शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वाहतूक सुविधांवर भर आवश्यक अभिषेक कृष्ण : शहरात विकासाला मोठा वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:35 IST

नाशिक : मुंबई-पुणेनंतर नाशिकचा क्रमांक लागू शकेल. वाहतुकीसंबंधी सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचे मत मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देहरित लवादापुढे सक्षमपणे बाजूबांधकाम परवानग्यांचा प्रश्न निकाली

नाशिक : नाशिक शहरात विकासाला मोठा वाव असून, पायाभूत सुविधा वाढविल्या तर मुंबई-पुणेनंतर नाशिकचा क्रमांक लागू शकेल. शहरात वाहतुकीसंबंधी सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचे मत महापालिकेचे मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. शुक्रवारी (दि.९) सकाळी ११ वाजता ते आपला पदभार नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना अभिषेक कृष्ण यांनी आपल्या १९ महिन्यांच्या कारकिर्दीबद्दल समाधान व्यक्त केले. कृष्ण यांनी सांगितले, जुलै २०१६ मध्ये महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम राष्टÑीय हरित लवादापुढे सक्षमपणे बाजू मांडल्याने शहरातील रखडलेल्या बांधकाम परवानग्यांचा प्रश्न निकाली निघाला. याशिवाय खतप्रकल्प, घंटागाडी हे प्रलंबित विषयही मार्गी लागले. वृक्षगणनेचे काम मार्गी लागल्याने महापालिकेला आता आपली बाजू न्यायालयापुढे मांडता येणार आहे, परिणामी न्यायालयाने टाकलेल्या निर्बंधात शिथिलता मिळू शकते. मालमत्ता सर्वेक्षणामुळे नवीन ६७ हजार मिळकती सापडून उत्पन्नात भर पडणार आहे. अमृत योजनेंतर्गत गंगापूर आणि पिंपळगाव खांब एसटीपीचा प्रश्न मार्गी लागला आहे तसेच तवली फाटा व जेलरोड, दसक येथील उद्यानाचे काम झाले आहे. मुकणे पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत प्रोजेक्ट गोदा, स्मार्ट रोड, वॉटर आॅडिटच्या माध्यमातून स्काडा मीटर सिस्टम आदी प्रकल्पही होणार आहेत. महापालिकेत नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित झाले आहेत. नगररचना विभागात आॅटो डीसीआर प्रणाली कार्यान्वित होऊ शकली. गोदावरी संवर्धन कक्ष स्थापन करत गोदाघाटावरील स्वच्छतेबाबत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. नाशिक शहरात विकासाच्या भरपूर संधी आहेत. शहरात वाहतूक सुविधांवर अधिक काम करणे आवश्यक आहे. ट्रॅफिक सिग्नल व पार्किंगचा प्रश्न निकाली काढणे महत्त्वाचे असल्याचेही कृष्ण यांनी सांगितले. शहर बससेवा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळाली नसल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.