शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
7
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
8
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
9
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
10
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
11
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
12
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
13
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
15
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
16
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
17
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
18
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
19
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
20
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक सुविधांवर भर आवश्यक अभिषेक कृष्ण : शहरात विकासाला मोठा वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:35 IST

नाशिक : मुंबई-पुणेनंतर नाशिकचा क्रमांक लागू शकेल. वाहतुकीसंबंधी सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचे मत मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देहरित लवादापुढे सक्षमपणे बाजूबांधकाम परवानग्यांचा प्रश्न निकाली

नाशिक : नाशिक शहरात विकासाला मोठा वाव असून, पायाभूत सुविधा वाढविल्या तर मुंबई-पुणेनंतर नाशिकचा क्रमांक लागू शकेल. शहरात वाहतुकीसंबंधी सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचे मत महापालिकेचे मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. शुक्रवारी (दि.९) सकाळी ११ वाजता ते आपला पदभार नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना अभिषेक कृष्ण यांनी आपल्या १९ महिन्यांच्या कारकिर्दीबद्दल समाधान व्यक्त केले. कृष्ण यांनी सांगितले, जुलै २०१६ मध्ये महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम राष्टÑीय हरित लवादापुढे सक्षमपणे बाजू मांडल्याने शहरातील रखडलेल्या बांधकाम परवानग्यांचा प्रश्न निकाली निघाला. याशिवाय खतप्रकल्प, घंटागाडी हे प्रलंबित विषयही मार्गी लागले. वृक्षगणनेचे काम मार्गी लागल्याने महापालिकेला आता आपली बाजू न्यायालयापुढे मांडता येणार आहे, परिणामी न्यायालयाने टाकलेल्या निर्बंधात शिथिलता मिळू शकते. मालमत्ता सर्वेक्षणामुळे नवीन ६७ हजार मिळकती सापडून उत्पन्नात भर पडणार आहे. अमृत योजनेंतर्गत गंगापूर आणि पिंपळगाव खांब एसटीपीचा प्रश्न मार्गी लागला आहे तसेच तवली फाटा व जेलरोड, दसक येथील उद्यानाचे काम झाले आहे. मुकणे पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत प्रोजेक्ट गोदा, स्मार्ट रोड, वॉटर आॅडिटच्या माध्यमातून स्काडा मीटर सिस्टम आदी प्रकल्पही होणार आहेत. महापालिकेत नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित झाले आहेत. नगररचना विभागात आॅटो डीसीआर प्रणाली कार्यान्वित होऊ शकली. गोदावरी संवर्धन कक्ष स्थापन करत गोदाघाटावरील स्वच्छतेबाबत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. नाशिक शहरात विकासाच्या भरपूर संधी आहेत. शहरात वाहतूक सुविधांवर अधिक काम करणे आवश्यक आहे. ट्रॅफिक सिग्नल व पार्किंगचा प्रश्न निकाली काढणे महत्त्वाचे असल्याचेही कृष्ण यांनी सांगितले. शहर बससेवा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळाली नसल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.