शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

समीकरणे बदलणार : श्रमजीवी संघटना उतरणार रणांगणात त्र्यंबकला वाढला निवडणुकीचा फीव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:12 IST

पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली असून, शहरात निवडणुकीचा फीव्हर चांगलाच वाढू लागला आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेमधून१७ प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत बहुतेक इच्छुकांनी भाजपाकडे उमेदवारी

त्र्यंबकेश्वर : पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली असून, शहरात निवडणुकीचा फीव्हर चांगलाच वाढू लागला आहे. सध्या पालिकेवर भाजपाचे वर्चस्व असून, आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रमजीवी संघटना पहिल्यांदाच रणांगणात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.त्र्यंबक निवडणुकीसाठी आचारसंहिता तीन दिवसांपूर्वीच लागली आहे. पुढील महिन्यात १० डिसेंबरला मतदान होत आहे. विशेष म्हणजे यावेळच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेमधून केली जाणार आहे. याचवेळी प्रभागांचे आरक्षण चक्रांकित पद्धतीने करण्यात आले आहे. त्यामुळे आपला मोहल्ला सोडून उमेदवारी करणाºयांची नावे दुसºयाच प्रभागात आरक्षण सोडतपद्धतीने पडली आहेत. त्र्यंबक नगर परिषदेसाठी एकूण १७ प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. या पंचवार्षिकपासून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून जाणार आहे. नगराध्यक्षांबरोबरच या वर्षापासून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे सरपंचपददेखील जनतेतूनच निवडून दिले आहेत. वास्तविक थेट नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा हा मान अण्णासाहेब लोणारी यांना मिळाला होता. त्यानंतर सन २००२ मध्ये थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महिला नगराध्यक्ष पुष्पा मोहन झोले यांना संधी मिळाली होती. आता यावेळेस तिसºयांदा थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यामुळे या पदासाठी चुरस वाढणार आहे. त्यासाठी तुल्यबळ उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. या पदासाठी बहुतेक इच्छुकांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. सुनील अडसरे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मागील महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यात कैलास घुले, सुनील अडसरे, पुरुषोत्तम लोहगावकर, अ‍ॅड. पराग दीक्षित व सुचेता शिखरे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. पुरुषोत्तम लोहगावकर व अ‍ॅड. पराग दीक्षित वगळता कैलास घुले, सुनील अडसरे व सुचिता शिखरे यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषविलेले आहे. याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचेदेखील उमेदवार इतर उमेदवारांसमोर आव्हान उभे करू शकतात. त्यामुळे पालिका निवडणुकीत कोणाच्या हाती निरंकुश पाच वर्षे सूत्रे राहणार हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांची धावपळ, मुंबई वाºया, तर कोणी जसे जमेल तसे वरून दबावतंत्राचा वापर करून पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.