शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

देशाच्या संरक्षणासाठी तिन्ही सैन्यदले सक्षम

By admin | Updated: May 22, 2017 02:06 IST

भारतीय लष्कराची वायुसेना, नौसेना व आर्मी ही तिन्ही संरक्षण दले देशाच्या संरक्षणासाठी सक्षम असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मित्र निवडणे आपल्या हातात असते, परंतु शेजारी आपल्याला निवडता येत नाही, दुर्दैवाने आपल्याला पाकिस्तानसारखा शेजारी लाभला असून, पाकिस्तानसह अन्य शेजारी राष्ट्रांकडून काश्मीर व सीमाभागात कुरापती करण्याचा प्रयत्न होत असतो. परंतु भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून आम्ही आत घुसून मारू शकतो, असा इशारा दिला असून भारतीय लष्कराची वायुसेना, नौसेना व आर्मी ही तिन्ही संरक्षण दले देशाच्या संरक्षणासाठी सक्षम असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केले.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरसिंह भदोरिया, उपाध्यक्ष सुभाष कुंद्रा, युवाअध्यक्ष विजेंद्र ठाकूर, महामंत्री गुलाबसिंह बेस, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसिंह चौहान, रामसिंग बावरी, सुनीलसिंह परदेशी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना भामरे म्हणाले, देशाचे तिन्ही सैन्यदले शेजारी राष्ट्रांचा कोणताही हल्ला परतवून लावण्यात सक्षम आहे. भारतीय सैनिक प्राणाची पर्वा न करता रात्रंदिवस सीमेवर खडा पहारा देतात. या प्रत्येक जवानाच्या देशाप्रती असलेल्या निष्ठेतून त्यांच्यातील क्षत्रियताच दिसून येते. देशावरील कोणत्याही प्रकारचा हल्ला परतवून लावण्यासाठी या देशातील युवा वर्ग सदैव तयार असून, राष्ट्राचे संरक्षण हा क्षेत्रिय धर्मच असल्याचे भामरे म्हणाले. भारताला पाकिस्तानसारखा शेजारी लाभला असून, या देशात सत्तेसाठी सदैव सुरू असलेल्या कलहातून येथील राज्यकर्ते, सैन्य प्रशासन व अतिरेकी संघटना काश्मीरमध्ये कुरापती करून सातत्याने खोडसाळपणा करीत असतात. अशा प्रसंगांविरोधात नागरिकांमध्येही निर्माण होणारा संताप एक प्रकारची क्षत्रियताच असल्याचे भामरे म्हणाले. दरम्यान, गंजमाळपासून ते परशुराम सायखेडकर नाट्यगृहापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून बेटी बचाओ, बेटी पढाओ, हुंडा बंदी, सामूहिक विवाह असे विविध घोषणाफलक हातात घेऊन जनजागृतीही करण्यात आली आहे.