शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या संरक्षणासाठी तिन्ही सैन्यदले सक्षम

By admin | Updated: May 22, 2017 02:06 IST

भारतीय लष्कराची वायुसेना, नौसेना व आर्मी ही तिन्ही संरक्षण दले देशाच्या संरक्षणासाठी सक्षम असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मित्र निवडणे आपल्या हातात असते, परंतु शेजारी आपल्याला निवडता येत नाही, दुर्दैवाने आपल्याला पाकिस्तानसारखा शेजारी लाभला असून, पाकिस्तानसह अन्य शेजारी राष्ट्रांकडून काश्मीर व सीमाभागात कुरापती करण्याचा प्रयत्न होत असतो. परंतु भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून आम्ही आत घुसून मारू शकतो, असा इशारा दिला असून भारतीय लष्कराची वायुसेना, नौसेना व आर्मी ही तिन्ही संरक्षण दले देशाच्या संरक्षणासाठी सक्षम असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केले.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरसिंह भदोरिया, उपाध्यक्ष सुभाष कुंद्रा, युवाअध्यक्ष विजेंद्र ठाकूर, महामंत्री गुलाबसिंह बेस, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसिंह चौहान, रामसिंग बावरी, सुनीलसिंह परदेशी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना भामरे म्हणाले, देशाचे तिन्ही सैन्यदले शेजारी राष्ट्रांचा कोणताही हल्ला परतवून लावण्यात सक्षम आहे. भारतीय सैनिक प्राणाची पर्वा न करता रात्रंदिवस सीमेवर खडा पहारा देतात. या प्रत्येक जवानाच्या देशाप्रती असलेल्या निष्ठेतून त्यांच्यातील क्षत्रियताच दिसून येते. देशावरील कोणत्याही प्रकारचा हल्ला परतवून लावण्यासाठी या देशातील युवा वर्ग सदैव तयार असून, राष्ट्राचे संरक्षण हा क्षेत्रिय धर्मच असल्याचे भामरे म्हणाले. भारताला पाकिस्तानसारखा शेजारी लाभला असून, या देशात सत्तेसाठी सदैव सुरू असलेल्या कलहातून येथील राज्यकर्ते, सैन्य प्रशासन व अतिरेकी संघटना काश्मीरमध्ये कुरापती करून सातत्याने खोडसाळपणा करीत असतात. अशा प्रसंगांविरोधात नागरिकांमध्येही निर्माण होणारा संताप एक प्रकारची क्षत्रियताच असल्याचे भामरे म्हणाले. दरम्यान, गंजमाळपासून ते परशुराम सायखेडकर नाट्यगृहापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून बेटी बचाओ, बेटी पढाओ, हुंडा बंदी, सामूहिक विवाह असे विविध घोषणाफलक हातात घेऊन जनजागृतीही करण्यात आली आहे.