शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

प्रस्थापिताना हादरा

By admin | Updated: February 4, 2017 00:57 IST

सायगाव : तिकिटासाठी इच्छुकांची धावपळ

 दत्ता महाले येवलायंदा सायगाव गण सर्वसाधारण झाला आहे. दहा वर्षांपूर्वी या गणाचा अंदरसूल गटामध्ये समावेश होता, मात्र नव्याने निर्माण झालेल्या राजापूर गटामुळे तालुक्यातील सर्वच गट व गणाची गावे बदलली गेल्याने प्रस्थापितांना हादरा बसला असून, बहुसंख्य मतदार सायगाव येथे असतानादेखील सायगाव गावाचा यापूर्वी स्वतंत्र गणाची निर्मिती झाल्यापासून सायगाव शिवाय अन्य कोणताही गावाचा उमेदवार या गणात निवडून न आल्याचा इतिहास आहे.सायगाव गण हा राजापूर गटात गेल्याने धामणगाव, नागडे, मातुलठाण ही गावे सायगाव गणातून तुटल्याने सायगाव गणाचा या तीन गावांशी नेहमीचा दैनंदिन संबंध संपुष्टात आल्याने गणाच्या निवडणुकीचे चित्र बदलले आहे. कारण यापूर्वी राजकीय नेते मंडळींनी गणातील गावांमध्ये सोयरे संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळे राजकारण करणे सोपे होते. आता मात्र अनेकांना गण विभाजनाचा फटका बसला आहे. त्यामुळे सायगावची मतदारसंख्या इतर गावांच्या तुलनेत सर्वाधिक असतानादेखील पूर्वभागातील चार ते पाच गावे एकत्र आली तर निवडणुकीचे चित्र बदलू शकणार आहे. याचे उदाहरण म्हणजे यापूर्वीच्या पंचवार्षिक निवडणुकीत या गणातील सर्वात छोट्या गावातील राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे. तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात असलेल्या सायगाव गणात बऱ्याच प्रमाणात ओसाड भाग असल्याने या परिसरात हरीण, तरस यांसह विविध जंगली जनावरांचा वावर आहे. बऱ्याच वर्षांपासून दुष्काळी गाव म्हणून या गावची ओळख आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी या गावात मुंबई येथील हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी आकाशात शुगर रॉकेट सोडून पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न केले होते हे सर्वज्ञात आहे.सायगाव गणात १४ गावांचा समावेश असून, गणाची एकूण मतदारसंख्या २२ हजार ९०० इतकी आहे. या गणात सायगाव, गवंडगाव, वाघाळे, डोंगरगाव, पिंपळखुटे खु., तळवाडे, कौठखेडे, आड सुरेगाव, पिंपळ खुटे बु।।, भुलेगाव, अंगुलगाव, गारखेडे, पांजरवाडी, देवठाण ही गावे आहेत. सर्वाधिक मतदारसंख्या सायगावतच आहे. सायगाव गण हा पूर्वाश्रमीचा कॉँग्रेसचा, तर आमदार छगन भुजबळ यांच्या कारकिर्दीत राष्ट्रवादीच्या प्राबल्याखाली आहे. या गणातून सायगाव येथील कै. दगू खैरनार, वामनराव खैरनार यांना पंचायत समिती सदस्य व सभापतिपदाच्या वारंवार संधी मिळाल्या आहेत. सायगाव गावातील अनेक दिग्गज नेते एकत्र आल्याने इतिहास घडण्याची स्थिती आहे असे बोलले जाते. यापूर्वी अंदरसूल गणातील देवळाणे येथील रामदास काळे यांना गावातील मतदारांनी निवडून दिले आहे. १५ वर्षांपूर्वी कॉँग्रेस पक्षाने गावात उमेदवारी न दिल्याने स्थानिक लोकांनी पुन्हा सेना-भाजपा युतीच्या उमेदवाराला उभे करून अनुसूचित जाती-जमाती जागेवर निवडून दिले होते. त्यानंतर पुन्हा आरक्षणात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता.सायगाव गणात वेळोवेळी निवडून आलेल्या सदस्यांनी यापूर्वी या गणासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठा हातभार लावला असून, गणातील बऱ्याचशा गावांमध्ये ३८ गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जात असून, महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. सायगाव गावात श्रेणी २ या दर्जाचा पशुसंवर्धन दवाखाना मंजूर असून, सध्या कार्यरत आहे. रुग्णांच्या सेवेसाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे.