शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

२५ रोजी इंग्रजी शाळाबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:40 IST

शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु, इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कू ल असोसिएशन (ईसा) संघटनेशी संलग्नित शाळांनी थकीत फी च्या परताव्याची मागणी करीत २५ फेब्रुवारीलाच शाळाबंद आंदोलनाचा इशारा देऊन अप्रत्यक्षरीत्या शिक्षण विभागाला आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाला आव्हान : आरटीई प्रवेश शुल्क अदा करण्याची मागणी

नाशिक : शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु, इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कू ल असोसिएशन (ईसा) संघटनेशी संलग्नित शाळांनी थकीत फी च्या परताव्याची मागणी करीत २५ फेब्रुवारीलाच शाळाबंद आंदोलनाचा इशारा देऊन अप्रत्यक्षरीत्या शिक्षण विभागाला आव्हान दिले आहे.इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनची नाशिकमध्ये सोमवारी (दि.११) राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत शासनाच्या १ नोव्हेंबर २०१८चा शासननिर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा व २०१२ ते २०१९ या कालावधीत आरटीई कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या फी चा परतावा शाळांना तत्काळ मिळावा यासाठी २५ फेब्रुवारीला इंग्रजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य शासन आरटीई अंतर्गत दिल्या जाणाऱ्या फी चा परतावा करण्यात अपयशी ठरले असून, १ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयामुळे शिक्षण संस्थांवर अनेक जाचक अटी लादल्याचा आरोप करीत ईसाने केला. राज्य सरकार व शिक्षण विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.त्याचप्रमाणे राज्यातील सर्व शाळांसाठी शाळा सुरक्षा कायदा आणावा, १८ नोव्हेंबर २०१३ च्या शासन आदेशात दुरुस्ती करावी, शालेय वाहतुकीसंदर्भात मुख्याध्यापकांऐवजी वाहतूक व्यवस्थापकावर जबाबदारी सोपवावी, स्वयं अर्थसहाय्यित तत्त्वावर दर्जा वाढ प्रस्तावांसाठी आॅनलाइन प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याची मागणीही यावेळी इंग्रजी शाळाचालकांनी केली आहे. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र दायमा, प्रदेश सचिव भरत भांदरगे, डॉ. संजय रोडगे, जागृती धर्माधिकारी, राजीव मेंद्दीत्तीवार, डॉ. प्रिन्स शिंदे, श्रीधर श्रीनिवास, विवेक पाडळे, सुखदेव उशीर आदी उपस्थित होते.संस्थाचालकांचा आरोपशिक्षण विभागाच्या अधिकाºयांकडून वारंवार विविध कारणांनी शाळाचालकांना त्रास दिला जात असून, अधिकाºयांचे शाळांमधून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया शिक्षणापेक्षा खासगी शाळांमधून मिळणाºया चिरीमिरीवर अधिक लक्ष असल्याचा आरोपही यावेळी संस्थाचालकांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र