्थळांचे संवर्धन होईल यादृष्टीने प्रयत्न करणे, तसेच ऐतिहासिक स्थळे गड किल्ले, तसेच आदिवासी कला व संस्कृती ठिकाणांचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणार.n पर्यावरणपूरक गोष्टींचा विकासकामांसाठी वापर करण्यास प्रोत्साहन देणे.n वेळोवेळी पर्यावरणविषयक अभ्यासक व्यक्तींना आवश्यकतेनुसार बैठकीस निमंत्रित करण्यात येणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार