शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

महिला मजुरांची चक्क कारमधून एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 21:56 IST

चांदोरी : काळाचा महिमा काही औरच असतो. कामावर जाणाऱ्या महिला मजुरांना रस्त्याने कार दिसली की, आपल्याला यामध्ये कधी बसायला मिळेल याबाबत ते नेहमी स्वप्न पाहत असतात, मात्र एसटी संपामुळे का होईना पण कारमधून जाण्याचे स्वप्न अखेर काही दिवसांकरिता पूर्ण होत असून, शेती काम करण्यास जाताना व येताना वाहनाची कोणतीही सोय नसल्याने अखेर मालकाच्या कारमधून जाण्याचे भाग्य या शेतमजुरांना लाभत आहे.

ठळक मुद्देदिवसभर राबणाऱ्या मजुरांचे एसटी संपामुळे बदलले नशीब

चांदोरी : काळाचा महिमा काही औरच असतो. कामावर जाणाऱ्या महिला मजुरांना रस्त्याने कार दिसली की, आपल्याला यामध्ये कधी बसायला मिळेल याबाबत ते नेहमी स्वप्न पाहत असतात, मात्र एसटी संपामुळे का होईना पण कारमधून जाण्याचे स्वप्न अखेर काही दिवसांकरिता पूर्ण होत असून, शेती काम करण्यास जाताना व येताना वाहनाची कोणतीही सोय नसल्याने अखेर मालकाच्या कारमधून जाण्याचे भाग्य या शेतमजुरांना लाभत आहे.मारुती कारमधून शेतमालक कांदे लावण्यासाठी, सोयाबीन सोंगणी आदी कामासाठी मजूर शेतात नेतो व संध्याकाळी आणून सोडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे दिवसभर शेतात राबराब राबणाऱ्या मजुरांच्या नशिबी ही आता कारचा प्रवास आला आहे.शेतीची काम करायला मजूर मिळत नाही, मिळालेच तर त्यांच्या सर्व अटी व शर्ती शेतमालकाला कबूल कराव्या लागतात. शेतात दिवसभर कांदे लावण्यासाठी त्यांना वाफ्यात रोप खांडून द्यावे लागते, तर सोयाबीन फक्त सोंगून देणार गंज शेतकऱ्याला करावा लागतो, त्यांना जाताना चुलीसाठी लाकडे द्यावी लागतात.आणखी शेतापर्यंत जाण्यायेण्यासाठी वाहनाची व्यवस्था शेत मालकालाच करावी लागते. मजुरी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशी शेती व्यवसायात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच बाजूने मेटाकुटीस आलेला शेतकरी अशाही परिस्थितीत सर्वांच्याच मर्जीने वागतो आहे. ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे.शेतमालाचा भाव कमी तर उत्पादन खर्च वाढत असल्याने, शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय सातत्याने तोट्यात आहे. यंदा अवकाळी व परतीच्या पावसाने सोयाबीन व द्राक्ष पिकाचे नुकसान झाले आहे. आता अनेकांनी सोयाबीन काढून गहू, हरभरा पिकासाठी मशागत व पेरणी सुरू केली आहे.शेतीचा व्यवसाय मजुरांमुळे परावलंबी होत चालला आहे. मजूरही शेतमालकांच्या अडचणीचा फायदा घेऊन अटी-शर्ती घालून कामाला येत आहे. शेतमालकाला नाईलाजाने मजुरांच्या सर्व अटी मान्य कराव्या लागत आहे. शेतात जाण्या-येण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली तरच मजूर कामाला येते. त्याचबरोबर सर्व शेतीचे वाही पेरणीचे सामान मालकाने शेतात न्यायचे, रोजंदारी मजूर किंवा महिला मजूर फक्त वेळेवर कामाला लागणे व काम संपल्यावर घरी येणे एवढेच काम करते. राहिलेली सर्व कामे नंतर शेतमालकास पूर्ण करावी लागतात. अशी विचित्र अवस्था निर्माण झाली आहे.कांदे लागवड, द्राक्ष बागेतील कामे व इतरही कामाला मजुरांना वाहनातून न्यावे लागते. मजूर पायदळ यायला तयार नाही. अनेक शेतकरी भाड्याच्या वाहनातून तर काही शेतकरी स्वतःच्या कारने मजुरांना शेतात ने-आण करत आहेत. निंदणी, खुरपणी, खत देणे हे सर्व मजूर करतात,शेतीच्या या सर्व कामाचा खर्च काढला तर शेतकऱ्याच्या हाती फार काही उरत नाही. मात्र शेतकऱ्यांपेक्षा मजूर खाऊन-पिऊन सुखी आहे.- प्रणव शंखपाळ, शेतकरी, कारसुळ.

टॅग्स :talukaतालुकाagricultureशेती