शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

शेवटी पोलिसांना घाबरायचं ते सामान्यांनीच!

By admin | Updated: May 20, 2014 01:00 IST

नाशिक : सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय... शेवटी ब्रीदवाक्य पोलीस दलाचे असले म्हणून काय झाले, ते प्रत्यक्षात का आणायचे? दंडुका हाती असलेल्या पोलिसांना घाबरतात ते सर्वसामान्य नागरिकच.

नाशिक : सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय... शेवटी ब्रीदवाक्य पोलीस दलाचे असले म्हणून काय झाले, ते प्रत्यक्षात का आणायचे? दंडुका हाती असलेल्या पोलिसांना घाबरतात ते सर्वसामान्य नागरिकच. गुंड थोडीच घाबरतात? (तसे असते तर शहरात गुन्हेगारी केव्हाच अस्तंगत झाली असती.) मग धाक जमवायचा म्हणून कुणा सर्वसामान्य व्यक्तीच्या कानशिलात लगावली तर काय बिघडलं? पोलिसांना बघून असंच तर चळचळा सर्वसामान्यांनीच भयभीत झाले पाहिजे ना... नाशिक पोलिसांच्या एकूणच या प्रवृत्तीला साजेशा घटना रोजच घडत असतील तर कोणी कोणी आणि कोणाकडे दाद मागावी? खूपच झाले तर पोलिसांनी मोठ्या मनाने (?) अशा पीडितीला ‘सॉरी’ म्हणून टाकले की त्या सामान्य व्यक्तीला तितकेच समाधान आणि पोलिसांचे परिमार्जन. घटना तशी फार जुनी नाही. गेल्याच आठवड्यातील आहे. भीम पगारे नामक एका कुख्याताचा भर चौकात खून झाला आणि दुसर्‍या दिवशी सार्‍या शहरावर तणाव निर्माण झाला. पोलिसांचा धाकच राहिला नाही असे जो तो म्हणू लागला. मग काय, पोलिसांनी धाकच दाखवतो तुम्हाला म्हणत चौकाचौकांत फेर्‍या सुरू केल्या. सिडकोच्या गल्लीबोळातून देखील एक पोलीस उपआयुक्त कर्मचार्‍यांंचा फौजफाटा समवेत घेऊन दांडुके आपटत फिरू लागले. जनतेचे ‘स्वामी’च ते, कोणाला काय विचारतील सांगता येत नाही; परंतु जेव्हा पोलीस काही विचारतील तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी अदबीने वाकूनच बोलले पाहिजे.. आवाज चढविला तर अशी जुर्रत करणार्‍यांना क्षमा नाही. असो. महाराणा प्रताप चौकात एका इमारतीच्या खाली एक सफारी मोटार उभी होती आणि नजीकच दोन-तीन तरुण मुलं बोलत उभी होती. उपआयुक्तांनी त्यांना फटकारण्यासाठी उगाचंच ही मोटार कोणाची, इथे का उभी केली, असा प्रश्न केला. ती आमच्या बॉसची मोटार आहे, असे त्या युवकांनी सांगितल्यानंतर इथं का उभी केली म्हणून विचारणा केली. त्या युवकांनी याच इमारतीत आॅफिस असल्याने ती मोटार इथेच उभी असते, असे सांगण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांचा पारा चढलेलाच. मोटार येथून हटवा असे ते थेट आदेशीतच करू लागले. पोलीस कोणाची तरी कानउपटणी करीत असल्याचे बघून चौकात बघ्यांची गर्दी जमली. आणि त्याचवेळी पोलीस ज्या युवकांशी संवाद (?) साधत होते, त्यातील एकाने आपल्या बॉसची महती सांगण्यास सुरुवात केली आणि उपआयुक्तांना जो संताप आला की त्यांनी त्या तरुणाच्या श्रीमुखातच भडकावली. आपली चुक काय, पोलिसांना कोणा मोठ्या व्यक्तीची ओळख सांगणे हे गुन्हा आहे काय, असा प्रश्न तो तरुण करू लागला. यामुळे गर्दी आणखीनच वाढली. त्या तरुणानेदेखील अंगावर हात टाकू नका असे सांगितले. परंतु गर्दीमुळे उपआयुक्तांना आधीच हुरूप आला. त्याच वेळी त्या युवकाच्या बॉसने तेथे येऊन मध्यस्थी केली आणि तातपुरते प्रकरण थांबले. मात्र त्या युवकाने अपमानीत होतानाही या प्रकरणी वरिष्ठांकडे दाद मागू असे संतापाने सांगितले. सायंकाळ झाली. उपआयुक्त महोदय शांत झाले. मग त्यांनी त्या युवकाचा भ्रमणध्वनी शोधून संपर्क साधला आणि सॉरी म्हटले. संतापाच्या भरात होऊन जाते, असे सांगितले. परंतु त्याचबरोबर घडल्या प्रकरणाची वाच्यता करू नको, असेही बजावले. त्यामुळे उपआयुक्तांच्या संपर्काचा अट्टहास हा क्षमापनेसाठी नव्हताच, तर घडल्या प्रकाराची वाच्यता होऊ नये यासाठीच खटाटोप होता. गुंडांच्या मुसक्या आवळण्याची धमक नाही आणि कोणा सर्वसामान्यांवर मात्र धाक जमविण्याची अशीही पद्धत... यातून काय साध्य होणार? सर्वसामान्य नागरिक पोलिसांना नायक समजतील की खलनायक? आणि पुन्हा सर्वसामान्य अशा घटनेने पोलिसांना घाबरतील, परंतु गुन्हेगारांचे काय? ते शहरात थैमान घालतच राहतील. (प्रतिनिधी)