शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

महिला मजुरांची चक्क कारमधून एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 21:56 IST

चांदोरी : काळाचा महिमा काही औरच असतो. कामावर जाणाऱ्या महिला मजुरांना रस्त्याने कार दिसली की, आपल्याला यामध्ये कधी बसायला मिळेल याबाबत ते नेहमी स्वप्न पाहत असतात, मात्र एसटी संपामुळे का होईना पण कारमधून जाण्याचे स्वप्न अखेर काही दिवसांकरिता पूर्ण होत असून, शेती काम करण्यास जाताना व येताना वाहनाची कोणतीही सोय नसल्याने अखेर मालकाच्या कारमधून जाण्याचे भाग्य या शेतमजुरांना लाभत आहे.

ठळक मुद्देदिवसभर राबणाऱ्या मजुरांचे एसटी संपामुळे बदलले नशीब

चांदोरी : काळाचा महिमा काही औरच असतो. कामावर जाणाऱ्या महिला मजुरांना रस्त्याने कार दिसली की, आपल्याला यामध्ये कधी बसायला मिळेल याबाबत ते नेहमी स्वप्न पाहत असतात, मात्र एसटी संपामुळे का होईना पण कारमधून जाण्याचे स्वप्न अखेर काही दिवसांकरिता पूर्ण होत असून, शेती काम करण्यास जाताना व येताना वाहनाची कोणतीही सोय नसल्याने अखेर मालकाच्या कारमधून जाण्याचे भाग्य या शेतमजुरांना लाभत आहे.मारुती कारमधून शेतमालक कांदे लावण्यासाठी, सोयाबीन सोंगणी आदी कामासाठी मजूर शेतात नेतो व संध्याकाळी आणून सोडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे दिवसभर शेतात राबराब राबणाऱ्या मजुरांच्या नशिबी ही आता कारचा प्रवास आला आहे.शेतीची काम करायला मजूर मिळत नाही, मिळालेच तर त्यांच्या सर्व अटी व शर्ती शेतमालकाला कबूल कराव्या लागतात. शेतात दिवसभर कांदे लावण्यासाठी त्यांना वाफ्यात रोप खांडून द्यावे लागते, तर सोयाबीन फक्त सोंगून देणार गंज शेतकऱ्याला करावा लागतो, त्यांना जाताना चुलीसाठी लाकडे द्यावी लागतात.आणखी शेतापर्यंत जाण्यायेण्यासाठी वाहनाची व्यवस्था शेत मालकालाच करावी लागते. मजुरी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशी शेती व्यवसायात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच बाजूने मेटाकुटीस आलेला शेतकरी अशाही परिस्थितीत सर्वांच्याच मर्जीने वागतो आहे. ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे.शेतमालाचा भाव कमी तर उत्पादन खर्च वाढत असल्याने, शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय सातत्याने तोट्यात आहे. यंदा अवकाळी व परतीच्या पावसाने सोयाबीन व द्राक्ष पिकाचे नुकसान झाले आहे. आता अनेकांनी सोयाबीन काढून गहू, हरभरा पिकासाठी मशागत व पेरणी सुरू केली आहे.शेतीचा व्यवसाय मजुरांमुळे परावलंबी होत चालला आहे. मजूरही शेतमालकांच्या अडचणीचा फायदा घेऊन अटी-शर्ती घालून कामाला येत आहे. शेतमालकाला नाईलाजाने मजुरांच्या सर्व अटी मान्य कराव्या लागत आहे. शेतात जाण्या-येण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली तरच मजूर कामाला येते. त्याचबरोबर सर्व शेतीचे वाही पेरणीचे सामान मालकाने शेतात न्यायचे, रोजंदारी मजूर किंवा महिला मजूर फक्त वेळेवर कामाला लागणे व काम संपल्यावर घरी येणे एवढेच काम करते. राहिलेली सर्व कामे नंतर शेतमालकास पूर्ण करावी लागतात. अशी विचित्र अवस्था निर्माण झाली आहे.कांदे लागवड, द्राक्ष बागेतील कामे व इतरही कामाला मजुरांना वाहनातून न्यावे लागते. मजूर पायदळ यायला तयार नाही. अनेक शेतकरी भाड्याच्या वाहनातून तर काही शेतकरी स्वतःच्या कारने मजुरांना शेतात ने-आण करत आहेत. निंदणी, खुरपणी, खत देणे हे सर्व मजूर करतात,शेतीच्या या सर्व कामाचा खर्च काढला तर शेतकऱ्याच्या हाती फार काही उरत नाही. मात्र शेतकऱ्यांपेक्षा मजूर खाऊन-पिऊन सुखी आहे.- प्रणव शंखपाळ, शेतकरी, कारसुळ.

टॅग्स :talukaतालुकाagricultureशेती