शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीचा निकाल क्रेडिट पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:52 IST

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) शाखेच्या सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व निकाल आता २०१५ पॅटर्ननुसार करण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे शनिवारी (दि.१४) घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षात प्रवेश घेण्यापासून अपात्र ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. परंतु विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मात्र टक्केवारी पद्धतीनेच देण्याच्या निर्णयावर विद्यापीठ ठाम राहिले आहे.

ठळक मुद्देगुणपत्रिका टक्केवारी पद्धतीनुसारच विद्यापीठ अधिकार मंडळाच्या बैठकीत निर्णय

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) शाखेच्या सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व निकाल आता २०१५ पॅटर्ननुसार करण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे शनिवारी (दि.१४) घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षात प्रवेश घेण्यापासून अपात्र ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. परंतु विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मात्र टक्केवारी पद्धतीनेच देण्याच्या निर्णयावर विद्यापीठ ठाम राहिले आहे.विद्यापीठाच्या २००८ आणि २०१२ पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व निकाल हे टक्केवारी पद्धतीने लावण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेशापासून वंचित राहावे लागणार होते. त्यामुळे नाशिकमधील विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत विभागीय कार्यालयात आंदोलन केले. यात अभाविप, एनएसयुआय, मनविसेसह विद्यार्थी न्याय मंचच्या विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याने या प्रश्नाला राजकीय स्वरूप प्राप्त होत असल्याचे पाहून विद्यापीठाने तत्काळ निकालात बदल करण्याची तयारी दाखवून अभियांत्रिकी शाखेचे सर्व निकाल २०१५ च्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व निकाल हे क्रेडिट पद्धतीनुसार घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विद्यापीठाच्या अधिकार मंडळाची बैठक झाली. याबैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला.मूल्यमापन व निकालही एकाच पद्धतीनेतीनही पॅटर्नच्या विद्यार्थ्यांनी एकच शिक्षण घेतले तसेच, त्यांनी सारखीच परीक्षा दिली. त्यामुळे त्यांचे मूल्यमापन व निकालही एकाच पद्धतीने लावला जावा, अशी उपरती विद्यापीठाच्या अधिकार मंडळाला परीक्षेचा निकाल टक्केवारी पद्धतीने जाहीर केल्यानंतर झाली. त्यामुळे या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार २००८ व २०१२ पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचे निकाल २०१५ पॅटर्ननुसार तयार केले जाणार आहे. त्यांची गुणपत्रके मात्र टक्केवारीनुसारच देण्यात येतील, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :Educationशिक्षण