शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

समीकरणे बदलणार : श्रमजीवी संघटना उतरणार रणांगणात त्र्यंबकला वाढला निवडणुकीचा फीव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:12 IST

पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली असून, शहरात निवडणुकीचा फीव्हर चांगलाच वाढू लागला आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेमधून१७ प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत बहुतेक इच्छुकांनी भाजपाकडे उमेदवारी

त्र्यंबकेश्वर : पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली असून, शहरात निवडणुकीचा फीव्हर चांगलाच वाढू लागला आहे. सध्या पालिकेवर भाजपाचे वर्चस्व असून, आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रमजीवी संघटना पहिल्यांदाच रणांगणात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.त्र्यंबक निवडणुकीसाठी आचारसंहिता तीन दिवसांपूर्वीच लागली आहे. पुढील महिन्यात १० डिसेंबरला मतदान होत आहे. विशेष म्हणजे यावेळच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेमधून केली जाणार आहे. याचवेळी प्रभागांचे आरक्षण चक्रांकित पद्धतीने करण्यात आले आहे. त्यामुळे आपला मोहल्ला सोडून उमेदवारी करणाºयांची नावे दुसºयाच प्रभागात आरक्षण सोडतपद्धतीने पडली आहेत. त्र्यंबक नगर परिषदेसाठी एकूण १७ प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. या पंचवार्षिकपासून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून जाणार आहे. नगराध्यक्षांबरोबरच या वर्षापासून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे सरपंचपददेखील जनतेतूनच निवडून दिले आहेत. वास्तविक थेट नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा हा मान अण्णासाहेब लोणारी यांना मिळाला होता. त्यानंतर सन २००२ मध्ये थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महिला नगराध्यक्ष पुष्पा मोहन झोले यांना संधी मिळाली होती. आता यावेळेस तिसºयांदा थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यामुळे या पदासाठी चुरस वाढणार आहे. त्यासाठी तुल्यबळ उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. या पदासाठी बहुतेक इच्छुकांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. सुनील अडसरे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मागील महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यात कैलास घुले, सुनील अडसरे, पुरुषोत्तम लोहगावकर, अ‍ॅड. पराग दीक्षित व सुचेता शिखरे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. पुरुषोत्तम लोहगावकर व अ‍ॅड. पराग दीक्षित वगळता कैलास घुले, सुनील अडसरे व सुचिता शिखरे यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषविलेले आहे. याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचेदेखील उमेदवार इतर उमेदवारांसमोर आव्हान उभे करू शकतात. त्यामुळे पालिका निवडणुकीत कोणाच्या हाती निरंकुश पाच वर्षे सूत्रे राहणार हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांची धावपळ, मुंबई वाºया, तर कोणी जसे जमेल तसे वरून दबावतंत्राचा वापर करून पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.