शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

सेंद्रिय पीकपद्धतीसाठी कृषी खात्याकडून प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:44 IST

औषधांची फवारणी व रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतातील भाजीपाला व अन्नधान्यातून मोठ्या प्रमाणावर विषारी घटकद्रव्य मानवी शरीरात जाऊन कर्करोगासारखे आजार वाढू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय पीकपद्धतीकडे वळावे यासाठी कृषी विभागाच्या वतीने खास प्रयत्न करण्यात येत असून, मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्यात येत आहे.

नाशिक : औषधांची फवारणी व रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतातील भाजीपाला व अन्नधान्यातून मोठ्या प्रमाणावर विषारी घटकद्रव्य मानवी शरीरात जाऊन कर्करोगासारखे आजार वाढू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय पीकपद्धतीकडे वळावे यासाठी कृषी विभागाच्या वतीने खास प्रयत्न करण्यात येत असून, मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्यात येत आहे. केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातील शेतकºयांनी सेंद्रिय शेतीचा उपयोग करीत पीकपद्धतीची लागवड करावी यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने कृषी विकास प्रकल्प हा पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात बागायतदार शेतकरी, सामूहिक शेती व गट शेती राबविणारे शेतकरी वर्ग व सेंद्रिय शेतमाल खरेदीदार व निर्यातदार, व्यापारी, व्यावसायिक यांचा समावेश करण्यात आला आहे, असे विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांनी स्पष्ट केले. निफाड तालुक्यांतील शेतकरी सेंद्रिय पद्धतीने माल पिकवित आहेत; परंतु या मालाचे मार्केटिंग कसे करावे याचे तंत्र अद्याप माहिती नसल्याने यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा मदत करणार आहे.शेतकºयांनी सेंद्रिय शेती करावी यासाठी प्रबोधन करणार आहे. कारण रासायनिक खते व औषधांचा मारा याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यासाठी शासनाकडूनच सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता कृषी संमेलन, गटचर्चा, कार्यशाळा घेण्यात येत आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी