शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

समीकरणे बदलणार : श्रमजीवी संघटना उतरणार रणांगणात त्र्यंबकला वाढला निवडणुकीचा फीव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:12 IST

पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली असून, शहरात निवडणुकीचा फीव्हर चांगलाच वाढू लागला आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेमधून१७ प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत बहुतेक इच्छुकांनी भाजपाकडे उमेदवारी

त्र्यंबकेश्वर : पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली असून, शहरात निवडणुकीचा फीव्हर चांगलाच वाढू लागला आहे. सध्या पालिकेवर भाजपाचे वर्चस्व असून, आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रमजीवी संघटना पहिल्यांदाच रणांगणात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.त्र्यंबक निवडणुकीसाठी आचारसंहिता तीन दिवसांपूर्वीच लागली आहे. पुढील महिन्यात १० डिसेंबरला मतदान होत आहे. विशेष म्हणजे यावेळच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेमधून केली जाणार आहे. याचवेळी प्रभागांचे आरक्षण चक्रांकित पद्धतीने करण्यात आले आहे. त्यामुळे आपला मोहल्ला सोडून उमेदवारी करणाºयांची नावे दुसºयाच प्रभागात आरक्षण सोडतपद्धतीने पडली आहेत. त्र्यंबक नगर परिषदेसाठी एकूण १७ प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. या पंचवार्षिकपासून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून जाणार आहे. नगराध्यक्षांबरोबरच या वर्षापासून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे सरपंचपददेखील जनतेतूनच निवडून दिले आहेत. वास्तविक थेट नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा हा मान अण्णासाहेब लोणारी यांना मिळाला होता. त्यानंतर सन २००२ मध्ये थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महिला नगराध्यक्ष पुष्पा मोहन झोले यांना संधी मिळाली होती. आता यावेळेस तिसºयांदा थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यामुळे या पदासाठी चुरस वाढणार आहे. त्यासाठी तुल्यबळ उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. या पदासाठी बहुतेक इच्छुकांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. सुनील अडसरे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मागील महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यात कैलास घुले, सुनील अडसरे, पुरुषोत्तम लोहगावकर, अ‍ॅड. पराग दीक्षित व सुचेता शिखरे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. पुरुषोत्तम लोहगावकर व अ‍ॅड. पराग दीक्षित वगळता कैलास घुले, सुनील अडसरे व सुचिता शिखरे यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषविलेले आहे. याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचेदेखील उमेदवार इतर उमेदवारांसमोर आव्हान उभे करू शकतात. त्यामुळे पालिका निवडणुकीत कोणाच्या हाती निरंकुश पाच वर्षे सूत्रे राहणार हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांची धावपळ, मुंबई वाºया, तर कोणी जसे जमेल तसे वरून दबावतंत्राचा वापर करून पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.