शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दरवाढीविरुद्ध उद्योजकांचे ऊर्जामंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:27 IST

मंदीचा सामना करता करता नाकीनव आलेल्या उद्योजक, व्यापाऱ्यांना पुन्हा वीज दरवाढीचा दणका देण्याचा प्रयत्न चालविला असून, ही प्रस्तावित दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र चेंबरच्या प्रतिनिधींनी ऊर्जामंत्र्यांना साकडे घातले आहे.

ठळक मुद्देमागण्यांबाबत सकारात्मक । उद्योग बंद पडण्याची भीती

सातपूर : मंदीचा सामना करता करता नाकीनव आलेल्या उद्योजक, व्यापाऱ्यांना पुन्हा वीज दरवाढीचा दणका देण्याचा प्रयत्न चालविला असून, ही प्रस्तावित दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र चेंबरच्या प्रतिनिधींनी ऊर्जामंत्र्यांना साकडे घातले आहे.महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र चेंबरच्या प्रतिनिधींनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महावितरण कंपनीचे चेअरमन असीमकुमार गुप्ता यांची भेट घेऊन कैफियत मांडली. राज्यात सातत्याने औद्योगिक, व्यापारी व घरगुती वीज दरवाढीचा परिणाम नवीन गुंतवणुकीवर होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर करणारे उद्योग राज्याबाहेर जात आहेत. महावितरणने पुनश्च वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे उद्योजक, व्यापाऱ्यांची सहनशीलता संपत चालली आहे. हा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी क्रॉस सबसिडी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वीज वितरण कंपनी शासनाची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आणून दिले.चेंबरच्या ऊर्जा समितीचे चेअरमन मिलिंद राजपूत यांनीही समस्या मांडली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार शिरीष चौधरी, अनिल गचके, डॉ. एस. एस. पाटील, भरत अग्रवाल, सुरेश चौहान, संजय शेटे, अमित हुक्केरीकर आदी उपस्थित होते.राज्याचे वीजदर कमी असावेत ही प्रामाणिक इच्छा आहे. परंतु महावितरणचे तत्कालीन चेअरमन संजीवकुमार यांनी ऊर्जामंत्र्यांना विश्वासात न घेता परस्पर वीज नियामक आयोगाकडे वीजदर प्रस्ताव सादर केला आणि वीज नियामक आयोगाने सुनावणींचा कार्यक्रम आखल्यामुळे सदर प्रस्ताव शासनास परत घेणे अथवा दुरुस्ती करणे शक्य नाही. मात्र व्यापारी उद्योजकांनी अभ्यासपूर्वक विरोध नोंदवावा. तसेच वीजदर कमी करण्यासाठी जनसामान्यातून काही अभ्यासपूर्वक सूचना असल्यास ऊर्जा खाते त्याचे स्वागत करेल आणि वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीministerमंत्री