शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
4
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
5
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
6
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
7
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
8
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
9
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
10
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
11
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
12
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
13
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
14
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
15
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
16
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
17
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
18
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
19
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
20
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स

विज्ञान भोग तर अध्यात्म सुख देईल ! : निवृत्ती महाराज इंदोरीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 01:54 IST

प्रारब्ध हा उत्तमच असतो. अलीकडे माणसाचा चंगळवाद हा उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त वाढल्याने मनुष्य गरीब होत चालला आहे. पैसा, संपत्ती, सत्ता कायमस्वरुपी टिकणारी नसते. माणसाने चांगले आचरण ठेवत विज्ञानवादी विचारांना अध्यात्माची जोड दिल्यास उपभोगासोबत सुख-समाधानदेखील लाभेल, असे मत कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांनी कीर्तनातून व्यक्त केले.

ठळक मुद्दे प्रत्येकाने एक झाड जगवावे; पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणाऱ्या कृतीवर भर द्या

नाशिक : प्रारब्ध हा उत्तमच असतो. अलीकडे माणसाचा चंगळवाद हा उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त वाढल्याने मनुष्य गरीब होत चालला आहे. पैसा, संपत्ती, सत्ता कायमस्वरुपी टिकणारी नसते. माणसाने चांगले आचरण ठेवत विज्ञानवादी विचारांना अध्यात्माची जोड दिल्यास उपभोगासोबत सुख-समाधानदेखील लाभेल, असे मत कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांनी कीर्तनातून व्यक्त केले.

मुंबईनाका परिसरातील तुपसाखरे लॉन्समध्ये बुधवारी (दि. २२) संध्याकाळी इंदोरीकर यांचे कीर्तनाचे डॉ. संजय वराडे यांनी आयोजन केले होते. यावेळी इंदोरीकर यांनी आपल्या खास शैलीत टाळ-मृदंगाच्या गजरात ‘जय जय राम कृष्ण हरी...’च्या जयघोषात कीर्तनाला प्रारंभ केला. यावेळी उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटाने इंदोरीकर यांना प्रतिसाद दिला. तुकोबारायांच्या गाथेतील अभंग घेत त्यांनी कीर्तन सुरू केले. सुरुवातीला त्यांनी मानवी आरोग्याकडे लक्ष वेधत हृदयविकार हा आजार नाही तर एक प्रकाराचा मानसिक तणाव असल्याचे सांगितले. झालेली घटना जागच्या जागी विसरणे हे हृदयविकारावरील औषध आहे, असेही ते यावेळी म्हणाले. आई-बापाच्या आशीर्वादाशिवाय कोणीही या पृथ्वीतलावर मोठं झालेले नाही. त्यामुळे त्यांना सुखी-समाधानी ठेवायला शिका आणि विज्ञानासोबत बुध्दिमत्तेचा विकास घडविताना अध्यात्माची जोड देण्यास विसरू नका, असा सल्ला इंदोरीकर यांनी दिला.

---इन्फो--

निरोगी आयुष्य जगण्याची दिली त्रिसूत्री!

मन समाधानी ठेवा, कर्म प्रामाणिक करा आणि भगवंतावर श्रद्धा ठेवा, ही त्रिसूत्री अंमलात आणल्यास मनुष्य निरोगी व सुखी आयुष्य सहज जगू शकतो. कोणाचेही वाईट चिंतिले नाही तर आपलेही वाईट होत नाही, हे लक्षात ठेवा, असा सल्लाही इंदोरीकर यांनी दिला.

--इन्फो--

रोप बदलतं; खड्डा तोच असतो...!

पावसाला सुरुवात झाली की भूछत्राप्रमाणे वृक्षारोपण करणाऱ्यांचं मोहोळ उठतं. रोप बदलतं अन् खड्डा मात्र तोच असतो, असा वृक्षारोपणाचा देखावा काय कामाचा? असा खडा सवालही इंदोरीकर यांनी यावेळी उपस्थित केला. पर्यावरण केवळ भाषणापुरतं ठेवलं असून, त्याचा पुरता ऱ्हास झाला असून, पर्यावरणाच्या भाषणांचा केवळ तमाशा चालला असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. नद्यांची अवस्था इतकी घाण करून ठेवली. नद्या शुद्ध होणार नाही, तोपर्यंत वातावरण शुद्ध होणार नाही, हे लक्षात ठेवा, असे इंदोरीकर म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम