शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

वाहतूक सुविधांवर भर आवश्यक अभिषेक कृष्ण : शहरात विकासाला मोठा वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:35 IST

नाशिक : मुंबई-पुणेनंतर नाशिकचा क्रमांक लागू शकेल. वाहतुकीसंबंधी सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचे मत मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देहरित लवादापुढे सक्षमपणे बाजूबांधकाम परवानग्यांचा प्रश्न निकाली

नाशिक : नाशिक शहरात विकासाला मोठा वाव असून, पायाभूत सुविधा वाढविल्या तर मुंबई-पुणेनंतर नाशिकचा क्रमांक लागू शकेल. शहरात वाहतुकीसंबंधी सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचे मत महापालिकेचे मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. शुक्रवारी (दि.९) सकाळी ११ वाजता ते आपला पदभार नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना अभिषेक कृष्ण यांनी आपल्या १९ महिन्यांच्या कारकिर्दीबद्दल समाधान व्यक्त केले. कृष्ण यांनी सांगितले, जुलै २०१६ मध्ये महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम राष्टÑीय हरित लवादापुढे सक्षमपणे बाजू मांडल्याने शहरातील रखडलेल्या बांधकाम परवानग्यांचा प्रश्न निकाली निघाला. याशिवाय खतप्रकल्प, घंटागाडी हे प्रलंबित विषयही मार्गी लागले. वृक्षगणनेचे काम मार्गी लागल्याने महापालिकेला आता आपली बाजू न्यायालयापुढे मांडता येणार आहे, परिणामी न्यायालयाने टाकलेल्या निर्बंधात शिथिलता मिळू शकते. मालमत्ता सर्वेक्षणामुळे नवीन ६७ हजार मिळकती सापडून उत्पन्नात भर पडणार आहे. अमृत योजनेंतर्गत गंगापूर आणि पिंपळगाव खांब एसटीपीचा प्रश्न मार्गी लागला आहे तसेच तवली फाटा व जेलरोड, दसक येथील उद्यानाचे काम झाले आहे. मुकणे पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत प्रोजेक्ट गोदा, स्मार्ट रोड, वॉटर आॅडिटच्या माध्यमातून स्काडा मीटर सिस्टम आदी प्रकल्पही होणार आहेत. महापालिकेत नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित झाले आहेत. नगररचना विभागात आॅटो डीसीआर प्रणाली कार्यान्वित होऊ शकली. गोदावरी संवर्धन कक्ष स्थापन करत गोदाघाटावरील स्वच्छतेबाबत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. नाशिक शहरात विकासाच्या भरपूर संधी आहेत. शहरात वाहतूक सुविधांवर अधिक काम करणे आवश्यक आहे. ट्रॅफिक सिग्नल व पार्किंगचा प्रश्न निकाली काढणे महत्त्वाचे असल्याचेही कृष्ण यांनी सांगितले. शहर बससेवा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळाली नसल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.